शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

चांदोली धरणातील पाणी मेपर्यंत संपण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 15:28 IST

पावसाचे आगर समजल्या जाणाºया चांदोली धरण परिसरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशातच वारणेच्या पाण्याची उधळपट्टी सुरू आहे.

 

- गंगाराम पाटील

वारणावती : पावसाचे आगर समजल्या जाणाºया चांदोली धरण परिसरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशातच वारणेच्या पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. वारणेच्या कालव्यामार्फत शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी कालव्यांच्या दुरवस्थेमुळे वाया जात आहे. अशातच गतवर्षीच्या तुलनेत यंदा आजच्या तारखेला धरणात ६.७४ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. सध्या धरणातून नदीमार्फत १ हजार ४१८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दि. ११ एप्रिलअखेर हाच पाणीसाठा ९.३० टीएमसी आहे.

ही आकडेवारी पाहता, आठवड्यात एक टीएमसी पाणी कमी होत आहे. थोडक्यात, ही वस्तुस्थिती अशीच राहिल्यास मेअखेर धरणाच्या पाण्याने तळ गाठलेला असेल. साधारण १५ जूनपासून पावसाला सुरुवात होते, असा अंदाज बांधला, तर उर्वरित पंधरा दिवस वारणा पट्ट्यात तीव्र पाणी टंचाई जाणवणार आहे. या ना त्या कारणाने पाण्याची मागणी वाढल्यास धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवावा लागणार आहे. हा विसर्ग वाढवला तर, मे महिन्याआधी ऐन उन्हाळ्यातच धरण कोरडे पडणार आहे.

चांदोली परिसरात गतवर्षी २ हजार ९६५ मिलिमीटर पाऊस पडला होता. धरणही शंभर टक्के भरले होते. गेल्या पंधरा-वीस वर्षांचा इतिहास पाहता, तीस जूनपर्यंत पुरेसा पाणीसाठा धरणात असायचा. यंदा मात्र नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याच्या मागणीतही वाढ होणे स्वाभाविक आहे.

मात्र मागणीप्रमाणे पाणी सोडून पावसाळ्यापूर्वीच रखरखत्या उन्हात अर्थात मेमध्ये धरण कोरडे ठणठणीत करणे हे कितपत योग्य आहे? वरिष्ठ स्तरावर याचा विचार करून शिल्लक पाण्याचे योग्य ते नियोजन करणे  तसेच वारणा पट्ट्यातील नागरिकांनीही भविष्यातील पाणी टंचाई विचारात घेऊन वारणेच्या पाण्याचा जाब विचारणे गरजेचे   आहे. अन्यथा कधी नव्हे ते वारणा पट्ट्याला दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाईSangliसांगली