शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शेतकऱ्यांना पाच हजार पेन्शन द्या-: मिरजेत म्हैसाळ रस्ता, खानापूर तालुक्यातील भिवघाट येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:00 AM

साठ वर्षावरील शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार पेन्शन, श्रावणबाळ निराधार योजनेच्या पेन्शनमध्ये दोन हजार रुपयापर्यंत भरीव वाढ करण्याच्या मागणीसाठी जनता (सेक्युलर) दलातर्फे मिरज

ठळक मुद्दे जनता दलाचे आंदोलन

मिरज/विटा : साठ वर्षावरील शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार पेन्शन, श्रावणबाळ निराधार योजनेच्या पेन्शनमध्ये दोन हजार रुपयापर्यंत भरीव वाढ करण्याच्या मागणीसाठी जनता (सेक्युलर) दलातर्फे मिरज-म्हैसाळ मार्गावरील उड्डाण पुलावर रास्ता रोको आंदोलन केले. एक तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होती.

राज्य जनता दलाने साठ वर्षावरील वयोवृध्द शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार पेन्शन करावी व निराधार लाभार्थ्यांच्या पेन्शनमध्ये भरीव वाढ करावी या मागणीसाठी गेली दहा वर्षे राज्यव्यापी आंदोलन, मोर्चे, संघर्ष यात्रा, रास्ता रोको अशा अनेक मार्गाने आंदोलन केली. मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा व पंजाब सरकारने वयोवृध्द शेतकºयांना पेन्शन लागू केली आहे. मात्र राज्य शासनाने आश्वासनाशिवाय शेतकºयांना काहीच दिले नाही. राज्य शासनाने जाहीर केलेल्या योजना फसव्या आहेत.

जनता दलाने केलेल्या मागण्यांचा लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घ्यावा, या मागणीसाठी सोमवारी राज्य जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनता दलाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. के. डी. शिंदे, अ‍ॅड. फैयाज झारी, जिनगोंडा पाटील, युसूफ मुल्ला, संजय ऐनापुरे, शेतकरी संघटनेचे बी. आर. पाटील, समाजवादी पार्टीचे सुलेमान आलासे, एम. के. माळी यांनी आंदोलन केले. अ‍ॅड. के. डी. शिंदे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. शेतकºयांच्या व निराधार लाभार्थ्यांच्या मागण्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला. आंदोलनामुळे मिरज-म्हैसाळ मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प होती. आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी होते.

दरम्यान, देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्टÑ शासनानेही ज्येष्ठ नागरिकांना दरमहा २ हजार रुपये पेन्शन सुरू करावी, या मागणीसाठी सोमवारी जनता दलाच्यावतीने भिवघाट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. शरद पाटील यांनी केले. यावेळी आंदोलकांनी चारही मार्ग रोखून धरल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली.देशातील १२ राज्यांत ज्येष्ठ नागरिकांना दरमहा पेन्शन दिली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रातील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देण्याची घोषणा केली होती. परंतु, शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ज्येष्ठांवर अन्याय केला असल्याचे माजी आ. शरद पाटील यांनी आंदोलनकर्त्यांसमोर बोलताना सांगितले.

या आंदोलनात आबासाहेब सागर, प्रा. लक्ष्मण शिंदे, जगन्नाथ माने, बाबासाहेब पाटील, भानुदास सूर्यवंशी, रघुनाथ रास्ते, गोपीनाथ सूर्यवंशी, बापूलाल मुलाणी, आर. व्ही. पाटील, दिलीप गायकवाड, वसंत मंडले, पोपट खराडे, समाधान पाटील, शैलजा भिंगारदेवे, राधिका जगताप, विजय चव्हाण, काकासाहेब शिंदे, प्रतिभा चव्हाण, सुनील लोंढे, डॉ. रमा घाडगे, महादेव गुरव यांच्यासह खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. विटा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

आंदोलकांमुळे पोलिसांची तारांबळभिवघाट येथे संतप्त आंदोलकांनी पंढरपूर-नागज महामार्ग रोखून धरल्याने वाहतूक दोन तासासाठी ठप्प झाली. वाहनांची लांबच्या लांब रांग लागली होती. आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर, साने गुरूजी यांच्या ‘आता उठवू सारे रान...’ या गीताने रास्ता रोको आंदोलनाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :SangliसांगलीFarmer strikeशेतकरी संप