शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

...अखेर कोयनेतून पाणी सोडणार, पण १०५० क्युसेकनेच; सांगलीत पाणी पोहोचण्यासाठी तीन दिवस लागणार 

By अशोक डोंबाळे | Updated: October 27, 2023 12:30 IST

शेतकऱ्यांची गतीने पाणी सोडण्याची मागणी

सांगली : कऱ्हाड ते सांगलीपर्यंत कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. या आंदोलनाची दखल घेऊन शुक्रवार दि. २७ ऑक्टोबरपासून दुपारी १ वाजेपासून कोयना धरणातून एक हजार ५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. पण, पाणी कमी गतीने सोडल्यामुळे सांगलीत पाणी पोहोचण्यास तीन दिवस लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.पाऊस कमी झाल्यामुळे कृष्णा नदी ऑक्टोबर महिन्यातच कोरडी पडली आहे. शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला होता. प्रशासनाच्या चुकीमुळे कृष्णा काटच्या शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामाेरे जावे लागले होते. या गंभीर प्रश्नावर आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारीच आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. या आंदोलनाची दखल घेऊन कोयना धरणातून शुक्रवारी दुपारी १ वाजेपासून कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे एक युनिट सुरू केले आहे.या युनिटमधून एक हजार ५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. यामुळे कृष्णा नदी प्रवाहित होण्यास मदत होणार आहे. पण, कमी गतीने पाणी सोडल्यामुळे सांगलीत पाणी येण्यास किमान तीन दिवस लागणार आहेत. म्हणून शेतकऱ्यानी कोयना धरणातून किमान दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

विसर्ग वाढविणार : ज्योती देवकरकोयना धरणातून दुपारी १ वाजलेपासून एक हजार ५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. यामुळे सांगलीत पाणी पोहोचण्यासाठी तीन दिवस लागणार आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन कोयनेतून विसर्ग वाढविण्याची विनंती धरण व्यवस्थापनाकडे केली आहे. त्यानुसार कोयना धरणातून दुपारनंतर आणखी विसर्ग वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणीKoyana Damकोयना धरण