शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांची नैसर्गिक शेतीकडे वाटचाल : ‘झिरो बजेट’ तंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 23:05 IST

मिरज पूर्व भागाची दर्जेदार आणि विलक्षण गोडीच्या द्राक्षांसाठी ओळख आहे. मात्र, आता या द्राक्षांना रसायनमुक्त द्राक्षे अशी नवीन ओळख निर्माण होत आहे. हे काम आरग (ता. मिरज) येथील सुहास शेट्टी यांच्यासह काही शेतकरी करत आहेत.

ठळक मुद्दे आरगच्या सुहास शेट्टी यांनी पिकवली रसायनमुक्त द्राक्षेभाजीपाल्यासह गहू, हरभरा पिकांचाही निसर्गाच्या कुशीत नवा बहर

लिंगनूर : मिरज पूर्व भागाची दर्जेदार आणि विलक्षण गोडीच्या द्राक्षांसाठी ओळख आहे. मात्र, आता या द्राक्षांना रसायनमुक्त द्राक्षे अशी नवीन ओळख निर्माण होत आहे. हे काम आरग (ता. मिरज) येथील सुहास शेट्टी यांच्यासह काही शेतकरी करत आहेत. रासायनिक व सेंद्रिय शेतीला फाटा देत त्यांनी ‘झिरो बजेट’ शेतीतून भरघोस उत्पादन घेतले आहे.

रसायनमुक्त शेतीची संकल्पना मांडणारे डॉ. सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास शेट्टी यांनी झिरो बजेट शेतीची सुरुवात केली आहे. झिरो बजेट शेतीमुळे रासायनिक, सेंद्रिय खतांचा वापर टाळून त्यांनी केवळ जीवामृत आणि गोमूत्र, शेणखताचा वापर केला आहे. त्यामुळे मागील वर्षापेक्षा यंदा जास्त उत्पादन होऊन त्यांच्या उत्पादन खर्चात ८० टक्केची बचत झाली आहे. केवळ जीवामृत आणि शेणखताचा वापर केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या रसायनमुक्त द्राक्षांना व्यापाºयांकडून जास्त दराने मागणी होऊ लागली आहे. याच संकल्पनेवर टोमॅटो, दोडका, अन्य भाजीपाला, गहू, शाळू, हरभरा अशी पिके घेतली असून, रसायनमुक्त शेतीचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. यातून प्रेरणा घेत श्रीकांत मगदूम (लिंगनूर), सुरेश चौगुले, सागाप्पा पाटील (खटाव), पुनीत विवेकी यांनीसुद्धा दर्जेदार द्राक्षे पिकवली आहेत.चार एकरासाठी दीड लाखगतवर्षी ४ एकर द्राक्षबागेसाठी ७ लाख इतका उत्पादन खर्च झाला होता. मात्र यंदा नैसर्गिक विषमुक्त शेतीमुळे १ ते दीड लाख इतकाच खर्च झाला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चातील रक्कमही येणाºया नफ्यात आल्याने एकूण नफ्यात ८० टक्केनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी एक कणही रासायनिक खत अथवा सेंद्रिय खताचा वापर केलेला नाही.देशी व गीर गाईची मागणीमिरज पूर्व भागातील लिंगनूर, आरग, खटाव परिसरातील द्राक्षबागायतदारांचा नैसर्गिक शेतीकडे ओढा वाढला आहे. पद्मश्री सुभाष पाळेकर यांना कोणत्याही रसायनिक औषधे व खताशिवाय देशी गाईचे शेण, मूत्रापासून बनवलेल्या जीवामृतावर द्राक्षबागेचे चांगले उत्पादन मिळू लागले आहे. तसेच गाईपासून दूध तर मिळतेच, पण गोमूत्राचा औषध म्हणून वापर होऊ लागला आहे. त्यामुळे देशी व गीर गार्इंना मागणी वाढली आहे. 

शेती करताना अवाजवी उत्पादन खर्च व उत्पादनास मिळणाºया कमी भावामुळे शेती परवडत नाही. त्यामुळे शेतकºयांनी डॉ. सुभाष पाळेकर यांनी सांगितलेल्या नैसर्गिक, रसायनमुक्त शेतीचा अवलंब केल्यास शेतकºयांना फायदेशीर ठरेल.- सुहास शेट्टी, द्राक्ष उत्पादक शेतकरी

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी