शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खते स्वस्त झाली; पण शेतकऱ्यांच्या पदरात नाही आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:25 IST

रिॲलिटी चेक फोटो २३ संतोष ०१ सांगलीसाठी मोठ्या प्रमाणात खते आली असून रेल्वे मालधक्क्यावर उतरवून घेण्याचे काम सुरू आहे. ...

रिॲलिटी चेक

फोटो २३ संतोष ०१

सांगलीसाठी मोठ्या प्रमाणात खते आली असून रेल्वे मालधक्क्यावर उतरवून घेण्याचे काम सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी केल्याचे जाहीर केले असले तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही. दुकानांमध्ये जुन्याच महागड्या किमतीला खत विक्री केली जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची लूट सुरूच आहे.

खरिपाचा हंगाम तोंडावर आल्याने खतांना मागणी वाढली आहे. ऐन लॉकडाऊनमध्ये गेल्या महिनाभरात कंपन्यांनी खतांच्या किमतीत भरमसाट वाढ केली. काही खते तर आवाक्याबाहेर गेली. गोणीमागे ५०० ते ८०० रुपयांनी महागली. सर्व स्तरातून विरोध सुरू होताच केंद्र सरकारने लक्ष घातले व खतांवरील अनुदान वाढविले. त्यामुळे खतांच्या किमती कमी होतील, पूर्ववत जुन्या किमतीला मिळतील, अशी आशा होती. प्रत्यक्षात मात्र तसे घडले नाही. बाजारात जुन्याच महागड्या किमतींना विकत घ्यावी लागत आहेत.

मृग नक्षत्र अद्याप लांब असल्याने सरसकट खतांना अद्याप मागणी नाही; पण उसासाठी डीएपीला प्रचंड मागणी आहे. द्राक्ष काड्यांसाठीही काही प्रमाणात खतांचा वापर सुरू आहे. ही खते वाढीव दराने विकली जात आहेत. कमी झालेल्या दराबाबत दुकानदारांना विचारणा केली असता जुनाच स्टॉक शिल्लक असल्याचे सांगितले जाते. कमी दराचा नवा स्टॉक आलेला नाही, कमी किमतीला पाहिजे असल्यास काही दिवस थांबा, असा सल्ला दिला जातो. नड असलेल्या शेतकऱ्याला थांबण्यासाठी सवड नसते. नाइलाजाने महागड्या किमतीलाच गोणी घ्यावी लागते.

केंद्र शासनाने २० मे रोजी सुधारित मूल्य द्रव्य आधारित अनुदान जाहीर केले. स्फुरद अन्नद्रव्याचे अनुदान वाढविले, त्यामुळे स्फुरदयुक्त खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचा दावा कृषी विभाग करत आहे. बाजारात मात्र प्रत्यक्ष स्थिती वेगळी आहे.

चौकट

- खतांवरील सुधारित अनुदानामुळे किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे नव्या कमी किमतीमध्येच खतांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केले आहे. जुन्याच महागड्या दराने विक्री होत असल्यास आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाकडे तक्रार करण्याचे आवाहनही केले आहे.

- भ्रमणध्वनी क्रमांक ८४४६११७५००, टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ४००० या क्रमांकावर सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत तक्रार करता येईल. त्याशिवाय जिल्ह्याचा नियंत्रण कक्ष, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीतील कृषी अधिकाऱ्यांकडेही दाद मागता येणार आहे.

चौकट

अधिकाऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन करावे

बाजारात सुरू असलेल्या लुटीला आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन केले पाहिजे. खरिपाचा हंगाम अद्याप दोन-तीन आठवडे लांब आहे, तोपर्यंतच अधिकाऱ्यांनी कारवाई करायला हवी. तसे झाले तरच पंधरा दिवसांनी दर कमी होतील अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.

कोट

खताच्या किमती कमी झाल्याचे सरकार सांगत असले तरी बाजारात महागड्या दरानेच विकत घ्यावी लागत आहेत. युरियाव्यतिरिक्त अन्य सर्व खते ५०० रुपयांनी महागली आहेत. खरीप हंगाम तोंडावर असल्याने घेतल्याशिवाय पर्याय नाही.

- बाळासाहेब पाटील, शेतकरी, आरग

खताच्या कमी झालेल्या किमतीनुसार मागणी केली असता स्टॉक संपल्याचे सांगितले जाते. वाढीव किमतीला गोणी घेतली, तरी त्याची पावती मात्र दिली जात नाही. तक्रारीचा सूर दाखवल्यावर खते शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. सरकारने निर्णय घेतला तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही.

- रविकांत साळुंखे, शेतकरी, मल्लेवाडी

पॉइंटर्स

खत खताचे जुने दर खताचे नवे दर

१०-२६-२६ ११७५ १७७५

१२-३२-१६ १२३५ १८००

२०-२०-० ९७५ १३५०

डीएपी ११८५ १९००

सुपर फॉस्फेट ३७० ४७०

२४-२४-० १३५० १९००

२०-२०-०-१३ १०५० १६००

खरिपाचे लागवड क्षेत्र - ३,८४००० हेक्टर.