शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सांगली जिल्ह्यात महिलांनी चालविले पहिले चारा दान केंद्र -: आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथे सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 2:16 PM

दाट होत चाललेले दुष्काळाचे ढग...पाणी, चाऱ्याविना डोळ्यातून बरसणाऱ्या धारा अशा वातावरणात ओढावलेल्या नैसर्गिक संकटाशी सामना करीत असलेल्या लाखो दुष्काळग्रस्तांचे लक्ष आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथील चारा दान केंद्राने वेधले आहे. चार व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, स्वछता व्यवस्थापन, जमा खर्चाचे नियोजन अशा सर्व गोष्टी महिलांच्या हाती आहेत

ठळक मुद्देतिनशेहून अधिक जनावरांची देखभाल, महिलांच्या हाती जनावरांच्या पालनपोषणाची दोर

सांगली : दाट होत चाललेले दुष्काळाचे ढग...पाणी, चाऱ्याविना डोळ्यातून बरसणाऱ्या धारा अशा वातावरणात ओढावलेल्या नैसर्गिक संकटाशी सामना करीत असलेल्या लाखो दुष्काळग्रस्तांचे लक्ष आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथील चारा दान केंद्राने वेधले आहे. चार व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, स्वछता व्यवस्थापन, जमा खर्चाचे नियोजन अशा सर्व गोष्टी महिलांच्या हाती आहेत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चाललेल्या घुटुगडे वस्तीवरील या केंद्राने तिनशेहून अधिक जनावरांचे पालनपोषण सुरू केले आहे. 

जांभुळणी येथे उगम व बळीराजा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दि ६ मे २0१९ रोजी  'पुण्यकर्म' चारा दान केंद्र सुरू झाले. जनावरांच्या मालकांच्या नावाने तीनशेच्या आसपास जनावरांची भरती झाली. प्रत्यक्ष चारा वाटप सुरू झाले. मालकाचे नाव पुकारल्याबरोबर प्रत्येक वेळी कोणीतरी महिला पुढे येऊन चारा घेऊन जात होती. कुटुंबप्रमुख म्हणून नाव पुरुषाचे आणि चारा न्यायला येते त्या घरातली स्त्री. हे चित्र येथील सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. संदेश पवार यांनी अनुभवले. सर्वच्या सर्व जनावरांचे मालक त्या घरचे पुरुष आहेत आणि इथे जनावरांचे पालनपोषण व काळजी घरची महिला करीत आहे. वास्तविक ग्रामीण भागात घर संभाळण्याबरोबरच घरातील पशुधन सांभाळण्याचा ताण महिलांवरच असतो. जांभुळणीतल्या चारा छत्रात डोंगर-दऱ्यातून चार पाच किलोमीटर पायपीट करून दररोज जनावरांना महिलाच घेऊन येत होत्या. त्यांना प्रचंड त्रास सोसावा लागतोय हे लक्षात येताच या महिलांना जवळ सोयीचे पडेल असे घुटुगडे वस्ती वरचे दुसरे ठिकाण पवार यांनी निवडले आणि त्या ठिकाणी दुसरे चारा छत्र फक्त महिलांनी पुढाकार घेऊन सुरू केले.

या चारा छत्रात जनावरांची नोंद संबंधित महिलेच्या नावावरच घेतली गेली आहे. या केंद्रात चारा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, स्वछता व्यवस्थापन, जमा खर्च आदी सर्व जबाबदाऱ्या केवळ महिला सांभाळत आहेत. या ठिकाणी जवळजवळ ८0  ते १00 जनावरे चारा खाण्यासाठी दररोज दाखल होत असून चारा छत्राचे नियोजन स्थानिक महिला चोखपणे करत आहेत. या चारा केंद्रासाठी दररोज पाच हजार लिटर पाणी पुरवण्याची महत्वपूर्ण जबाबदारी वैशाली दत्तू मुढे यांनी घेतलेली असून जनाबाई एकनाथ घुटुगडे यांनी चारा व्यवस्थापन, मंगल पांडुरंग जुगदर यांनी स्वछता, ताई दत्तात्रय घुटूगडे यांनी जमा-खर्च, हिराबाई दादा घुटुगडे यांनी देखरेख,.वैशाली शहाजी घुटुगडे, सुवर्ण प्रकाश तरंगे यांनी मदतगार म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. महिलांच्या कर्तबगारीचे कौतुकच!याविषयी संदेश पवार म्हणाले की, अस्मानी संकटात खंबीरपणे संसार वाचवणाºया महिलांच्या कर्तबगारीचे कौतुक व्हावे, त्यांच्या धडपडीचा सन्मान व्हावा यासाठी सुवर्णा खंडेलवाल-जोशी यांच्या प्रेरणेतून व भाई संपतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभिनव चारा छत्र यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. संवेदनशील लोकांनी यासाठी साठी साथ द्यावी. थोर महिलांचे स्मरणविशेष म्हणजे या ठिकाणच्या निवाऱ्यांना राजमाता जिजाऊ,  सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, कल्पना चावला यासारख्या थोर महिलांची नावे दिली आहे. त्यांच्या कार्याचा सचित्र सन्मान यानिमित्ताने करण्यात आला आहे. त्यामुळे हे केंद्र अधिक लक्षवेधी ठरले आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीLadies Special Serialलेडीज स्पेशल