शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

"देवपण भाजपच्या नावाने ठणठण करत असतील, देवस्थाने लुटण्याचा भाजपचा उद्योग"

By संतोष भिसे | Updated: March 12, 2023 17:29 IST

 मिरज तालुक्यातील बेडग येथे दिलीप बुरसे, बापूसाहेब बुरसे यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी जयंत पाटील, अविनाश पाटील, बाळासाहेब नलवडे आदी उपस्थित होते.

 

सांगली : भाजपचे नेते आता देवस्थानांच्या जमिनी ढापू लागले आहेत. महाराष्ट्रातील एकही देवस्थान सोडलेले नाही. देवपण त्यांच्या नावाने ठणठण करत असतील. बीडमध्ये सगळ्या देवस्थानांच्या जमिनी लाटण्याचे काम एका भाजप नेत्याने केले आहे. हिंदूंच्या देवतांची नावे घेऊन देवस्थाने लुटण्याचा उद्योग भाजपने सुरु केला आहे अशी टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल भाजपचा विरोध होता, तर नागालॅण्डमध्ये आमचा पाठींबा घेतलाच कशाला? असा सवालही त्यांनी केला.

बेडग (ता. मिरज) येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप बुरसे, बापूसाहेब बुरसे, सुनील सूर्यवंशी, रेखा बुरसे, बाळासाहेब नलवडे आदींनी पक्षप्रवेश केला. जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, उपाध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, ॲड. बाबासाहेब मुळीक, खंडेराव जगताप, वसंतराव गायकवाड, दिनकर पाटील, प्रदीप सावंत, तानाजी दळवी आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, सध्या सत्तेचा गैरवापर सुरु आहे. महागाईमुळे महिला भाजपच्या नावाने खडे फोडत आहेत. पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. पंतप्रधानांनी २०२२ पर्यंत सर्वांना घरांची घोषणा २०१४ मध्येच केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात १० लाख कुटुंबांसाठी नमो घर योजना जाहीर केली. तुमच्या बॉसने यापूर्वीच घोषणा केली असेल, तर पुन्हा नमो घर योजना कशासाठी याचा जाब अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी विचारणार आहोत.

ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य ताब्यात राहणार नाही या भितीने आभाळाएवढ्या घोषणा सुरु आहेत. खिशात पैसे किती? याची माहितीच नाही. जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका घ्यायला घाबरत आहेत. आत्मविश्वास नसलेले सरकार काम करत आहे. मंत्र्यांना पहाटे झोपेतही कोणी विचारले, तर `देतो, देतो` म्हणताहेत.

सरकार पलटी झाल्यावर कालव्यांची कामे -जयंत पाटील म्हणाले, मिरज तालुक्यात लघुवितरिकांची कामे आम्ही मंजूर केली होती. तोपर्यंत सरकार कोसळले. आता सध्याचे सरकार पलटी झाल्यावर राहिलेली कामे पूर्ण होतील. बेडग, आरगमध्ये ११०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा निर्णय झाला आहे.

जतमध्ये स्वतंत्र तलाव -पाटील म्हणाले, जत तालुक्यासाठी स्वतंत्र तलावात पाणीसाठ्याचे नियोजन आहे. कालव्यातून सर्वत्र पाणी दिल्यानंतर तलावही भरला जाईल. त्यातून उन्हाळ्यातील टंचाई कमी होईल. जतसाठी सहा टीएमसी पाण्याची व्यवस्था केली आहे. कामाची निविदाही निघाली आहे. दीड-दोन वर्षांत पाणी सर्वत्र पोहोचेल.

मुश्रीफांवर धाडी टाकणारेही थकले -पाटील म्हणाले, कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडी टाकणारेही आता थकले आहेत. सकाळी सात वाजताच धाडीसाठी येतात. अनिल देशमुख यांच्यावरही १०९ धाडी टाकल्या. अखेर कोर्टानेच याचा जाब विचारला. राजकीय खुनशीपणातून त्रास दिलेला जनतेला सहन होत नाही. योग्यवेळी अद्दल घडते. कसब्यामध्ये दिसून आले आहे. मुक्ता टिळकांचे घर सोडून भाजपने उमेदवारी दिली, त्यामुळे धंगेकर निवडून आले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSangliसांगली