शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेतील वीज निर्मितीचे पाणी शेतीला द्या -: अरुण लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 23:17 IST

दुष्काळामुळे पिके वाळू लागली असून, कोयना धरणातील वीज निर्मितीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेले ४.३४ टीएमसी पाणी शेतीसाठी देण्यात यावे, अशी मागणी क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाकडे मागणी; ४.३४ टीएमसी पाणीसाठा

सांगली : दुष्काळामुळे पिके वाळू लागली असून, कोयना धरणातील वीज निर्मितीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेले ४.३४ टीएमसी पाणी शेतीसाठी देण्यात यावे, अशी मागणी क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पाण्यापासूनची वीज निर्मिती बंद करून त्याऐवजी पवनऊर्जा आणि साखर कारखान्यांकडील विजेचा वापर वाढविण्याची विनंतीही त्यांनी केली.

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडेही त्यांनी, कोयनेतील पाण्याचा विजेसाठी होणारा वापर थांबविण्याची मागणी केली.अरुण लाड म्हणाले की, कोयना धरणामुळे पश्चिम महाराष्ट्राचा जास्तीत जास्त भाग ओलिताखाली आला आहे. धरणाची क्षमता १०५ टीएमसी आहे. पैकी वीज निर्मितीसाठी धरणातील ६७.५० टीएमसी पाणी आरक्षित आहे. त्यापैकी ६३.१६ टीएमसी पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी झाला आहे. सध्या वीज निर्मितीसाठी आरक्षित ठेवलेल्यापैकी ४.३४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्याचा वापर वीज निर्मितीसाठी न करता, ते पाणी शेती आणि पिण्यासाठी देण्याची गरज आहे. मान्सूनचा पाऊस कधी येणार, हे निश्चित नसून, शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची जिल्ह्यात आणखी टंचाई निर्माण होणार आहे. हे लक्षात घेऊनच प्रशासनाने पाण्यापासून वीज निर्मितीपेक्षा पवनऊर्जा आणि साखर कारखान्यांकडील वीज वापराला अधिक पसंती देण्याची गरज आहे. सौरऊर्जा निर्मितीलाही प्रोत्साहन दिल्यास भविष्यातील पाण्याची टंचाई कमी होण्यास मदत होईल. मेअखेरपर्यंत एकही वळीव पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे. हे लक्षात घेऊनच शेतीसाठी कोयनेतून जादा पाणी सोडण्याची गरज आहे. निवेदन देताना इरिगेशन फेडरेशनचे उपाध्यक्ष जे. पी. लाड, अशोक पवार, विश्वास पवार उपस्थित होते.

दुष्काळाचे संकटजिल्ह्यातील दहापैकी पाच तालुके भीषण दुष्काळाच्या संकटात आहेत. या तालुक्यांत पिण्याचे पाणीही वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तेथे वेळेवर आणि स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊनच कोयनेतील वीज निर्मितीसाठीचे आरक्षित पाणी शेती आणि पिण्यासाठी वळविण्याच्यादृष्टीने गांभीर्याने विचार करावा, असेही लाड यांनी सांगितले.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगलीKoyana Damकोयना धरणwater transportजलवाहतूक