शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोयनेतील वीज निर्मितीचे पाणी शेतीला द्या -: अरुण लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 23:17 IST

दुष्काळामुळे पिके वाळू लागली असून, कोयना धरणातील वीज निर्मितीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेले ४.३४ टीएमसी पाणी शेतीसाठी देण्यात यावे, अशी मागणी क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाकडे मागणी; ४.३४ टीएमसी पाणीसाठा

सांगली : दुष्काळामुळे पिके वाळू लागली असून, कोयना धरणातील वीज निर्मितीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेले ४.३४ टीएमसी पाणी शेतीसाठी देण्यात यावे, अशी मागणी क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पाण्यापासूनची वीज निर्मिती बंद करून त्याऐवजी पवनऊर्जा आणि साखर कारखान्यांकडील विजेचा वापर वाढविण्याची विनंतीही त्यांनी केली.

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडेही त्यांनी, कोयनेतील पाण्याचा विजेसाठी होणारा वापर थांबविण्याची मागणी केली.अरुण लाड म्हणाले की, कोयना धरणामुळे पश्चिम महाराष्ट्राचा जास्तीत जास्त भाग ओलिताखाली आला आहे. धरणाची क्षमता १०५ टीएमसी आहे. पैकी वीज निर्मितीसाठी धरणातील ६७.५० टीएमसी पाणी आरक्षित आहे. त्यापैकी ६३.१६ टीएमसी पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी झाला आहे. सध्या वीज निर्मितीसाठी आरक्षित ठेवलेल्यापैकी ४.३४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्याचा वापर वीज निर्मितीसाठी न करता, ते पाणी शेती आणि पिण्यासाठी देण्याची गरज आहे. मान्सूनचा पाऊस कधी येणार, हे निश्चित नसून, शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची जिल्ह्यात आणखी टंचाई निर्माण होणार आहे. हे लक्षात घेऊनच प्रशासनाने पाण्यापासून वीज निर्मितीपेक्षा पवनऊर्जा आणि साखर कारखान्यांकडील वीज वापराला अधिक पसंती देण्याची गरज आहे. सौरऊर्जा निर्मितीलाही प्रोत्साहन दिल्यास भविष्यातील पाण्याची टंचाई कमी होण्यास मदत होईल. मेअखेरपर्यंत एकही वळीव पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे. हे लक्षात घेऊनच शेतीसाठी कोयनेतून जादा पाणी सोडण्याची गरज आहे. निवेदन देताना इरिगेशन फेडरेशनचे उपाध्यक्ष जे. पी. लाड, अशोक पवार, विश्वास पवार उपस्थित होते.

दुष्काळाचे संकटजिल्ह्यातील दहापैकी पाच तालुके भीषण दुष्काळाच्या संकटात आहेत. या तालुक्यांत पिण्याचे पाणीही वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तेथे वेळेवर आणि स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊनच कोयनेतील वीज निर्मितीसाठीचे आरक्षित पाणी शेती आणि पिण्यासाठी वळविण्याच्यादृष्टीने गांभीर्याने विचार करावा, असेही लाड यांनी सांगितले.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगलीKoyana Damकोयना धरणwater transportजलवाहतूक