शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

तासगाव तालुक्यातील द्राक्ष शेती धोक्यात : अपुऱ्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:09 IST

द्राक्षपंढरी म्हणून जगभर ओळख असणाºया तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

ठळक मुद्देबागायतदारांची आर्थिक कोंडी; बागेवर कुºहाड चालविण्याची अनेकांवर वेळ

मांजर्डे : द्राक्षपंढरी म्हणून जगभर ओळख असणाºया तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अपुºया पावसाने सर्वच ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या असून गावागावात या संकटाला तोंड देत बागायतदार आता विकास सोसायटी व बँकांचे कर्ज काढून नव्या द्राक्ष बागा उभा करीत आहे.

मान्सून पावसाने तालुक्यात ओढ दिल्याने खरीप हंगामासह द्राक्ष शेतीला काडी बनवण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. टंचाईच्या काळात शेतकºयांनी आपल्या बागा जेमतेम पाण्यावर प्रसंगी टँकरने पाणी घालून फळछाटणी पर्यंतचा प्रवास केला. पूर्व व पश्चिम भागातील द्राक्षबागा एप्रिल, मे दरम्यान झालेल्या गारपिटीच्या शिकार झाल्या. प्रसंगावधान ओळखून काही बागायतदारांनी दुबार छाटणी घेतली व माल काडी तयार केली. परंतु पूर्ण दिवस न भरल्याने व तापमान कमी-अधिक प्रमाणात मिळाल्याने गारपीटमध्ये सापडलेल्या सर्वच द्राक्षबागा पूर्ण फेल गेल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे.

मान्सून पावसाने दिलेली ओढ आणि भागातील अपुरा पाणीसाठा तसेच उन्हाळ्यात द्राक्षात साखर भरणीच्या काळातील भेडसावणारी पाणी टंचाई यामुळे सर्वच बागायतदारांनी आपले द्राक्ष बागेचे छाटणीचे वेळापत्रक बदलून उशिरा छाटण्या घेतल्या. पाणीप्रश्न डोळ्यासमोर असतानाच बागा छाटणीचा श्रीगणेशा मजुरांचा अपुरा पुरवठा व मजुरी दरवाढीने झाला. आॅक्टोबर छाटणी झालेल्या बागा पोंगा अवस्थेत असताना पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यातील सुपर सोनाक्का आणि माणिक चमन जातीच्या बागांचे हजारो एकर क्षेत्र फेल गेल्याचे चित्र दिसत आहे. एप्रिल, मे मधील गारपीट कारणाने हजारो एकर द्राक्ष क्षेत्राचे नुकसान झाले.

येळावी परिसरातील एप्रिलमध्ये पडलेल्या गारांचा काडीला मार लागून जखमा झाल्या. काही बागायतदारांनी दुबार छाटणी करून माल काडी तयार करूनही द्राक्ष बागांना माल न आल्याने काही शेतकºयावर आपल्या बागेवर कुºहाड चालविण्याची वेळ आली आहे.शेतकºयांना मदत : देण्याची मागणीद्राक्ष शेतीमधील अवकाळी पाऊस व पाणी टंचाई यासाठी छाटणीचे नियोजन करणे आवश्यक आहे. नवीन वाणाची द्राक्षे लागवडीसाठी बदलत्या हवामानात किमान तीन वर्षे वाढलेल्या जातीची निवड करावी लागते. गारपीटमुळे माल न आल्याने द्राक्ष बागायतदार पुन्हा एकदा आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे पंचनामे करून शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी तसेच कर्जमाफी मिळावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.रोगाने काढले डोके वरभागातील जवळपास सर्वच बागा फुलोरावस्था चालू असताना कमी-जास्त प्रमाणात जिल्ह्यात सर्वच भागात पाऊस पडला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात पावसाने हजेरी लावलेल्या बागेत डाऊनी रोगाने जोमाने डोके वर काढले आहे. पानासह घडावर डाऊनी दिसू लागला आहे. द्राक्ष बगायतदारांची ऐन दिवाळीत कोंडी झाली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस