शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

'पुनर्वसनाचं मोठं काम हाती घ्यायचंय, पूरस्थितीचं कुणीही राजकारण करू नये'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 16:52 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप का आले नव्हते, गेली 5 दिवस त्यांना सांगली दिसली नाही का?

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप का आले नव्हते, गेली 5 दिवस त्यांना सांगली दिसली नाही का? पूरस्थिती ओसरत असून आता पुनर्वसनाचं काम आपल्याला करायचं आहे.

सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरनंतर सांगलीतील महापुराचा आढावा घेतला. फडणवीस यांनी हिराबाग येथील रेस्क्यू ऑपरेशनची पाहणी करून कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती पत्रकारांसमोर मांडली. तसेच, पूरस्थिती ओसरत असून आता पुनर्वसनाची मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस नदीच्या पुरानंतर तब्बल पाच दिवसांनी आज सांगलीत पोहोचले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप का आले नव्हते, गेली 5 दिवस त्यांना सांगली दिसली नाही का? असा प्रश्न उपस्थित करत सांगलीतील काही स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणा देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिले नाही. कोल्हापूर आणि सांगलीकरांना शक्य तितकी मदत सर्वसामान्यही करत आहेत. यात मराठी कलाकारही मागे नाहीत. महापुराने अस्मानी संकट ओढावल्याने सांगली जिल्ह्याची परिस्थिती अतिगंभीर झाली आहे. मात्र, राज्यभरातून मदतीचाही पूर या दोन जिल्ह्यात येत आहे. तसेच, राज्य सरकारनेही 154 कोटी रुपयांची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली असून पीडित नागरिकांना रोखीने पैसे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगलीतील नागरिक आणि पत्रकारांच्या प्रश्नाचा सामना करावा लागला. विरोधकांच्या टीकेवरुनही पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला त्यावर बोलताना, कुणीही पूरस्थितीचं राजकारण करु नये, असे फडणवीस यांनी म्हटले. मला, हेलिकॉप्टरने येण्यास परवानगी नसल्यामुळे मी उशिरा आलो. तत्पूर्वी मंत्री गिरीश महाजन आले होते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगतिले. तसेच, महाजन यांनी सेल्फी घेतला नसून स्थानिकांचा निरोप घेतना त्यांनी हातवारे केले होते. तर, महाजन यांनी स्वत: कुठलाही सेल्फी घेतला नसल्याचे फडणवीस म्हणाले. 

पूरस्थिती ओसरत असून आता पुनर्वसनाचं काम आपल्याला करायचं आहे. त्यासाठी सरकार पूर्ण क्षमतेने मदत आणि पुनर्वसनाचं काम करेल. मात्र, देवस्थान, सामाजिक संस्था आणि दानशूर नागरिकांनीही मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे. तसेच, पुराचे पाणी ओसरल्यानंतर रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने 100 डॉक्टरांची टीम कोल्हापूर आणि सांगली येथे पाठविण्यात येईल. नागरिकांना अन्न, पाणी आणि इतर महत्वाचं सामान पुरविण्यात येईल, असेही फडणवीस यांनी म्हटले.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangliसांगलीElectionनिवडणूकKolhapur Floodकोल्हापूर पूर