शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

चांदोली धरण गळतीमुक्त होणार, या धरणाचे आहे एक खास वैशिष्ट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:33 IST

धरण गळतीमुक्त होईल व लाखो लीटर पाण्याची होणारी नासाडी थांबण्यास मदत होणार आहे.

वारणावती : चांदोली धरणाची गळती थांबविण्यासाठी शासनाने ५४ कोटी ८५ लाख ८३ हजार ६८३ रूपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे धरण गळतीमुक्त होईल व लाखो लीटर पाण्याची होणारी नासाडी थांबण्यास मदत होणार आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा पश्चिम विभागातील चांदोली धरण हे मातीचे राज्यातले दोन नंबरचे धरण आहे. २००२मध्ये धरणाच्या वक्राकार दरवाजाचे काम पूर्ण झाल्यानंतर ९७४.२१ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ३४.४० टीएमसी इतका प्रकल्पात पाणीसाठा निर्माण झाला. त्यातील ७७९.२१ दशलक्ष घनमीटर म्हणजे २७.५२२ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे.

चांदोली धरणातील पाणी साठवण सुरू झाल्यापासून धरणातून गळती सुरू आहे. त्यातून लाखो लीटर पाणी वापराविना वाया जात आहे. धरण सुरक्षेच्या दृष्टीने गळती नियंत्रणात आणण्यासाठी गळती प्रतिबंधक उपाययोजनांच्या कामाला विशेष दुरूस्ती अंतर्गत ५४ कोटी ८५ लाख ८३ हजार ६८३ रूपयांच्या अंदाजपत्रकाला नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.ही मंजुरी देताना धरणाच्या निकृष्ट दर्जाबाबत जबाबदार असणारे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर आवश्यक जबाबदारी निश्चितीची व अनियमिततेची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना करावी व समितीच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करावी, या अटी, शर्तीसह १४ अटी अंदाजपत्रकात देण्यात आल्या आहेत.

राज्यातील दोन नंबरचे मातीचे धरण

राज्यातील दोन नंबरचे मातीचे धरण असणाऱ्या या वारणा (चांदोली) प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात १९७६पासून सुरू करण्यात आले. त्यानंतर २०१६मध्ये ११७४.९८ कोटी किमतीला तृतीय सुधारित मान्यता मिळाली. मार्च २०२० अखेर ८५०.२८ कोटी खर्च झाला. उर्वरित किंमत ३२४.७० कोटी आहे. तृतीय मंजूर सुप्रमाप्रमाणे २०४.७५ कोटी इतकी तरतूद असूनही १९१.७० कोटी खर्च झाला. वारणा नदीच्या पात्रात हे धरण असून, ते मातीचे आहे. त्याची एकूण लांबी १,५८० मीटर असून, पैकी ८३१.५० मीटरचा भाग मातीचा व उर्वरित ७४८.५० मीटरमध्ये दगडी धरण बांधण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीDamधरण