शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

सांगलीतील शेटफळे येथे 'शक्तिपीठ'च्या मोजणीस शेतकऱ्यांचा विरोध, मोजणी पथकाला जावे लागले माघारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:31 IST

एकरी दीड कोटींच्या भरपाईबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

आटपाडी : शेटफळे (ता. आटपाडी) येथून जात असणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी होत असणाऱ्या मोजणीस विरोध केला. आधी एकरी दीड कोटी रुपये भरपाई जाहीर करावी मगच मोजणी करावी, असा पवित्रा घेतल्याने मोजणी न करताच मोजणी पथकाला माघारी जावे लागले आहे. दरम्यान याबाबत उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल व तहसीलदार सागर ढवळे यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला आहे.शेटफळे येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी ‘महामार्गाला विरोध नाही, मात्र आधी एकरी दीड कोटी रुपये भरपाई जाहीर करा, मगच मोजणीसाठी शेतात पाय ठेवा’, अशी आक्रमक भूमिका घेतली. शक्तिपीठ महामार्ग आटपाडी तालुक्यातील शेटफळेमधून जाणार आहे. याबाबत काही महिन्यांपूर्वी निशाणी केल्या होत्या. गावातील ६३ गटातील दीडशे एकर क्षेत्रातून हा महामार्ग जाणार आहे. यामध्ये २०० हून अधिक शेतकरी बाधित होणार आहेत.शेतकऱ्यांनी तेथे बंगले बांधले आहेत. डाळिंब, द्राक्षबागा, शेततळी, विहिरी, जलवाहिन्या आहेत. पाणी आल्याने तलावातील गाळ भरून शेती विकसित केली आहे. या शेतीतून उत्पन्न सुरू झाले आहे. महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. परिणामी अनेक शेतकरी कायमचे विस्थापित होण्याची भीती आहे.

शेतकऱ्यांना भीती घालण्याचा प्रयत्नमोजणीस विरोध केल्यानंतर प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी आयोजित केलेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भरपाईवर चर्चा न होता. अधिकारी कायद्याची भीती दाखवतात. विरोध कराल तर भरपाई कमी देऊ. न्यायालयात गेल्यास आणखी कमी भरपाई देऊ, अशी भीती घातली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे शेतकरी आणखी संतप्त झाले आहेत. ‘आधी भरपाई जाहीर करा, मग पुढील प्रक्रिया राबवा. भीती दाखवणे थांबवा, अन्यथा महामार्गालाच विरोध करू,’ अशी भूमिका शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर घेतली.

शेतकऱ्यांचा विरोध 'शक्तिपीठ'ला नाही. आधी भरपाई एकरी दीड कोटी जाहीर करावी. मात्र तसे न करता अधिकारी भीती दाखवत आहेत. - शशिकांत मोरे, बाधित शेतकरीशक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना भरपाई कोणत्याप्रकारे व कशी मिळणार आहे, याची माहिती दिली आहे. त्यांचा महामार्गास विरोध नाही. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - डॉ. विक्रम बांदल, उपविभागीय अधिकारी विटा.

टॅग्स :SangliसांगलीShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गFarmerशेतकरी