शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: पैशाला हात लावत नाहीत; पण..; माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 16:17 IST

आघाडी सरकारने विधान परिषदेच्या तोंडावर आमदार शांत करण्यासाठी आलिशान हाॅटेलमध्ये ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.

सांगली : देशात पहिले आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: पैशालाही हात लावत नाहीत; पण सचिन वाझे, यशवंत जाधव यांनी माया गोळा करताना त्यांनी डोळे झाकले होते, अशी टीका बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी शुक्रवारी केली. आघाडी सरकारने विधान परिषदेच्या तोंडावर आमदार शांत करण्यासाठी आलिशान हाॅटेलमध्ये ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.

बहुजन रयत परिषदेच्या नवनिर्धार संवाद अभियानासाठी ढोबळे सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाआघाडी सरकारने अण्णा भाऊ साठे महामंडळासह विविध महामंडळांना साडेतीन हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली; पण दीड महिन्यात अध्यादेश काढला नाही. या महामंडळांना एक रुपयाही आलेला नाही.

बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे काही मागण्या केल्या आहेत. मातंग, ढोर, मोची, होलार, चांभार, धनगर समाजाच्या विकासासाठी कृतिशील आराखडा तयार करावा, अ, ब, क, ड प्रवर्ग लागू करून समाजाला न्याय द्यावा, लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, साकरे आयोगाच्या शिफारशीनुसार मातंग समाजाला न्याय द्यावा, पदोन्नतीचा अध्यादेश रद्द करावा, आदी मागण्यांबाबत सरकारकडून कोणताच निर्णय झालेला नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, महिला आघाडी अध्यक्षा कोमल साळुंखे यांची उपस्थिती होती.

बहुजन समाजासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यांचे जाहीरनामे वेगळे आहेत. त्यांच्यात ताळमेळ नाही. राज्यसभेला गोंधळ झाला, तसा होऊ नये यासाठी आमदारांना आलिशान हाॅटेलमध्ये ठेवले आहे. राज्यातील शेतकरी, बहुजन समाज मात्र समस्यांनी ग्रासला आहे. त्याकडे लक्ष देण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही.

टॅग्स :SangliसांगलीUddhav Thackerayउद्धव ठाकरे