शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अंकलखोपला रस्ते कामामुळे पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:25 AM

अंकलखोप : अंकलखोप (ता. पलुस) येथे भारती विद्यापीठ हुतात्मा भगतसिंग हायस्कूलमध्ये कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पूरग्रस्तांची भेट ...

अंकलखोप : अंकलखोप (ता. पलुस) येथे भारती विद्यापीठ हुतात्मा भगतसिंग हायस्कूलमध्ये कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी टोप-दिघंची महामार्गाच्या रूंदीकरण कामामुळे पुराचा फटका बसल्याची तक्रार नागरिकांनी केली. यावर तोडगा काढण्याचे आश्वासन कदम यांनी दिले.

अंकलखोपमधील ४०० नागरिक व ३५० जनावरे भगतसिंग हायस्कूल येथे स्थलांतरित झाली आहेत. मंत्री कदम यांनी यावेळी या नागरिकांच्या व जनावरांच्या व्यवस्थेबाबत माहिती घेतली. टोप-दिघंची महामार्गच्या रूंदीकरणामुळे अंकलखोप-भिलवडी रस्त्यावर ज्याठिकाणी पाणी येऊन रस्त्याची समस्या निर्माण झाली आहे, त्याठिकाणी उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली. मंत्री कदम यांनी त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली व या रस्त्याच्या कामावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

महापुरामुळे बाधित लोकांना निवारा केंद्रात ठेवले आहे. त्याठिकाणाच्या सर्व लोकांची कोरोनासंबंधीची ॲन्टिजन चाचणी करून घ्या व कोणी पाॅझिटिव्ह सापडल्यास त्या व्यक्तीची वेगळ्या खोलीमध्ये सोय करा अथवा कोरोना केअर सेंटरला पाठवा. यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही. अन्यथा निवारा केंद्रातील सर्व लोक बाधित होतील.

यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार श्रीनिवास ढाणे, सरपंच अनिल विभुते, उपसरपंच स्वाती पाटील, विनय पाटील, अशोक चौगुले उपस्थित होते.