शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी न केल्यास शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील; राजू शेट्टी, संजय पाटील यांचा राज्य सरकारला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 15:58 IST

राज्यातील शेतकऱ्यांची ३० हजार कोटी कर्जमाफी होऊ शकते

सांगली : शासनाच्या कर्जमाफीनुसार राज्यातील शेतकऱ्यांना ३० हजार कोटी रुपयांपर्यंत कर्जमाफी होऊ शकते. शासनाने एक उच्च अधिकार समिती गठित करून जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामध्ये कोणतीही मर्यादा न घालता सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास राज्यातील शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी व माजी खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.राजू शेट्टी म्हणाले, चालू वर्षे ३० हजार कोटी थकबाकी आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झालेल्या चर्चेत थकीत असणारे कर्ज माफ करावे, अशी मागणी केली. यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. जो निव्वळ शेतकरी आहे, त्याचे कर्ज सरसकट माफ करा, अशीच आमची मागणी आहे.

वाचा - सांगली जिल्ह्यात ऊस दराबाबत बुधवारी निर्णय?, जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक

मात्र, यात पूर्वीप्रमाणे कर्ज मर्यादा घालू नयेत. राज्यात दर दोन तासांत एक शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतीमालाला भाव नाही, मोठ्या प्रमाणात शेती पडीक होत आहे. अतिवृष्टीमुळे द्राक्षासह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याला सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे.

फळबागांसाठी वेगळा निकष असावा : माजी खासदार संजय पाटीलमाजी खासदार संजय पाटील म्हणाले, सांगली, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष पीक आहे. यंदा द्राक्ष पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे द्राक्षे बागा, डाळिंब पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मदत मिळाली. मात्र, ही मदत शेतकऱ्यांना पुरेशी नाही, एकरी अडीच ते तीन लाख केवळ उत्पादन खर्च आहे.

केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेतून २४०० कोटी शेतकऱ्यांचे कर्ज आहे, ते माफ करायला जून २०२६ उजडणार आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांंची थकबाकी वसूल होऊ नये. शिवाय, सीबिल खराब नको, आशा मागण्या आम्ही शासनाकडे करणार आहोत. शासनानेही बँकांना मदत केली पाहिजे. कर्जमाफीत कुणाला माफी देणार तेही शासनाने जाहीर करावे, अशीही त्यांनी मागणी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer leaders warn government: face protests if loan waivers delayed.

Web Summary : Farmer leaders warn of renewed protests if blanket loan waivers aren't granted. They demand immediate debt relief without limits, citing farmer suicides and crop losses due to natural disasters. They seek special consideration for fruit farmers.