शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तुंगजवळ अपघातात घोसरवाडचा तरुण ठार-एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 21:04 IST

तुंग (ता. मिरज) येथील मिणचे मळ्याजवळ मोटार व दुचाकीच्या अपघातात नितीन बाळकृष्ण कोकणे (वय २७, रा. घोसरवाड, ता. शिरोळ) हा तरुण जागीच ठार झाला, तर दुचाकीवरील ओंकार शिवाजी कोकणे

ठळक मुद्देमोटारीची दुचाकीला धडक : अपघातांची मालिका सुरूच

सांगली : तुंग (ता. मिरज) येथील मिणचे मळ्याजवळ मोटार व दुचाकीच्या अपघातात नितीन बाळकृष्ण कोकणे (वय २७, रा. घोसरवाड, ता. शिरोळ) हा तरुण जागीच ठार झाला, तर दुचाकीवरील ओंकार शिवाजी कोकणे (२७) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी दुपारी दोन वाजता घडला.

घोसरवाड येथील नितीन कोकणे व त्याचा चुलत भाऊ ओंकार हे दोघेजण दुचाकीवरून (क्र. एमएच ०९, डीएन ४३) इस्लामपूरकडे निघाले होते. नितीन हा शेती करीत होता. कडकनाथ कोंबड्यांचा प्रकल्प उभा करण्यासाठी हे दोघेजण अ‍ॅडव्हान्स देण्यासाठी सकाळी घरातून बाहेर पडले. सांगलीमार्गे ते इस्लामपूरकडे निघाले होते. त्यांच्यासोबत आणखी दोघे मित्र दुसऱ्या दुचाकीवर होते. ते दोघे मित्र पुढे निघून गेले व नितीन आणि ओंकार हे दुचाकीवरून तुंगजवळील मिणचे मळ्याजवळ आले असता, त्यांच्या दुचाकीला मोटारीने (क्र. एमएच १०, के ०१०९) धडक दिली. यात नितीन हा मोटारीच्या चाकाखाली चिरडला गेल्याने जागीच ठार झाला, तर ओंकार गंभीर जखमी झाला. या दोघांसोबत असलेले त्यांचे मित्र पुढे थोड्या अंतरावर जाऊन त्यांची वाट पाहत होते. तोपर्यंत रस्त्यावरून जाणाºयांनी त्यांना अपघात झाल्याचे सांगितले. नितीन व ओंकार या दोघांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी नितीनला मृत घोषित केले. ओंकार याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मिरज मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्याच्या मृत्यूचे वृत्त समजताच नातेवाईकांनी रुग्णालयाच्या आवारातच हंबरडा फोडला. रात्री शवविच्छेदनानंतर नितीनचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद झाली आहे.अपघातांची मालिका सुरूचसांगली-तुंग रस्ता अत्यंत खराब आहे. वारंवार आंदोलने करूनही रस्त्याच्या दुरूस्तीत हयगय सुरू आहे. या रस्त्याने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहेत. मंगळवारी याच रस्त्यावर कसबे डिग्रज येथे एसटी पलटी होऊन २५ प्रवासी जखमी झाले होते, तर बुधवारी तुंगजवळ एक ट्रकही पलटी झाला. त्यानंतर झालेल्या अपघातात नितीनचा बळी गेला. या रस्त्यावरील अपघातांची ही मालिका कधी थांबणार? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगलीDeathमृत्यू