शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
6
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
7
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
8
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
10
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
11
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
12
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
13
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
14
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
15
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
16
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
17
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
18
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
19
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
20
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

अवकाळीचा द्राक्षांना फटका, बागायतदारांत चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 3:20 PM

सकाळी ढगाळ वातावरण, दुपारनंतर उष्णता आणि रात्री थंडी, असे विचित्र वातावरण सांगलीकर सध्या अनुभवत आहेत. हवामानविषयक संकेतस्थळांनी तुरळक पावसाचीही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पावसाचा शिडकावादेखील होणार आहे.

ठळक मुद्देअवकाळीचा द्राक्षांना फटकाबागायतदारांत चिंतेचे वातावरण

सांगली : सकाळी ढगाळ वातावरण, दुपारनंतर उष्णता आणि रात्री थंडी, असे विचित्र वातावरण सांगलीकर सध्या अनुभवत आहेत. हवामानविषयक संकेतस्थळांनी तुरळक पावसाचीही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पावसाचा शिडकावादेखील होणार आहे.हवामान विभागाने गुरुवारपासून तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. सूर्यग्रहणानंतर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊसही झाला. काही ठिकाणी दमदार सरी कोसळल्या, तर अनेक ठिकाणी शिडकावा झाला. त्यानंतर दिवसभर आभाळ ढगांनी अच्छादले. रात्रीही थंडी कमीच राहिली. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर मात्र ऊन पडले.हवामानाच्या या बेभरवशी खेळाने द्राक्ष बागायतदारांत चिंतेचे वातावरण आहे. द्राक्ष हंगाम सुरु होण्याच्या बेतात आहे. आॅगस्टमध्ये छाटण्या घेतलेल्या पावणेचार महिन्यांच्या बागांमध्ये द्राक्षे तयार झाली आहेत. मणी मोठे झाले असून साखर भरु लागली आहे. निर्यातीच्या द्राक्षांची उतरणीही सुरु झाली आहे.

अशा स्थितीत पावसामुळे द्राक्षमणी तडकण्याची भीती आहे. घडांमध्ये पाणी साचून राहिले, तर मणी गळून पडतील. अतिवृष्टीतून शेतकऱ्यांनी हिकमतीने बागा बाहेर काढल्या, आता शेवटच्या टप्प्यात पावसाने पुन्हा घोर लावला आहे. काही शेतकऱ्यांनी अर्ली द्राक्षे बेदाणा शेडवर नेली आहेत. तापमान घसरल्याने बेदाणा निर्मितीलाही वेळ लागेल.अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची नुकसानीची भरपाई अजूनही मिळालेली नाही. त्यातच आता द्राक्ष बागा दावण्या व करपा रोगाला बळी पडल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना यंंदा बागा सोडून देण्याची वेळ आली आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे द्राक्ष उत्पादक महादेव पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :fruitsफळेSangliसांगली