शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

Maharashtra Assembly Election 2019 : जत पूर्वची ६४ गावे बहिष्कारावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:11 PM

पाणी संघर्ष समितीच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्या अध्यक्षतेखाली ६४ गावांतील कार्यकर्त्यांची बैठक श्रीसंत बागडे बाबा मठात झाली. यामध्ये ६४ गावांनी विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे आवटे यांनी केलेली शिष्टाई व्यर्थ ठरली.

ठळक मुद्देजत पूर्वची ६४ गावे बहिष्कारावर ठामप्रांताधिकारी आवटे यांच्या अध्यक्षतेखाली ६४ गावांतील कार्यकर्त्यांची बैठक

संख : पाणी संघर्ष समितीच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्या अध्यक्षतेखाली ६४ गावांतील कार्यकर्त्यांची बैठक श्रीसंत बागडे बाबा मठात झाली. यामध्ये ६४ गावांनी विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे आवटे यांनी केलेली शिष्टाई व्यर्थ ठरली.पूर्व भागातील दरीबडची, गिरगाव, जालिहाळ बुद्रुक, तिकोंडी, भिवर्गी, लमाणतांडा (दरीबडची), करेवाडी (कों.बो), खंडनाळ, गुड्डापूर, तिल्याळ या ग्रामपंचायतींनी मतदानावर बहिष्काराचा ठराव संखच्या अप्पर तहसीलदारांना दिला होता. पूर्व भागातील ६४ गावे म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

आवटे म्हणाले, निवडणुकीवर बहिष्कार टाकणे चुकीचे आहे. लोकशाहीला बाधक आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करा. तुमच्या भावना शासनाला कळवू. तुम्ही मतदान करून योग्य नेता निवडा. त्यांच्याकडून प्रश्न सोडवा.तुकारामबाबा म्हणाले, पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा सुरूच राहणार आहे. जोपर्यंत पाणी मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय मंचावर जाणार नाही.

पाणी आंदोलन राजकारणविरहित सुरु आहे. कोणतीही निवडणूक लढविणार नाही. माजी पंचायत समिती सदस्य गंगाधर मोरडी म्हणाले, एक तर आम्हाला तातडीने पाणी द्यावे. तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला कर्नाटकात पाठवावे.

यावेळी भीमाशंकर बिरादार, ईरय्या पुजारी, मल्लू पुजारी (गुड्डापूर), राजू पुजारी (खंडनाळ), चंद्रशेखर रेबगोंड, महेश बागेळी, तिल्याळचे सरपंच सुरेश कटरे, गिरीश कुंभार यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSangliसांगली