शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यात भू-विकास बँकांच्या कर्जमाफीचा भूलभुलैया, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार तरी कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 17:17 IST

भाजप सरकारच्या काळातही असाच पोकळ निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही.

सांगली : राज्यातील भू-विकास बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देऊन १० महिने उलटले तरी, अद्याप त्याबाबत कोणताही लेखी आदेश निघाला नाही. भाजप सरकारच्या काळातही असाच पोकळ निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. कर्जमाफीचा हा भूलभुलैया संपून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्यातील भू-विकास बँकेतील ३४ हजार ७७८ थकबाकीदार कर्जदारांचे ९६४ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १८ ऑगस्ट २०२१ रोजी मंत्रालयातील एका बैठकीत दिले होते. तसेच ११ मार्चरोजी विधानसभेतही त्यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर राज्यभरातील भू-विकास बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला. आता दहा महिन्यांनंतर त्यांच्या पदरी निराशा आली आहे.भाजप सरकारच्या काळात भू-विकास बँकांच्या प्रश्नावर मंत्रिमंडळ उपसमिती नियुक्त करण्यात आली होती. त्यात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे, तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश होता. भाजप सरकारनेही कर्जमाफी योजनेची घोषणा केली, पण लेखी आदेश काढले नाहीत. समितीने राज्यातील भू-विकास बँकांच्या मालमत्तांच्या हस्तांतराची घोषणा केली होती. त्यांनीही पूर्ण सत्ताकाळात या घोषणेची अंमलबजावणी केली नाही.

महाविकास आघाडीकडून बँक कर्मचारी संघटनेसह शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केला होता. प्रत्यक्षात शेतकरी प्रतीक्षा करून थकले तरी, कर्जमाफीचा आदेशही आला नाही.

कर्मचाऱ्यांना मिळणारा दिलासाही क्षणिकराज्यातील भू-विकास बँकांच्या कर्मचारी संघटनेनेही प्रदीर्घ काळ शासनाशी संघर्ष केला. थकीत वेतन व अन्य अशी २७५ कोटी रुपयांची कर्मचाऱ्यांची देणीही भागविण्याचे आदेश अजित पवारांनी दिले होते. त्याबाबतही ठोस पाऊल शासनाने टाकले नाही. त्यामुळे हा प्रश्न तसाच लटकला आहे.

बँका वाचविण्यासाठी प्रयत्नच नाहीत

राज्यातील भू-विकास बँका वाचविल्या जाऊ शकतात, याबाबत चाैगुले समितीने काही शिफारसीही केल्या होत्या, मात्र कोणत्याही सरकारने ना बँका वाचविण्यासाठी पावले उचलली ना थकीत कर्ज व कर्मचाऱ्यांची देणी भागविण्यासाठी ठोस निर्णय घेतला.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकFarmerशेतकरी