शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
2
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
3
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
4
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
5
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
6
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
7
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
8
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
9
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
10
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
11
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
12
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
13
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
14
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
15
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
16
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
17
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
18
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
19
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
20
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांची नैसर्गिक शेतीकडे वाटचाल : ‘झिरो बजेट’ तंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 23:05 IST

मिरज पूर्व भागाची दर्जेदार आणि विलक्षण गोडीच्या द्राक्षांसाठी ओळख आहे. मात्र, आता या द्राक्षांना रसायनमुक्त द्राक्षे अशी नवीन ओळख निर्माण होत आहे. हे काम आरग (ता. मिरज) येथील सुहास शेट्टी यांच्यासह काही शेतकरी करत आहेत.

ठळक मुद्दे आरगच्या सुहास शेट्टी यांनी पिकवली रसायनमुक्त द्राक्षेभाजीपाल्यासह गहू, हरभरा पिकांचाही निसर्गाच्या कुशीत नवा बहर

लिंगनूर : मिरज पूर्व भागाची दर्जेदार आणि विलक्षण गोडीच्या द्राक्षांसाठी ओळख आहे. मात्र, आता या द्राक्षांना रसायनमुक्त द्राक्षे अशी नवीन ओळख निर्माण होत आहे. हे काम आरग (ता. मिरज) येथील सुहास शेट्टी यांच्यासह काही शेतकरी करत आहेत. रासायनिक व सेंद्रिय शेतीला फाटा देत त्यांनी ‘झिरो बजेट’ शेतीतून भरघोस उत्पादन घेतले आहे.

रसायनमुक्त शेतीची संकल्पना मांडणारे डॉ. सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास शेट्टी यांनी झिरो बजेट शेतीची सुरुवात केली आहे. झिरो बजेट शेतीमुळे रासायनिक, सेंद्रिय खतांचा वापर टाळून त्यांनी केवळ जीवामृत आणि गोमूत्र, शेणखताचा वापर केला आहे. त्यामुळे मागील वर्षापेक्षा यंदा जास्त उत्पादन होऊन त्यांच्या उत्पादन खर्चात ८० टक्केची बचत झाली आहे. केवळ जीवामृत आणि शेणखताचा वापर केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या रसायनमुक्त द्राक्षांना व्यापाºयांकडून जास्त दराने मागणी होऊ लागली आहे. याच संकल्पनेवर टोमॅटो, दोडका, अन्य भाजीपाला, गहू, शाळू, हरभरा अशी पिके घेतली असून, रसायनमुक्त शेतीचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. यातून प्रेरणा घेत श्रीकांत मगदूम (लिंगनूर), सुरेश चौगुले, सागाप्पा पाटील (खटाव), पुनीत विवेकी यांनीसुद्धा दर्जेदार द्राक्षे पिकवली आहेत.चार एकरासाठी दीड लाखगतवर्षी ४ एकर द्राक्षबागेसाठी ७ लाख इतका उत्पादन खर्च झाला होता. मात्र यंदा नैसर्गिक विषमुक्त शेतीमुळे १ ते दीड लाख इतकाच खर्च झाला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चातील रक्कमही येणाºया नफ्यात आल्याने एकूण नफ्यात ८० टक्केनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी एक कणही रासायनिक खत अथवा सेंद्रिय खताचा वापर केलेला नाही.देशी व गीर गाईची मागणीमिरज पूर्व भागातील लिंगनूर, आरग, खटाव परिसरातील द्राक्षबागायतदारांचा नैसर्गिक शेतीकडे ओढा वाढला आहे. पद्मश्री सुभाष पाळेकर यांना कोणत्याही रसायनिक औषधे व खताशिवाय देशी गाईचे शेण, मूत्रापासून बनवलेल्या जीवामृतावर द्राक्षबागेचे चांगले उत्पादन मिळू लागले आहे. तसेच गाईपासून दूध तर मिळतेच, पण गोमूत्राचा औषध म्हणून वापर होऊ लागला आहे. त्यामुळे देशी व गीर गार्इंना मागणी वाढली आहे. 

शेती करताना अवाजवी उत्पादन खर्च व उत्पादनास मिळणाºया कमी भावामुळे शेती परवडत नाही. त्यामुळे शेतकºयांनी डॉ. सुभाष पाळेकर यांनी सांगितलेल्या नैसर्गिक, रसायनमुक्त शेतीचा अवलंब केल्यास शेतकºयांना फायदेशीर ठरेल.- सुहास शेट्टी, द्राक्ष उत्पादक शेतकरी

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी