शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

सांगली : ​​फडणवीस यांच्या रडारवर जयंतराव, इस्लामपूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 15:34 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार जयंत पाटील यांच्यात इस्लामपूरच्या विकासाच्या निधीवरून कलगीतुरा रंगला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंतरावांच्या हुकमी इस्लामपूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेला ते मुख्यमंत्र्यांच्या रडारवर राहणार आहेत.

ठळक मुद्देजयंतरावांच्या हुकमी इस्लामपूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत आगामी विधानसभेला ते मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

अशोक पाटील 

इस्लामपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार जयंत पाटील यांच्यात इस्लामपूरच्या विकासाच्या निधीवरून कलगीतुरा रंगला. नागपूरला जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने हल्लाबोल यात्रेचे आयोजन केले होते. यामध्ये पाटील यांनी थेट केंद्र सरकारलाच टार्गेट केले. याचाच वचपा म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंतरावांच्या हुकमी इस्लामपूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेला ते मुख्यमंत्र्यांच्या रडारवर राहणार आहेत.आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर पालिकेवर राष्ट्रवादीने ३१ वर्ष निर्विवाद सत्ता अबाधित ठेवली होती. जयंत पाटील यांनी शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणत निधीही मिळवला. परंतु त्यामानाने विकास झाला नाही. पालिकेतील काही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली होती. त्यामुळेच अशा नेत्यांना पालिका निवडणुकीत जनतेने खड्यासारखे बाजूला केले आणि पालिकेत विकास आघाडीची सत्ता आली.घराणेशाही, पुणतांब्यातील शेतकरी आंदोलन यावरून खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात दरी पडली आहे. त्यामुळे वाळवा, शिराळा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदललेली आहेत. त्याचा परिणाम राजकीय पटलावर दिसू लागला आहे.

या दोन्ही तालुक्यात काँग्रेस, शिवाजीराव नाईक गट, महाडिक, हुतात्मा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था आहे. शेट्टी की खोत यांच्या पाठीमागे जायचे यामध्येच ते गुरफटलेले दिसत आहेत.इस्लामपूर मतदारसंघ आणि शहराच्या विकासासाठी जयंत पाटील आणि खा. राजू शेट्टी आपल्या फंडातून विविध विकासकामांना सुरुवात करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ना त्या कामाच्या निमित्ताने इस्लामपूर मतदार संघाच्या दौºयावर पाचवेळा आले आहेत. प्रत्येकवेळी त्यांनी मोठी आश्वासने दिली आहेत. परंतु त्याची पूर्ती मात्र झालेली नाही.हाच धागा पकडून मुख्यमंत्री इस्लापूरला येण्याच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. ही टीका आणि नागपूर हिवाळी अधिवेशनावर राष्ट्रवादीने काढलेल्या हल्लाबोल यात्रेचा वचपा मुख्यमंत्री फडणवीस यांनी इस्लामपूरच्या कार्यक्रमात काढला.

जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडतानाच आम्ही वर्षभरात १३२ कोटी आणल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र आलेला निधी मुरला कुठे, असाही सवाल जनता विचारू लागली आहे. जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या रडारवर आहेत. याचा फायदा सदाभाऊ खोत यांना कितपत होणार, हे आगामी विधानसभेलाच स्पष्ट होणार आहे.टोलेबाजी : आता प्रतीक्षा उत्तराचीसाखर कारखाने, शिक्षण संस्था काढून आम्हाला स्वत:ची घरे भरायची नाहीत. आम्ही कधी कोरडी चक्कर मारत नाही. काही ना काही देत जाणार. ३१ वर्षांत इस्लामपूर नगरपालिकेला ११५ कोटी मिळाले. आम्ही मात्र केवळ ११ महिन्यात १३२ कोटी रुपये दिले, असा टोला फडणवीस यांनी जयंतरावांना लगावला. त्यावर ते काय उत्तर देतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangliसांगलीPoliticsराजकारण