शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

सांगली जिल्ह्यात दुष्काळाचा पहिला बळी; मेंढपाळाचा पाण्यासाठी मृत्यू, प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 13:51 IST

शेळ्या-मेंढ्यांकरिता पाणी काढण्यासाठी गेले असता शेततळ्यात पडून झाला मृत्यू

जत : तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून खंडनाळ येथील एका मेंढपाळाला पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे दुर्लक्ष केले असून मेंढपाळ कुटुंबीयांना तातडीने न्याय देण्याची मागणी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.खंडनाळ (ता. जत) येथील शेतकरी कुटुंबातील एक मेंढपाळ संभाजी रामू कुलाळ (वय ४५) यांचा शेळ्या-मेंढ्यांकरिता पाणी काढण्यासाठी शेततळ्यात गेले असता तुकाराम हाजीबा थोरात यांच्या शेततळ्यात पडून मृत्यू झाला होता. या घटनेकडे कोणीही लक्ष न दिल्याने तम्मनगौडा रवीपाटील यांनी थेट गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर व प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना भेटून जाब विचारला. शासनाने आपला प्रतिनिधी पाठवून या गोष्टीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे. संबंधित मेंढपाळाच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली.सध्या भीषण पाणीटंचाई असल्यामुळे हा प्रकार घडला आहे. मात्र, या घटनेची शासकीय पातळीवर दखल घेतली नाही. ही बाब खेदाची आहे, असे रवीपाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मोठे टँकर दिल्याने वाड्यावर पाणीपुरवठा करणे कठीण होत आहे. त्याऐवजी १२ हजार लिटरचे छोटे टॅंकर द्यावेत, अशी मागणी रवीपाटील यांनी केली. यावेळी सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील, संजय गडदे, हनमंत गडदे, राजू पुजारी उपस्थित होते.दुष्काळाचा बळीजत तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. विशेषत: मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढ्यांना पिण्यासाठी पाण्याचे दुर्भिक्ष आहे. शेळ्या-मेंढ्यांना पाणी आणण्यासाठी शेततळ्यात गेले असता सदर मेंढपाळाचा मृत्यू झाला. जनावरांना पाणी देण्यासाठी त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला ही बाब गंभीर असल्याचे रवीपाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळDeathमृत्यू