शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

इस्लामपुरातील महावितरणच्या कार्यालयास शेतकऱ्यांनी ठोकले टाळे, पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 14:33 IST

वाळवा तालुक्यातील अनेक गावांमधील शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने वीज वितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले.

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील अनेक गावांमधील शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने वीज वितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट आणि शाब्दिक चकमक उडाली. तासाभराच्या या आक्रमक आंदोलनानंतर विजेचा पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.

स्वाभिमानीचे भागवत जाधव म्हणाले, माजी खासदार राजू शेट्टी यांनी गेली १३ दिवस महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या व धरणे आंदोलन केले होते. वाळवा तालुक्यातील शेतीचे वीज बिलाची दुरुस्ती केल्याशिवाय एक पैसुद्धा भरणार नाही. होणाऱ्या रोषाला महावितरण जबाबदार राहील. शेतकऱ्यांनी ताबडतोब वीज बिले दुरुस्ती करून घ्यावे.

इस्लामपूर उपविभागाचे उपअभियंता एस. बी. कारंडे यांची गाडी रोखली. महावितरणच्या कार्यालयाला कुलपे लावली. शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपअभियंता कारंडे म्हणाले, वीज बिल दुरुस्तीसाठी गावनिहाय मेळावे घेतले जाणार आहेत. यात शेतकऱ्यांनी आपली वीज बिले दुरुस्त करून घ्यावीत.

आंदोलन सुरू असतानाच वाळवा तालुक्यातील ताबंवे, धोत्रेवाडी, येवलेवाडी, कासेगाव, नवेखेड, जुनेखेड शिरगाव, वाळवा, भवानीनगर, बिचुद, येडेमच्छींद्र या गावातील वीज जोडण्या व विद्युत प्रवाह खंडित केलेली डीपी सुरू करण्यात आले. करांडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.

यावेळी रविकिरण माने, ब्रह्मानंद पाटील, शिवाजी पाटील, एस. यू. संदे, शिवाजी मोरे, अधिक जाधव, संजय पाटील, अवधूत जाधव, प्रदीप माने, अवधूत पाटील, किरण पाटील, किरण सुतार, रमेश पाटील, सुभाष शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीelectricityवीजSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना