शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

'पुनर्वसनाचं मोठं काम हाती घ्यायचंय, पूरस्थितीचं कुणीही राजकारण करू नये'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 16:52 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप का आले नव्हते, गेली 5 दिवस त्यांना सांगली दिसली नाही का?

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप का आले नव्हते, गेली 5 दिवस त्यांना सांगली दिसली नाही का? पूरस्थिती ओसरत असून आता पुनर्वसनाचं काम आपल्याला करायचं आहे.

सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरनंतर सांगलीतील महापुराचा आढावा घेतला. फडणवीस यांनी हिराबाग येथील रेस्क्यू ऑपरेशनची पाहणी करून कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती पत्रकारांसमोर मांडली. तसेच, पूरस्थिती ओसरत असून आता पुनर्वसनाची मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस नदीच्या पुरानंतर तब्बल पाच दिवसांनी आज सांगलीत पोहोचले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप का आले नव्हते, गेली 5 दिवस त्यांना सांगली दिसली नाही का? असा प्रश्न उपस्थित करत सांगलीतील काही स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणा देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिले नाही. कोल्हापूर आणि सांगलीकरांना शक्य तितकी मदत सर्वसामान्यही करत आहेत. यात मराठी कलाकारही मागे नाहीत. महापुराने अस्मानी संकट ओढावल्याने सांगली जिल्ह्याची परिस्थिती अतिगंभीर झाली आहे. मात्र, राज्यभरातून मदतीचाही पूर या दोन जिल्ह्यात येत आहे. तसेच, राज्य सरकारनेही 154 कोटी रुपयांची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली असून पीडित नागरिकांना रोखीने पैसे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगलीतील नागरिक आणि पत्रकारांच्या प्रश्नाचा सामना करावा लागला. विरोधकांच्या टीकेवरुनही पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला त्यावर बोलताना, कुणीही पूरस्थितीचं राजकारण करु नये, असे फडणवीस यांनी म्हटले. मला, हेलिकॉप्टरने येण्यास परवानगी नसल्यामुळे मी उशिरा आलो. तत्पूर्वी मंत्री गिरीश महाजन आले होते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगतिले. तसेच, महाजन यांनी सेल्फी घेतला नसून स्थानिकांचा निरोप घेतना त्यांनी हातवारे केले होते. तर, महाजन यांनी स्वत: कुठलाही सेल्फी घेतला नसल्याचे फडणवीस म्हणाले. 

पूरस्थिती ओसरत असून आता पुनर्वसनाचं काम आपल्याला करायचं आहे. त्यासाठी सरकार पूर्ण क्षमतेने मदत आणि पुनर्वसनाचं काम करेल. मात्र, देवस्थान, सामाजिक संस्था आणि दानशूर नागरिकांनीही मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे. तसेच, पुराचे पाणी ओसरल्यानंतर रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने 100 डॉक्टरांची टीम कोल्हापूर आणि सांगली येथे पाठविण्यात येईल. नागरिकांना अन्न, पाणी आणि इतर महत्वाचं सामान पुरविण्यात येईल, असेही फडणवीस यांनी म्हटले.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangliसांगलीElectionनिवडणूकKolhapur Floodकोल्हापूर पूर