शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

माजी मुख्यमंत्री वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रवास औपचारिकतेच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 1:04 PM

राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वाटचालीला समृद्धीचा मंत्र देणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रवास राजकीय कोरडेपणाचा अनुभव घेत औपचारिकतेच्या वाटेवरून सुरू आहे. कार्यक्रमांचा दुष्काळ सोसत येत्या दहा दिवसांत जन्मशताब्दी वर्ष संपणार असतानाही समारोपाचे नियोजन बारगळल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देवर्षभरात विविध कार्यक्रम घेण्याचे कागदी नियोजन शासनाचे जन्मशताब्दीकडे पूर्णपणे दुर्लक्षसमारोपाचे नियोजन बारगळल्याचे चित्र

अविनाश कोळी 

सांगली ,दि. ०२ : राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वाटचालीला समृद्धीचा मंत्र देणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रवास राजकीय कोरडेपणाचा अनुभव घेत औपचारिकतेच्या वाटेवरून सुरू आहे. कार्यक्रमांचा दुष्काळ सोसत येत्या दहा दिवसांत जन्मशताब्दी वर्ष संपणार असतानाही समारोपाचे नियोजन बारगळल्याचे चित्र दिसत आहे.

थोर स्वातंत्र्यसेनानी, माजी मुख्यमंत्री, माजी राज्यपाल अशी विशालकाय वाटचाल करीत राज्याच्या जडणघडणीत वसंतदादांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण मानले गेले. चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या दादांनी सहकार, कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य मैलाचा दगड ठरला आहे.

या कार्याचा उचित गौरव करण्याची वेळ जन्मशताब्दी वर्षानिमित्त आली होती. शासनाने या जन्मशताब्दीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. १३ नोव्हेंबर २०१६ रोजी जन्मशताब्दी वर्षास सुरुवात होऊनही शासनाने यासाठीची समिती ५ डिसेंबरला गठित केली. त्यानंतर वर्षभरात विविध कार्यक्रम घेण्याचे कागदी नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात नियोजनातील कोरडेपणाचे दर्शन शासनाने घडविले.

कॉँग्रेसच्या नेत्यांनी या गोष्टीचे भान ठेवत जन्मशताब्दी समिती स्थापन केली. अनेक दिग्गज नेत्यांना या समितीत समाविष्ट करण्यात आले. शताब्दी वर्षाच्या सुरुवातीलाच सांगलीत मोठा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर काही कार्यक्रम राज्यात झाले. तरीही वर्षभर जन्मशताब्दी वर्षाचा उत्साह टिकला नाही. येत्या दहा दिवसांत जन्मशताब्दी वर्ष संपणार आहे. तरीही यासंदर्भात समितीची एकही बैठक झाली नाही. येत्या ८ नोव्हेंबरला सांगलीत कॉँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील आक्रोश मेळावा आहे.

सध्या या मेळाव्याची तयारी सांगलीत सुरू झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचे नियोजन करणे नेत्यांना शक्य होणार नाही. त्यानंतर बरोबर चार दिवसांनी वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप होणार आहे. त्यामुळे समारोपाचा मोठा कार्यक्रम घेण्याचे नियोजन बारगळले आहे. वसंतदादांचा जन्म ज्या सांगली जिल्ह्यात झाला त्याठिकाणचे हे चित्र वसंतदादांच्या कार्याच्या वाटेला आलेल्या उपेक्षितपणाचा दाखला आहे.

दोनच कार्यक्रम उठावदारवसंतदादांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईत महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा या डिजिटल बुक व आॅडिओचा प्रकाशन सोहळा जन्मशताब्दी वर्षाला साजेसा ठरला.  लोकमतचे सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने लिखित या बुकच्या प्रकाशन सोहळ््याचे आयोजन मातृभूमी प्रतिष्ठानने केले होते.

सांगलीतील जन्मशताब्दी प्रारंभाचा आणि मुंबईतील दादांच्या डिजिटल बुकच्या प्रकाशनाचा कार्यक्रमच सर्वाधिक उठावदार ठरला. वास्तविक वर्षभर असे विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविणे आवश्यक होते.समिती कागदावरचराज्य शासनाने नियुक्त केलेल्या जन्मशताब्दी समितीवर राज्यातील अनेक दिग्गज राजकारण्यांचा समावेश करण्यात आला. या समितीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष आहेत. ही समिती आता दहा दिवसांत संपुष्टात येईल. ११ महिन्यांच्या कालावधित शासनाने समितीमार्फत कार्यक्रम राबविण्यासाठी दमडीचीही तरतूद केली नाही. त्यामुळे ही समिती कागदावरच राहिली.

 

 

केवळ पक्षीय महत्त्व वाढविण्याकडे लक्ष असल्यामुळे महाराष्ट्रासाठी योगदान दिलेल्या दिवंगत नेत्यांबद्दल सध्याच्या सरकारला फारसा आदरभाव नाही. त्यामुळेच औपचारिकता म्हणून वसंतदादांच्या जन्मशताब्दीची समिती गठित करण्यात आली. समितीच्या माध्यमातून वर्षभर कार्यक्रम होणे आवश्यक होते; मात्र त्यांचा त्यात रस दिसला नाही.- आ. जयंत पाटील,|नेते, राष्ट्रवादी

टॅग्स :SangliसांगलीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार