शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'पुनर्वसनाचं मोठं काम हाती घ्यायचंय, पूरस्थितीचं कुणीही राजकारण करू नये'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 16:52 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप का आले नव्हते, गेली 5 दिवस त्यांना सांगली दिसली नाही का?

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप का आले नव्हते, गेली 5 दिवस त्यांना सांगली दिसली नाही का? पूरस्थिती ओसरत असून आता पुनर्वसनाचं काम आपल्याला करायचं आहे.

सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरनंतर सांगलीतील महापुराचा आढावा घेतला. फडणवीस यांनी हिराबाग येथील रेस्क्यू ऑपरेशनची पाहणी करून कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती पत्रकारांसमोर मांडली. तसेच, पूरस्थिती ओसरत असून आता पुनर्वसनाची मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस नदीच्या पुरानंतर तब्बल पाच दिवसांनी आज सांगलीत पोहोचले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप का आले नव्हते, गेली 5 दिवस त्यांना सांगली दिसली नाही का? असा प्रश्न उपस्थित करत सांगलीतील काही स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणा देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिले नाही. कोल्हापूर आणि सांगलीकरांना शक्य तितकी मदत सर्वसामान्यही करत आहेत. यात मराठी कलाकारही मागे नाहीत. महापुराने अस्मानी संकट ओढावल्याने सांगली जिल्ह्याची परिस्थिती अतिगंभीर झाली आहे. मात्र, राज्यभरातून मदतीचाही पूर या दोन जिल्ह्यात येत आहे. तसेच, राज्य सरकारनेही 154 कोटी रुपयांची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली असून पीडित नागरिकांना रोखीने पैसे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगलीतील नागरिक आणि पत्रकारांच्या प्रश्नाचा सामना करावा लागला. विरोधकांच्या टीकेवरुनही पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला त्यावर बोलताना, कुणीही पूरस्थितीचं राजकारण करु नये, असे फडणवीस यांनी म्हटले. मला, हेलिकॉप्टरने येण्यास परवानगी नसल्यामुळे मी उशिरा आलो. तत्पूर्वी मंत्री गिरीश महाजन आले होते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगतिले. तसेच, महाजन यांनी सेल्फी घेतला नसून स्थानिकांचा निरोप घेतना त्यांनी हातवारे केले होते. तर, महाजन यांनी स्वत: कुठलाही सेल्फी घेतला नसल्याचे फडणवीस म्हणाले. 

पूरस्थिती ओसरत असून आता पुनर्वसनाचं काम आपल्याला करायचं आहे. त्यासाठी सरकार पूर्ण क्षमतेने मदत आणि पुनर्वसनाचं काम करेल. मात्र, देवस्थान, सामाजिक संस्था आणि दानशूर नागरिकांनीही मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे. तसेच, पुराचे पाणी ओसरल्यानंतर रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने 100 डॉक्टरांची टीम कोल्हापूर आणि सांगली येथे पाठविण्यात येईल. नागरिकांना अन्न, पाणी आणि इतर महत्वाचं सामान पुरविण्यात येईल, असेही फडणवीस यांनी म्हटले.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangliसांगलीElectionनिवडणूकKolhapur Floodकोल्हापूर पूर