शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

डाळिंब, द्राक्षांसाठी सांगलीत ड्रायपोर्ट, निर्यात केंद्रापर्यंत फळे सुरक्षित पोहोचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 3:39 PM

वाढत्या वाहतूक खर्चाचा बोजा कमी करण्यासह द्राक्ष, डाळिंब राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविण्याची व्यवस्था ड्रायपोर्ट (पाणी नसलेल्या जागेवरील बंदरे) ही योजना राबविण्यात येणार आहे. वाहतूक खर्च कमी होण्याबरोबरच तो सुरक्षित बंदरापर्यंत पोहोचणार असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

ठळक मुद्देपॅकबंद कंटेनरसह मालवाहतुकीसाठी रेल्वेची खास व्यवस्थाशेतकऱ्यांना जादाचा दर मिळण्यास मदत होणार ड्रायपोर्टचा सर्वांना फायदा : आर्वे

सांगली : वाढत्या वाहतूक खर्चाचा बोजा कमी करण्यासह द्राक्ष, डाळिंब राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविण्याची व्यवस्था ड्रायपोर्ट (पाणी नसलेल्या जागेवरील बंदरे) ही योजना राबविण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या या योजनेनुसार सांगली जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब पॅकबंद कंटेनर आणि रेल्वेच्या माध्यमातून निर्यात केंद्रापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. वाहतूक खर्च कमी होण्याबरोबरच तो सुरक्षित बंदरापर्यंत पोहोचणार असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

ड्रायपोर्ट ही शेती माल सुरक्षित आणि जलद विमानतळ व बंदरांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाची योजना आहे. केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी, द्राक्ष, डाळिंब उत्पादक निर्यात करण्यासाठी ड्रायपोर्ट ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना मंगळवारी जाहीर केली आहे.

यापूर्वी गडकरी यांनी डाळिंब आणि द्राक्षबागायतदारांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या पुणे येथील कार्यक्रमात चर्चा केली होती. यावेळी द्राक्षबागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी द्राक्ष, डाळिंब निर्यातीमध्ये सर्वात मोठी वाहतुकीची समस्या असल्याची भूमिका मांडली होती.

वाहतूक व्यवस्था सुरक्षित आणि कमी खर्चाची अपेक्षित असल्याचे सांगितले होते. याच प्रश्नाचा धागा पकडून नितीन गडकरी यांनी शेतीमालाची सुरक्षित निर्यात होण्याच्यादृष्टीने महत्त्वाकांक्षी ड्रायपोर्ट योजना केली आहे.

ड्रायपोर्ट योजनेतून शेतकऱ्यांच्या बांधावरूनच शीतगृहयुक्त कंटेनरमधून द्राक्ष, डाळिंबाची वाहतूक रेल्वे स्थानकापर्यंत होईल. रेल्वेस्थानकाच्या ठिकाणी अद्ययावत शीतगृह, गोडावून होणार आहे. या ठिकाणी शेतीमाल ठेवण्याची व्यवस्था अल्पदरात केली जाणार आहे.

शेतीमाल वाहतुकीसाठी रेल्वेची व्यवस्था केली जाणार आहे. देशातंर्गत कोलकाता, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, सिमला, जम्मू-काश्मीर आदी राज्यात कमी खर्चात द्राक्षे पाठविण्याची व्यवस्था होणार आहे. याहीपेक्षा निर्यातक्षम द्राक्षे आणि डाळिंबासाठी सर्वाधिक फायदा होणार आहे.

सांगली जिल्ह्यातून द्राक्ष, डाळिंब निर्यात करण्यासाठी जवळ निर्यात केंद्राची व्यवस्था नाही. रस्ते वाहतुकीने या केंद्रापर्यंत द्राक्ष, डाळिंब पाठविल्यास मोठे नुकसान होते. वेळेत शेतीमाल पोहोचत नाही आणि वाहतुकीचा खर्चही मोठ्याप्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात फारसे काही पडत नाही. म्हणून केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार रेल्वे वाहतुकीच्या माध्यमातून निर्यात केंद्रापर्यंत द्राक्ष, डाळिंब पाठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावरून भरलेला कंटेनर रेल्वे, जहाजाच्या माध्यमातून थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यास मदत होणार आहे. सुरक्षित वाहतूक होऊन फळ पिकांचे नुकसान होणार नाही.म्हणूनच ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.ड्रायपोर्टचा सर्वांना फायदा : आर्वेकंटेनरच्या माध्यमातून सुरक्षित द्राक्ष, डाळिंबाची निर्यात होणार आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार असल्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. ड्रायपोर्ट योजनेचे लगेच शेतकऱ्यांना फायदे दिसले नाहीत, तरी भविष्यात त्याचे चांगले फायदे आहेत.

देशांतर्गत बाजारपेठेत रेल्वेच्या माध्यमातून द्राक्ष, डाळिंब पाठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. द्राक्ष, डाळिंब, बेदाणा निर्यात केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वे वाहतुकीच्या केंद्रांची शासन व्यवस्था करणार आहे. या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांना जादाचा दर मिळण्यास मदत होणार आहे.

 

शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांनाही दर्जेदार माल कमी दरात मिळण्यासही मदत होईल. द्राक्ष, डाळिंब, बेदाण्याबरोबरच अन्य शेतीमाल पाठविण्यासाठीही ड्रायपोर्ट योजनेचा फायदा होणार आहे.

सुभाष आर्वे, अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

टॅग्स :Sangliसांगलीfruitsफळे