शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: पैशाला हात लावत नाहीत; पण..; माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 16:17 IST

आघाडी सरकारने विधान परिषदेच्या तोंडावर आमदार शांत करण्यासाठी आलिशान हाॅटेलमध्ये ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.

सांगली : देशात पहिले आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: पैशालाही हात लावत नाहीत; पण सचिन वाझे, यशवंत जाधव यांनी माया गोळा करताना त्यांनी डोळे झाकले होते, अशी टीका बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी शुक्रवारी केली. आघाडी सरकारने विधान परिषदेच्या तोंडावर आमदार शांत करण्यासाठी आलिशान हाॅटेलमध्ये ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.

बहुजन रयत परिषदेच्या नवनिर्धार संवाद अभियानासाठी ढोबळे सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाआघाडी सरकारने अण्णा भाऊ साठे महामंडळासह विविध महामंडळांना साडेतीन हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली; पण दीड महिन्यात अध्यादेश काढला नाही. या महामंडळांना एक रुपयाही आलेला नाही.

बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे काही मागण्या केल्या आहेत. मातंग, ढोर, मोची, होलार, चांभार, धनगर समाजाच्या विकासासाठी कृतिशील आराखडा तयार करावा, अ, ब, क, ड प्रवर्ग लागू करून समाजाला न्याय द्यावा, लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, साकरे आयोगाच्या शिफारशीनुसार मातंग समाजाला न्याय द्यावा, पदोन्नतीचा अध्यादेश रद्द करावा, आदी मागण्यांबाबत सरकारकडून कोणताच निर्णय झालेला नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, महिला आघाडी अध्यक्षा कोमल साळुंखे यांची उपस्थिती होती.

बहुजन समाजासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यांचे जाहीरनामे वेगळे आहेत. त्यांच्यात ताळमेळ नाही. राज्यसभेला गोंधळ झाला, तसा होऊ नये यासाठी आमदारांना आलिशान हाॅटेलमध्ये ठेवले आहे. राज्यातील शेतकरी, बहुजन समाज मात्र समस्यांनी ग्रासला आहे. त्याकडे लक्ष देण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही.

टॅग्स :SangliसांगलीUddhav Thackerayउद्धव ठाकरे