शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांची नैसर्गिक शेतीकडे वाटचाल : ‘झिरो बजेट’ तंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 23:05 IST

मिरज पूर्व भागाची दर्जेदार आणि विलक्षण गोडीच्या द्राक्षांसाठी ओळख आहे. मात्र, आता या द्राक्षांना रसायनमुक्त द्राक्षे अशी नवीन ओळख निर्माण होत आहे. हे काम आरग (ता. मिरज) येथील सुहास शेट्टी यांच्यासह काही शेतकरी करत आहेत.

ठळक मुद्दे आरगच्या सुहास शेट्टी यांनी पिकवली रसायनमुक्त द्राक्षेभाजीपाल्यासह गहू, हरभरा पिकांचाही निसर्गाच्या कुशीत नवा बहर

लिंगनूर : मिरज पूर्व भागाची दर्जेदार आणि विलक्षण गोडीच्या द्राक्षांसाठी ओळख आहे. मात्र, आता या द्राक्षांना रसायनमुक्त द्राक्षे अशी नवीन ओळख निर्माण होत आहे. हे काम आरग (ता. मिरज) येथील सुहास शेट्टी यांच्यासह काही शेतकरी करत आहेत. रासायनिक व सेंद्रिय शेतीला फाटा देत त्यांनी ‘झिरो बजेट’ शेतीतून भरघोस उत्पादन घेतले आहे.

रसायनमुक्त शेतीची संकल्पना मांडणारे डॉ. सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास शेट्टी यांनी झिरो बजेट शेतीची सुरुवात केली आहे. झिरो बजेट शेतीमुळे रासायनिक, सेंद्रिय खतांचा वापर टाळून त्यांनी केवळ जीवामृत आणि गोमूत्र, शेणखताचा वापर केला आहे. त्यामुळे मागील वर्षापेक्षा यंदा जास्त उत्पादन होऊन त्यांच्या उत्पादन खर्चात ८० टक्केची बचत झाली आहे. केवळ जीवामृत आणि शेणखताचा वापर केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या रसायनमुक्त द्राक्षांना व्यापाºयांकडून जास्त दराने मागणी होऊ लागली आहे. याच संकल्पनेवर टोमॅटो, दोडका, अन्य भाजीपाला, गहू, शाळू, हरभरा अशी पिके घेतली असून, रसायनमुक्त शेतीचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. यातून प्रेरणा घेत श्रीकांत मगदूम (लिंगनूर), सुरेश चौगुले, सागाप्पा पाटील (खटाव), पुनीत विवेकी यांनीसुद्धा दर्जेदार द्राक्षे पिकवली आहेत.चार एकरासाठी दीड लाखगतवर्षी ४ एकर द्राक्षबागेसाठी ७ लाख इतका उत्पादन खर्च झाला होता. मात्र यंदा नैसर्गिक विषमुक्त शेतीमुळे १ ते दीड लाख इतकाच खर्च झाला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चातील रक्कमही येणाºया नफ्यात आल्याने एकूण नफ्यात ८० टक्केनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी एक कणही रासायनिक खत अथवा सेंद्रिय खताचा वापर केलेला नाही.देशी व गीर गाईची मागणीमिरज पूर्व भागातील लिंगनूर, आरग, खटाव परिसरातील द्राक्षबागायतदारांचा नैसर्गिक शेतीकडे ओढा वाढला आहे. पद्मश्री सुभाष पाळेकर यांना कोणत्याही रसायनिक औषधे व खताशिवाय देशी गाईचे शेण, मूत्रापासून बनवलेल्या जीवामृतावर द्राक्षबागेचे चांगले उत्पादन मिळू लागले आहे. तसेच गाईपासून दूध तर मिळतेच, पण गोमूत्राचा औषध म्हणून वापर होऊ लागला आहे. त्यामुळे देशी व गीर गार्इंना मागणी वाढली आहे. 

शेती करताना अवाजवी उत्पादन खर्च व उत्पादनास मिळणाºया कमी भावामुळे शेती परवडत नाही. त्यामुळे शेतकºयांनी डॉ. सुभाष पाळेकर यांनी सांगितलेल्या नैसर्गिक, रसायनमुक्त शेतीचा अवलंब केल्यास शेतकºयांना फायदेशीर ठरेल.- सुहास शेट्टी, द्राक्ष उत्पादक शेतकरी

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी