शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

राज्यभरात पाच कोटीच्या बनावट नोटा चलनात, टोळीची कबूली, नवी मुंबईतून दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 14:51 IST

बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करताना सापडलेल्या टोळीने गेल्या दीड वर्षात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपये राज्यभरात चलनात आणल्याची धक्कादायक माहिती सांगली शहर पोलिसांच्या चौकशीतून शनिवारी पुढे आली.

ठळक मुद्देराज्यभरात पाच कोटीच्या बनावट नोटा चलनात, टोळीची कबूली नवी मुंबईतून दोघांना अटक; दोन हजाराच्या आणखी ९२ नोटा जप्त

सांगली : शहरात बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करताना सापडलेल्या टोळीने गेल्या दीड वर्षात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपये राज्यभरात चलनात आणल्याची धक्कादायक माहिती सांगली शहर पोलिसांच्या चौकशीतून शनिवारी पुढे आली.

याप्रकरणी नवी मुंबईतून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनही दोन हजाराच्या ९२ नोटा जप्त केल्या आहेत. अटकेतील संशयितांची संख्या आता पाच झाली आहे. तसेच ११३ बनावट नोटा जप्त केल्या आहेत.सूरज उर्फ मनिष मल्ला ठाकुरी (वय ३६, रा. अर्जुनवाडी, घनसोली, नवी मुंबई) व जिलानी आश्पाक शेख (४७, शिव कॉलनी, गजानन मंदिरजवळ, एरोल सेक्ट १, नवी मुंबई) अशी नव्याने अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

यापूर्वी राज राजकुमार उज्जेनवाल सिंह (२८) प्रेमविष्णू रोगा राफा (२६), नरेंद्र आशापाल ठाकूर (३३, कल्याण) या तिघांना अटक केली होती. हे तिघे व नव्यान अटक केलेला मनिष ठाकुरी २३ आॅगस्ट रोजी सांगलीत आले होते. मुख्य बसस्थानकाजवळील एका दुकानातून त्यांनी खाद्यपदार्थ खरेदी केले.

यासाठी त्यांनी दोन हजाराची नोट दिली. दुकानात महिला होती. तिला या नोटेविषयी शंका आल्याने तिने संशयितांना, नोट बनावट आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला होता. त्यादिवशी राज सिंह यास पकडले होते. त्याचे साथीदार पळून गेले होते. त्यांना गेल्या आठवड्यात पकडले होते.अटकेतील राज सिंह, प्रेमविष्णू राफा व नरेंद्र ठाकूर या तिघांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीतून जिलानी शेख व सूरज ठाकूरी यांची नावे निष्पन्न झाली. त्यांच्या शोधासाठी शहर पोलिसांचे पथक शुक्रवारी सकाळी नवी मुंबईला रवाना झाले होते.

तेथून पथकाने या दोघांना पकडले. दोघांच्या घराची झडती घेतल्यानंतर दोन हजाराच्या आणखी ९२ बनावट नोटा सापडल्या. त्या जप्त करुन पथक शनिवारी पहाटे सांगलीत दाखल झाले. यातील जिलानी शेख हा टोळीचा म्होरक्या आहेत. त्याच्या चौकशीतूून बनावट नोटांचे मुख्य केंद्र पश्चिम बंगाल असल्याचे स्पष्ट झाले आहेत. तेथील दोघांची नावे पुढे आली आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी शहर पोलिसांचे पथक येत्या एक-दोन दिवसात पश्चिम बंगालला रवाना होणार आहे.दहा हजाराला...एक लाख रुपये!जिलानी शेख याचे पश्चिम बंगालमधील मालदा हे गाव आहे. नवी मुंबईत त्याचे चिकन विक्रीचे दुकान आहे. पश्चिम बंगालला तो अधून-मधून जातो. तिथे तो बनावट नोटांची छपाई करणाऱ्या टोळीच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने हा व्यवसाय सुरु केला.

बंगालच्या या टोळीचे बँकेत खाते आहे. या खात्यावर दहा हजार रुपये भरल्यानंतर ही टोळी त्या बदल्यात दोन हजाराच्या बनावट ५० नोटा (एक लाख रुपये) देते. या नोटा घेऊन एकजण रेल्वेने कल्याणमध्ये येतो. त्याच्याकडून शेख नोटा घेऊन त्या साथीदारांच्या माध्यमातून चलनात आणत होता. टोळीच्या खात्यावर आतापर्यंत त्याने १२ लाख रुपये भरले आहेत. यावरुन त्यान या बदल्यात एक कोटी २० लाख रुपये (बनावट नोटा) घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.बनावट कागदपत्रे जप्तअटकेतील संशयितांचे पाचही मोबाईल जप्त केले आहेत. याशिवाय प्रेमविष्णू राफा याची स्वत:च्या नावावरील तीन बनावट आधार कार्ड, तीन बनावट पॅनकार्ड, विविध बँकाची पाच एकटी जप्त केले आहेत. या सर्वांचे कोणत्या-कोणत्या बँकेत खाते आहे, याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. बँक व्यवहारावरुन पश्चिम बंगालच्या टोळीतील काही जणांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.नाशिकमध्ये गुन्हाबनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी जिलानी शेख याच्याविरुद्ध नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला दोन वर्षापूर्वी अटकही झाली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा बनावट नोटांचा हा व्यवसाय सुरु केला. आता तो सांगली पोलिसांच्या हाती लागला आहे.तीनशे रुपये कमिशनजिलानी शेख याच्याकडे प्रेमविष्णू राफा हा प्रथम कामाला होता. दोन हजाराची एक नोटा बाजारात चलनात आणली की शेख त्याला तीन रुपये कमिशन देत असे. चलनात सहजपणे नोट खपू लागल्याने राफाने जिलानीकडून टोळीचा पत्ता घेऊन स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. दोघांनीही नोटा खपविण्यासाठी कमिशनवर एजंटांची नियुक्त केली. हे एजंटही त्याने परिस्थितीने गरीब असलेले निवडले.टोळीची राज्यफर सफरगेल्या दीन वर्षात टोळीने राज्यातील सर्व जिल्ह्यात सफर करुन सुमारे पाच कोटी रुपयांची रक्कम चलनात आणल्या आहेत. या सर्व दोन हजाराच्या बनावट नोटा आहेत. इंटरनेटवरुन ते प्रत्येक जिल्ह्याची माहिती घेत असे. त्यानंतर ते प्रवासाला निघत असे. सांगलीचीही त्यांनी इंटरनेटवरुन माहिती घेतली. त्यानंतर राफासह चौघे रेल्वेने मिरजेत आले. तेथून ते सांगलीत आले होते.पथकाचे कौतूकजिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे, उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कैलास कोडग, उपनिरीक्षक गणेश शिंदे, हवालदार दिनकर चव्हाण, रमेश जाधव, बिरोबा नरळे, सुशांत ठोंबळे व सायबर पोलीस ठाण्याचे अमोल क्षिरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस प्रमुख शर्मा यांनी पथकाचे कौतूक केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीNavi Mumbaiनवी मुंबई