शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

'पुनर्वसनाचं मोठं काम हाती घ्यायचंय, पूरस्थितीचं कुणीही राजकारण करू नये'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 16:52 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप का आले नव्हते, गेली 5 दिवस त्यांना सांगली दिसली नाही का?

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप का आले नव्हते, गेली 5 दिवस त्यांना सांगली दिसली नाही का? पूरस्थिती ओसरत असून आता पुनर्वसनाचं काम आपल्याला करायचं आहे.

सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरनंतर सांगलीतील महापुराचा आढावा घेतला. फडणवीस यांनी हिराबाग येथील रेस्क्यू ऑपरेशनची पाहणी करून कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती पत्रकारांसमोर मांडली. तसेच, पूरस्थिती ओसरत असून आता पुनर्वसनाची मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस नदीच्या पुरानंतर तब्बल पाच दिवसांनी आज सांगलीत पोहोचले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप का आले नव्हते, गेली 5 दिवस त्यांना सांगली दिसली नाही का? असा प्रश्न उपस्थित करत सांगलीतील काही स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणा देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिले नाही. कोल्हापूर आणि सांगलीकरांना शक्य तितकी मदत सर्वसामान्यही करत आहेत. यात मराठी कलाकारही मागे नाहीत. महापुराने अस्मानी संकट ओढावल्याने सांगली जिल्ह्याची परिस्थिती अतिगंभीर झाली आहे. मात्र, राज्यभरातून मदतीचाही पूर या दोन जिल्ह्यात येत आहे. तसेच, राज्य सरकारनेही 154 कोटी रुपयांची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली असून पीडित नागरिकांना रोखीने पैसे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगलीतील नागरिक आणि पत्रकारांच्या प्रश्नाचा सामना करावा लागला. विरोधकांच्या टीकेवरुनही पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला त्यावर बोलताना, कुणीही पूरस्थितीचं राजकारण करु नये, असे फडणवीस यांनी म्हटले. मला, हेलिकॉप्टरने येण्यास परवानगी नसल्यामुळे मी उशिरा आलो. तत्पूर्वी मंत्री गिरीश महाजन आले होते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगतिले. तसेच, महाजन यांनी सेल्फी घेतला नसून स्थानिकांचा निरोप घेतना त्यांनी हातवारे केले होते. तर, महाजन यांनी स्वत: कुठलाही सेल्फी घेतला नसल्याचे फडणवीस म्हणाले. 

पूरस्थिती ओसरत असून आता पुनर्वसनाचं काम आपल्याला करायचं आहे. त्यासाठी सरकार पूर्ण क्षमतेने मदत आणि पुनर्वसनाचं काम करेल. मात्र, देवस्थान, सामाजिक संस्था आणि दानशूर नागरिकांनीही मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे. तसेच, पुराचे पाणी ओसरल्यानंतर रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने 100 डॉक्टरांची टीम कोल्हापूर आणि सांगली येथे पाठविण्यात येईल. नागरिकांना अन्न, पाणी आणि इतर महत्वाचं सामान पुरविण्यात येईल, असेही फडणवीस यांनी म्हटले.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangliसांगलीElectionनिवडणूकKolhapur Floodकोल्हापूर पूर