शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

'कर्नाटकच्या बंधाऱ्यांमुळे पुराचा धोका, अलमट्टीची उंची तूर्त तरी वाढवू नका'

By संतोष भिसे | Updated: January 3, 2023 11:44 IST

महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार

संतोष भिसेसांगली : अलमट्टी धरणामुळेसांगली, कोल्हापूरला महापुराचा कोणताही धोका नव्हता; पण कर्नाटकने कृष्णा नदीत बंधारे बांधल्यानंतर धोका निर्माण झाला आहे, असे पत्र जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांनी शासनाला पाठविले आहे. या पार्श्वभूमीवर अलमट्टीची उंची वाढविण्याचा विचार कर्नाटकने तूर्त करू नये, अशी विनंती राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात करणार आहे.विधिमंडळ अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसे उत्तर दिले आहे. कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढविणार असल्याच्या बातम्या गेल्या दोन महिन्यांपासून येत आहेत. त्यामुळे सांगली, कोल्हापूरच्या पूरपट्ट्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.२००५ च्या महापुरानंतर शासनाने वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली १६ सदस्यांची समिती नियुक्त केली. तिचा अहवाल येईपर्यंत २०२० उजाडले. यादरम्यान, आणखी तीन महापूर येऊनही गेले. महापुरासाठी अलमट्टीच कारणीभूत असल्याचे समाजमन तयार झाले. वडनेरे अहवालाने मात्र ही बाब सपशेल फेटाळली. अलमट्टीमुळे महापूर येत नसल्याचे सप्रमाण आणि तंत्रशुद्धरीत्या सांगितले. शासनाने तो अहवाल स्वीकारला तरी अंमलबजावणी केली नाही.यादरम्यान, वडनेरे यांनी भूमिका बदलली असून, तशी दोन पत्रे शासनाला पाठविली आहेत. अहवालासाठीच्या पाहणीवेळी कर्नाटकात बंधारे नव्हते किंवा दिसले नाहीत; पण हल्ली अनेक बंधारे बांधल्याने अलमट्टीचा धोका सांगली, कोल्हापूरला संभवतो, असे पत्रांत म्हटले आहे. फडणवीस यांनी तशी पत्रे आल्याचे सांगत, आवश्यक कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.

वडनेरेंनी फडणवीसांना पाठविले पत्र

अलमट्टीची उंची पाच मीटरने वाढविण्याच्या हालचाली कर्नाटक करत आहे. त्याला फडणवीस यांनी दुजोरा दिला. २००५ च्या महापुरानंतर कर्नाटकनेही वाकस इंटरनॅशनल कंपनीची अभ्यासासाठी नियुक्ती केली होती. धरणाची उंची ५२४.६० मीटरपर्यंत वाढविली, तरी सांगली, कोल्हापूरला धोका नसेल, असे स्पष्टीकरण कंपनीने दिले होते.यादरम्यान, २७ मे २०२० रोजी वडनेरे समितीने महाराष्ट्र सरकारला दिलेल्या अहवालात अलमट्टीवर ठपका ठेवला. त्यानंतर दीड वर्षात वडनेरे यांनी बंधारे झाल्याने विपरीत परिणाम होऊ शकतो, असे पत्र फडणवीस यांना पाठविले आहे.

मॉडेलद्वारे होणार अभ्यासदरम्यान, या पत्रांमुळे गंभीर चित्र निर्माण झाल्याचे फडणवीस म्हणाले. अलमट्टीची प्रस्तावित वाढीव उंची व कृष्णेतील बंधाऱ्यांचे प्रत्यक्ष मॉडेल शासन बनविणार आहे. त्याद्वारे पूरहानीचा अंदाज घेतला जाईल. या तंत्रातून पाणीपातळीतील एक-दोन इंचाच्या बदलाचे परिणामही स्पष्ट होतील.राज्य शासन हा अभ्यास करत असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली जाणार आहे. तोपर्यंत कर्नाटकने उंची वाढविण्याचा विचार करू नये, अशी विनंती न्यायालयात व कर्नाटककडेही केली जाणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकDamधरण