शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आस्मानी संकटाने कवठेएकंद, तासगाव परिसरातील फुलशेती कोमेजली; लहरी हवामानाचे आव्हान कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 17:43 IST

उतरत्या दराचाही बसतोय फटका

प्रदीप पोतदारकवठेएकंद : अति पावसाच्या फटक्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. तासगाव तालुक्यातील बागायती शेतीलादेखील घरघर लागली आहे. यंदा अति पावसामुळे फुल शेतीही कोमेजू लागली आहे. सध्या गुलाब, झेंडू, गलांडा, शेवंती अशा फुलांवर दावण्या आणि करपा रोगाचे संकट आहे. अति पावसाच्या परिणामामुळे फुलशेतीस मोठे आव्हान उद्भवले आहे.तासगाव आणि परिसरात प्रामुख्याने गुलाब, झेंडू, गलांडा अशी फुलशेती नेहमी बहरलेली असते. तासगावचा गुलाब मुंबई मार्केटसह सर्वत्र प्रसिद्ध आहे, परंतु यंदा सततच्या पावसामुळे फुलशेतीसमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. मे महिन्यापासून सातत्याने परिसरात पाऊस पडत आहे. अति पावसामुळे झेंडू व इतर फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे. अति पाण्यामुळे शेकडो एकर फुलांचे क्षेत्र वाया गेले आहे. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यावेळी फुलांना चांगला दर मिळतो. या अपेक्षेने अनेक जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत अनेक शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे ओढ घेतली होती, मात्र यंदा सततच्या पावसामुळे उत्पादन घेता आले नाही. परिणामी शेती पूर्णपणे नुकसानीत गेली आहे. सध्या मुंबई मार्केटमध्ये शेवंती आणि झेंडूचे दर २० ते ३० रुपये प्रति किलो तर गुलाबाचे ८० ते १०० रुपये प्रति किलो आहेत. लोकल मिरज मार्केटमध्ये गलांडा आणि झेंडू प्रति किलो ३० रुपये दरात विकले जात आहेत. दसऱ्यानंतर दरात घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नापेक्षा जास्त खर्च सहन करावा लागत आहे.वाढती मजुरी, व्यापारी कमिशन, दलाली आणि बाजारातून मिळणाऱ्या किमतीमुळे फुलशेती तोट्यात जात असल्याचे फुलशेतकरी सांगतात. मुंबई मार्केटमध्ये पंधरा टक्के व्यापारी कमिशन घेतात. तर मिरज लोकल मार्केटमध्ये झेंडू, गलांडा, शेवंती फुलांसाठी प्रति दहा किलोला एक किलो सूट घेतली जाते. त्यात दहा ते पंधरा टक्के दलाली साधारणपणे कापली जाते. तासगाव तालुक्यात येळावी, मणेराजुरी, कवठे एकंद, बेंद्री, तासगाव परिसरात गुलाब व झेंडू शेती मोठ्या प्रमाणात केली जाते; मात्र उत्पादनखर्च खर्च फुलशेतीस पेलत नाही. सणासुदीला फुलांना चांगला दर मिळाला; पण आता दर पडले आहेत.

गुलाब शेतीवर अति पावसामुळे करपा आणि दावण्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पारंपरिक गुलाब शेती टिकवणे अति पावसाच्या तडाख्यामुळे मोठे आव्हान बनले आहे. गुलाब शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनाने फुलशेतीला अनुदान द्यावे, अशी मागणी फुलशेतकऱ्यांनी केली आहे. -  सुधीर मिरजकर, फुलशेतकरी, तासगाव.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Flower Farming Hit Hard by Unseasonal Rain, Faces Losses

Web Summary : Unseasonal rains in Sangli's Kavthe Ekand and Tasgaon have devastated flower farming, causing significant losses. Rose, marigold, and other flower crops are affected by diseases, leading to reduced yields and financial strain on farmers already burdened by rising costs and market fluctuations. Government support is needed.