शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विस्तारित म्हैसाळ योजना जागतिक बँकेच्या निधीतून, जलसंपदाचा प्रस्ताव तयार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 14:36 IST

दुष्काळी भागासाठीच्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा जत तालुक्यातील १२५ गावांपैकी ७७ गावांना लाभ मिळत आहे.

अशोक डोंबाळेसांगली : जत पूर्व भागातील ६५ गावांसाठी विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचा आराखडा दोन दिवसात राज्य शासनाकडे देण्यात येणार आहे. प्रस्तावित खर्च १९२८ कोटीचा असून हा निधी जागतिक बँकेकडून मिळणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत योजनेस मंजुरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.दुष्काळी भागासाठीच्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा जत तालुक्यातील १२५ गावांपैकी ७७ गावांना लाभ मिळत आहे. तेथे योजनेची ८५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर पूर्व भागातील ६५ गावांना पाणी देण्याचा प्रस्ताव तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी तयार केला होता; परंतु मंजुरीच्या प्रक्रियेत असतानाच त्यांचे सरकार गेल्यामुळे प्रक्रिया ठप्प झाली होती. जत पूर्वभागातील गावांच्या उठावानंतर या योजनेच्या मंजुरी प्रक्रियेला पुन्हा गती मिळाली आहे.विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना नावाने प्रस्तावित योजनेसाठी मूळ म्हैसाळ योजनेतील टप्पा क्रमांक तीन म्हणजे बेडग (ता. मिरज) येथून थेट पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी सहा टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. त्यातून ६५ गावांतील ५० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेला दि. २० डिसेंबरपर्यंत मंजुरी देऊन प्रत्यक्षात कामाचे उद्घाटन ३१ डिसेंबरपूर्वी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने त्यांनी शासकीय यंत्रणेला तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव तयार असून दोन दिवसात तो राज्य शासनाकडे सादर होणार आहे, असे सांगण्यात आले. प्रस्तावित खर्च १९२८ कोटीचा असून हा निधी जागतिक बँकेकडून मिळणार आहे.

अशी असणार योजना

  • जत पूर्व भागातील ६५ गावांसाठी १९२८ कोटी रुपये प्रस्तावित खर्च
  • पन्नास हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार
  • बेडगपासून ५७ किलोमीटरच्या पूर्ण बंदिस्त पाईपद्वारे पाणीपुरवठा
  • बेडग-म्हैसाळ ११.७० किलोमीटर लांब मुख्य जलवाहिनीतून पाणी उपसा
  • पंपगृह, वितरण हौदासाठीचे किरकोळ भूसंपादन करावे लागणार
  • योजनेसाठी ६ टीएमसी पाणी उपलब्ध

असे पोहोचणार मल्ल्याळपर्यंत पाणीयोजनेत सध्याच्या म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक तीन बेडगमधून तीन टप्प्यात १८० मीटर इतक्या उंचीवर पाणी नेले जाईल. बेडग ते बसाप्पाचीवाडी नाला, बसाप्पाचीवाडीत ते मिरवाड तलाव आणि मिरवाड तलाव ते मल्ल्याळ (ता. जत) असे तीन टप्पे असतील. मल्ल्याळ डोंगरावरून नैसर्गिक उताराने हे पाणी जत तालुक्यातील कोसारी ते उमदी परिसरातील सर्व गावांना दिले जाणार आहे.

शासनाच्या आदेशानुसार योजनेचा प्रस्ताव तयार आहे. प्रस्तावित खर्च १९२८ कोटी रुपयांचा आहे. तीन टप्प्यात पाणी उचलून ते मल्ल्याळ येथून नैसर्गिक उताराने वंचित ६५ गावांना पाणी देण्यात येणार आहे. दोन दिवसात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. - महेश रासनकर, कार्यकारी अभियंता, ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटdroughtदुष्काळWaterपाणी