शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या बहिणींची सुरक्षा करण्यात सत्ताधारी अपयशी, शरद पवार यांची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 12:09 IST

'महाराष्ट्र सावरण्याची व पुढे नेण्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर टाकतोय'

इस्लामपूर (जि. सांगली) :  सत्तेचा दर्प चढलेल्या राज्य आणि केंद्रातील सरकारला लोकसभा निवडणुकीत जनतेने जागा दाखवल्यावर त्यांना अनेक योजना आठवत आहेत. त्यातच त्यांना लाडकी  बहिण आठवली. मात्र तिची सुरक्षा करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सत्ता कोणाच्या हाती द्यायची? सन्मान करणाऱ्यांच्या ? की अत्याचार करणाऱ्यांच्या याचा निर्णय आता जनतेनेच घ्यायचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.इस्लामपूर येथील खुल्या नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या  शिवस्वराज्य यात्रेची सांगता खा. पवार यांच्या उपस्थितीत झाली. मुसळधार पाऊस पडूनही वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत पवार यांना दाद दिली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, नीलेश लंके, आमदार सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, माजी खासदार श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, आम्ही महाराष्ट्रातील बहिणींच्या सन्मानासाठी कायमस्वरूपी व टिकाऊ निर्णय घेतले. त्यामुळे आमच्या माता-भगिनी सरपंच, सभापती, अध्यक्ष व महापौर झाल्या. लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेने सत्ताधाऱ्यांना जागा दाखविली. आता अडचणीत आल्यावर त्यांना लाडक्या बहिणीची आठवण झाली आहे. म्हणून त्यांच्या हातावर काही रक्कम ठेवली जातेय. पण, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार झाले. पुण्यातील सासवडजवळ अत्याचार झाला. सांगलीत चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार झाला. ही अत्याचाराची परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली, याचा विचार जनतेने करायला हवा.महाराष्ट्र मागे गेला..हल्ली ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यामुळे महाराष्ट्र एकाही क्षेत्रात पुढे नाही. दक्षिण व उत्तरेकडील काही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मागे गेलेला दिसतो. महाराष्ट्र सावरायचा व पूर्व स्थितीत आणण्याचे काम आम्हाला करायचे आहे. त्याची सुरुवात आज साखराळेतून (ता. वाळवा) होत आहे. या वाळवा व शिराळा तालुक्यातून देशाच्या स्वातंत्र्याचा संघर्ष सुरू झाल्याचा इतिहास आहे. बिळाशीचा सत्याग्रह येथून झाला. राजारामबापू पाटील यांनी येथूनच साखर कारखान्याची सुरुवात केली. आता महाराष्ट्र सावरण्याची व पुढे नेण्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर टाकतोय, असे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Jayant Patilजयंत पाटीलladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा