शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सांगली : ​​फडणवीस यांच्या रडारवर जयंतराव, इस्लामपूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 15:34 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार जयंत पाटील यांच्यात इस्लामपूरच्या विकासाच्या निधीवरून कलगीतुरा रंगला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंतरावांच्या हुकमी इस्लामपूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेला ते मुख्यमंत्र्यांच्या रडारवर राहणार आहेत.

ठळक मुद्देजयंतरावांच्या हुकमी इस्लामपूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत आगामी विधानसभेला ते मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

अशोक पाटील 

इस्लामपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार जयंत पाटील यांच्यात इस्लामपूरच्या विकासाच्या निधीवरून कलगीतुरा रंगला. नागपूरला जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने हल्लाबोल यात्रेचे आयोजन केले होते. यामध्ये पाटील यांनी थेट केंद्र सरकारलाच टार्गेट केले. याचाच वचपा म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंतरावांच्या हुकमी इस्लामपूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेला ते मुख्यमंत्र्यांच्या रडारवर राहणार आहेत.आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर पालिकेवर राष्ट्रवादीने ३१ वर्ष निर्विवाद सत्ता अबाधित ठेवली होती. जयंत पाटील यांनी शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणत निधीही मिळवला. परंतु त्यामानाने विकास झाला नाही. पालिकेतील काही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली होती. त्यामुळेच अशा नेत्यांना पालिका निवडणुकीत जनतेने खड्यासारखे बाजूला केले आणि पालिकेत विकास आघाडीची सत्ता आली.घराणेशाही, पुणतांब्यातील शेतकरी आंदोलन यावरून खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात दरी पडली आहे. त्यामुळे वाळवा, शिराळा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदललेली आहेत. त्याचा परिणाम राजकीय पटलावर दिसू लागला आहे.

या दोन्ही तालुक्यात काँग्रेस, शिवाजीराव नाईक गट, महाडिक, हुतात्मा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था आहे. शेट्टी की खोत यांच्या पाठीमागे जायचे यामध्येच ते गुरफटलेले दिसत आहेत.इस्लामपूर मतदारसंघ आणि शहराच्या विकासासाठी जयंत पाटील आणि खा. राजू शेट्टी आपल्या फंडातून विविध विकासकामांना सुरुवात करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ना त्या कामाच्या निमित्ताने इस्लामपूर मतदार संघाच्या दौºयावर पाचवेळा आले आहेत. प्रत्येकवेळी त्यांनी मोठी आश्वासने दिली आहेत. परंतु त्याची पूर्ती मात्र झालेली नाही.हाच धागा पकडून मुख्यमंत्री इस्लापूरला येण्याच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. ही टीका आणि नागपूर हिवाळी अधिवेशनावर राष्ट्रवादीने काढलेल्या हल्लाबोल यात्रेचा वचपा मुख्यमंत्री फडणवीस यांनी इस्लामपूरच्या कार्यक्रमात काढला.

जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडतानाच आम्ही वर्षभरात १३२ कोटी आणल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र आलेला निधी मुरला कुठे, असाही सवाल जनता विचारू लागली आहे. जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या रडारवर आहेत. याचा फायदा सदाभाऊ खोत यांना कितपत होणार, हे आगामी विधानसभेलाच स्पष्ट होणार आहे.टोलेबाजी : आता प्रतीक्षा उत्तराचीसाखर कारखाने, शिक्षण संस्था काढून आम्हाला स्वत:ची घरे भरायची नाहीत. आम्ही कधी कोरडी चक्कर मारत नाही. काही ना काही देत जाणार. ३१ वर्षांत इस्लामपूर नगरपालिकेला ११५ कोटी मिळाले. आम्ही मात्र केवळ ११ महिन्यात १३२ कोटी रुपये दिले, असा टोला फडणवीस यांनी जयंतरावांना लगावला. त्यावर ते काय उत्तर देतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangliसांगलीPoliticsराजकारण