शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

दुष्काळ निवारणास प्रथम प्राधान्य - ‘टीमवर्क’ने कामे : अभिजित चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:12 AM

प्रशासकीय कामात मी ‘टीमवर्क’ला महत्त्व देतो. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊनच काम होईल. तरीही सहकार्य न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सध्या जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती

ठळक मुद्देखुलासा योग्य वाटला नाही, तर टाळाटाळ, हलगर्जीपणा करणाºयांवर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सांगली : प्रशासकीय कामात मी ‘टीमवर्क’ला महत्त्व देतो. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊनच काम होईल. तरीही सहकार्य न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सध्या जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच, लवकरच होत असलेल्या निवडणुकीच्या कामकाजास सध्या तरी प्राधान्य असणार आहे, असे प्रतिपादन नूतन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना केले.

बुधवारी कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. चौधरी यांची सांगलीचेजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी रात्रीच त्यांनी मावळते जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडून कार्यभार स्वीकारला होता. गुरुवारी सकाळी प्रथमच ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण कार्यालय हजर होते. महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर, नूतन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विकास देशमुख यांनी डॉ. चौधरी यांचे स्वागत केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी मीनाज मुल्ला, विजया यादव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. स्वागतानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत, भविष्यातील कामकाजाचे नियोजन सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. येत्या काही महिन्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याने, त्याच्या योग्य नियोजनास प्राधान्य देणार आहे. आचारसंहितेअगोदर प्रभावी उपाययोजना करणार आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असल्याने अधिकारी, कर्मचाºयांच्या समन्वयाने निवडणुकीचे कामकाज करणार आहे.

जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, त्यांची सोडवणूक करण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत सविस्तर आढावा घेऊन कार्यवाही केली जाईल.प्रशासकीय कामकाज करताना टीमवर्कला महत्त्व देतो. त्यामुळे येथेही सर्वांना बरोबर घेऊनच कामकाज केले जाईल. मात्र, जे अधिकारी, कर्मचारी जाणीवपूर्वक कामास टाळाटाळ करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

सांगलीतही ‘टास्क फोर्स’ची स्थापनाजनतेची कामे लवकर व्हावीत यासाठी नियोजन करणार आहे. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोल्हापूर महापालिकेत ‘टास्क फोर्स’ होता. त्या पद्धतीने येथेही त्याची स्थापना करणार आहे. कोणत्याही कामाला अधिकारी, कर्मचाऱ्यांना एक ‘टाईम बॉण्ड’ दिला जाईल. त्या मुदतीतही काम झाले नाही, तर त्याचा खुलासा अधिकारी, कर्मचाºयांना द्यावा लागेल. खुलासा योग्य वाटला नाही, तर टाळाटाळ, हलगर्जीपणा करणाºयांवर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सांगलीत गुरूवारी नूतन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांचे महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी स्वागत केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली