शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

विस्तारित म्हैसाळ योजना जागतिक बँकेच्या निधीतून, जलसंपदाचा प्रस्ताव तयार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 14:36 IST

दुष्काळी भागासाठीच्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा जत तालुक्यातील १२५ गावांपैकी ७७ गावांना लाभ मिळत आहे.

अशोक डोंबाळेसांगली : जत पूर्व भागातील ६५ गावांसाठी विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचा आराखडा दोन दिवसात राज्य शासनाकडे देण्यात येणार आहे. प्रस्तावित खर्च १९२८ कोटीचा असून हा निधी जागतिक बँकेकडून मिळणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत योजनेस मंजुरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.दुष्काळी भागासाठीच्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा जत तालुक्यातील १२५ गावांपैकी ७७ गावांना लाभ मिळत आहे. तेथे योजनेची ८५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर पूर्व भागातील ६५ गावांना पाणी देण्याचा प्रस्ताव तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी तयार केला होता; परंतु मंजुरीच्या प्रक्रियेत असतानाच त्यांचे सरकार गेल्यामुळे प्रक्रिया ठप्प झाली होती. जत पूर्वभागातील गावांच्या उठावानंतर या योजनेच्या मंजुरी प्रक्रियेला पुन्हा गती मिळाली आहे.विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना नावाने प्रस्तावित योजनेसाठी मूळ म्हैसाळ योजनेतील टप्पा क्रमांक तीन म्हणजे बेडग (ता. मिरज) येथून थेट पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी सहा टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. त्यातून ६५ गावांतील ५० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेला दि. २० डिसेंबरपर्यंत मंजुरी देऊन प्रत्यक्षात कामाचे उद्घाटन ३१ डिसेंबरपूर्वी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने त्यांनी शासकीय यंत्रणेला तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव तयार असून दोन दिवसात तो राज्य शासनाकडे सादर होणार आहे, असे सांगण्यात आले. प्रस्तावित खर्च १९२८ कोटीचा असून हा निधी जागतिक बँकेकडून मिळणार आहे.

अशी असणार योजना

  • जत पूर्व भागातील ६५ गावांसाठी १९२८ कोटी रुपये प्रस्तावित खर्च
  • पन्नास हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार
  • बेडगपासून ५७ किलोमीटरच्या पूर्ण बंदिस्त पाईपद्वारे पाणीपुरवठा
  • बेडग-म्हैसाळ ११.७० किलोमीटर लांब मुख्य जलवाहिनीतून पाणी उपसा
  • पंपगृह, वितरण हौदासाठीचे किरकोळ भूसंपादन करावे लागणार
  • योजनेसाठी ६ टीएमसी पाणी उपलब्ध

असे पोहोचणार मल्ल्याळपर्यंत पाणीयोजनेत सध्याच्या म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक तीन बेडगमधून तीन टप्प्यात १८० मीटर इतक्या उंचीवर पाणी नेले जाईल. बेडग ते बसाप्पाचीवाडी नाला, बसाप्पाचीवाडीत ते मिरवाड तलाव आणि मिरवाड तलाव ते मल्ल्याळ (ता. जत) असे तीन टप्पे असतील. मल्ल्याळ डोंगरावरून नैसर्गिक उताराने हे पाणी जत तालुक्यातील कोसारी ते उमदी परिसरातील सर्व गावांना दिले जाणार आहे.

शासनाच्या आदेशानुसार योजनेचा प्रस्ताव तयार आहे. प्रस्तावित खर्च १९२८ कोटी रुपयांचा आहे. तीन टप्प्यात पाणी उचलून ते मल्ल्याळ येथून नैसर्गिक उताराने वंचित ६५ गावांना पाणी देण्यात येणार आहे. दोन दिवसात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. - महेश रासनकर, कार्यकारी अभियंता, ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटdroughtदुष्काळWaterपाणी