शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

Sangli: शेतकरी संघटनेने कर्नाटकातील साखर वाहतूक रोखली, राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन

By शीतल पाटील | Updated: October 17, 2023 14:44 IST

'वेळप्रसंगी साखरेचे ट्रक जाळणार'

इस्लामपूर : गतवर्षी गाळप केलेल्या उसाला दिवाळीआधी १ हजार रुपये द्या. चालू गळीत हंगामात प्रतिटन ५ हजार रुपये भाव द्यावा, अन्यथा दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी, अशी मागणी करत रघुनाथदादा पाटीलप्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हणमंतराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील येडेनिपाणी - कामेरीदरम्यान बेळगाव येथून मुंबईकडे जाणाऱ्या शिवशक्ती कारखान्याची साखर वाहतूक तासभर रोखून धरली. उद्यापासून गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा देत वाहने सोडण्यात आली.सोमवारी रात्री ९:०० च्या सुमारास बेळगावहून मुंबईकडे जाणारा साखरेचा भरलेला ट्रक येडेनिपाणी - कामेरी दरम्यान आशियाई महामार्गावर शिवशक्ती शुगर बिद्री कारखान्याची ३५ टन साखर भरलेला ट्रक अडवून ट्रक चालकास दोन तास थांबवून ठेवण्यात आले. कारखाना प्रशासनाने पुन्हा साखर पाठवणार नाही, असे सांगितल्यावरच ट्रक सोडला. जोपर्यंत कोल्हापूर, सांगली, सातारा सर्व कारखानदार मागील वर्षीच्या गाळप केलेल्या उसाला दिवाळीआधी १ हजार रुपये, चालू गळीत हंगामात प्रतिटन ५ हजार रुपये भाव द्यावा, हे जमत नसेल तर दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.यावेळी शेतकरी संघटना युवा आघाडी अध्यक्ष प्रणव पाटील, विनोद चव्हाण, वैभव दाइंगडे, कृष्णात पाटील, दीपक पवार, अविनाश चव्हाण उपस्थित होते.

वेळप्रसंगी साखरेचे ट्रक जाळणार : हणमंत पाटीलमंगळवारपासून सांगली जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी दोन दिवसांच्या आत निर्णय घेतला नाही तर गनिमी काव्याने मुंबईला जाणारी साखर, दूध, भाजीपाला बंद करणार. वेळप्रसंगी साखरेचे ट्रक ही जाळणार. कोणताही शेतीमाल मुंबई पुण्यास जाऊ देणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील एकही दुधाचा टँकर कोणत्याही मार्गे जाऊ देणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना