शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

सांगलीतील वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादी-भाजपपुढे गटबाजीचे आव्हान, ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 16:01 IST

शिवसेनेची अवस्था नेत्यांना अस्वस्थ करणारी

अशोक पाटीलइस्लामपूर : वाळवा, शिराळा तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यानंतर भाजप, शिवसेना, काँग्रेस असा क्रम लागतो. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीपुढे गटबाजीचे आव्हान आहे. पक्षबांधणीपेक्षा स्वत:चा गट अबाधित ठेवण्यावर स्थानिक नेत्यांचा भर असणार आहे.वाळवा तालुक्यातील ८८, तर शिराळ्यातील ६० अशा एकूण १४८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील गटांची बहुतांश ग्रामपंचायतींवर सत्ता आहे. आता माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा गटही राष्ट्रवादीत गेला आहे. स्थानिक पातळीवर या पक्षात गटबाजी आहे. एकेका गावात पक्षांतर्गत तीन-तीन गट कार्यरत आहेत.भाजपची ताकदही वाढली असली तरी या दोन तालुक्यांतील पक्षाचे नेतृत्व कोणाकडे आहे, हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे महाडिक गटाचे राहुल व सम्राट महाडिक, जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील, सत्यजित देशमुख आपापले गट मजबूत करून राष्ट्रवादीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. परंतु स्थानिक पातळीवर कोण कोणाकडे जाणार हे निश्चित नसल्याने नेत्यांची दमछाक होणार आहे. भाजप पुरस्कृत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत नेमके कोणाला पाठबळ देणार, हेही गुलदस्त्यात आहे. या दोन्ही पक्षांतील गटबाजीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत वाढणार आहे.

शिवसेनेची अवस्था काय?शिवसेनेची अवस्था नेत्यांना अस्वस्थ करणारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे आनंदराव पवार जिल्हाप्रमुख आहेत, तर उद्धव ठाकरे गटाकडे अभिजित पाटील जिल्हाप्रमुख आहेत. पवार यांचा गट शहरात, तर पाटील यांची ताकद ग्रामीण भागात आहे. त्यांचे गट या निवडणुकीपुरते काही ठिकाणी राष्ट्रवादीमागे तर काही गावांत भाजपमागे जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा