शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

...अखेर कोयनेतून पाणी सोडणार, पण १०५० क्युसेकनेच; सांगलीत पाणी पोहोचण्यासाठी तीन दिवस लागणार 

By अशोक डोंबाळे | Updated: October 27, 2023 12:30 IST

शेतकऱ्यांची गतीने पाणी सोडण्याची मागणी

सांगली : कऱ्हाड ते सांगलीपर्यंत कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. या आंदोलनाची दखल घेऊन शुक्रवार दि. २७ ऑक्टोबरपासून दुपारी १ वाजेपासून कोयना धरणातून एक हजार ५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. पण, पाणी कमी गतीने सोडल्यामुळे सांगलीत पाणी पोहोचण्यास तीन दिवस लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.पाऊस कमी झाल्यामुळे कृष्णा नदी ऑक्टोबर महिन्यातच कोरडी पडली आहे. शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला होता. प्रशासनाच्या चुकीमुळे कृष्णा काटच्या शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामाेरे जावे लागले होते. या गंभीर प्रश्नावर आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारीच आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. या आंदोलनाची दखल घेऊन कोयना धरणातून शुक्रवारी दुपारी १ वाजेपासून कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे एक युनिट सुरू केले आहे.या युनिटमधून एक हजार ५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. यामुळे कृष्णा नदी प्रवाहित होण्यास मदत होणार आहे. पण, कमी गतीने पाणी सोडल्यामुळे सांगलीत पाणी येण्यास किमान तीन दिवस लागणार आहेत. म्हणून शेतकऱ्यानी कोयना धरणातून किमान दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

विसर्ग वाढविणार : ज्योती देवकरकोयना धरणातून दुपारी १ वाजलेपासून एक हजार ५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. यामुळे सांगलीत पाणी पोहोचण्यासाठी तीन दिवस लागणार आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन कोयनेतून विसर्ग वाढविण्याची विनंती धरण व्यवस्थापनाकडे केली आहे. त्यानुसार कोयना धरणातून दुपारनंतर आणखी विसर्ग वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणीKoyana Damकोयना धरण