शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कारखानदार जोमात, ऊस उत्पादक कोमात; थकीत बिलाने शेतकऱ्यांची कोंडी

By अशोक डोंबाळे | Updated: December 20, 2024 17:58 IST

अशोक डोंबाळे सांगली : जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांपैकी १६ कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले असून आतापर्यंत २२ लाख टन ...

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांपैकी १६ कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले असून आतापर्यंत २२ लाख टन उसाचे गाळप करून २१ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना उसाचे बिलच दिले नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सध्याचे चित्र पाहून कारखानदार जोमात, ऊसउत्पादक कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील १९ पैकी १६ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केले आहेत. यापैकी राजारामबापू साखर कारखान्याच्या तीन शाखांचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील उर्वरित कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास महिन्याचा कालावधी झाला आहे. तरीही संबंधित कारखान्यांनी उसाचे पहिले बिल शेतकऱ्यांना दिले नाहीत. साखर कारखान्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून, बँकांचे हप्तेही थांबले आहेत. यामुळे कारखानदारांनी त्वरित उसाची बिले द्यावीत, अशी मागणीही शेतकरी संघटनांसह शेतकऱ्यांमधून होत आहे.

कायद्याचाही धाक राहिला नाही की काय?२००८-०९ च्या एफआरपी (रास्त व उचित दर) कायद्यानुसार तुटलेल्या उसाचे चौदा दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देण्याची हमी आहे. जर साखर कारखानदारांनी वेळेत उसाचे बिल न दिल्यास १५ टक्के व्याज देण्याची तरतूदही आहे. या कायद्याचाही आता साखर कारखानदारांना धाक राहिला नाही की काय, असा प्रश्नही ऊसउत्पादकांनी उपस्थित केला आहे.

बिल न दिल्याबद्दल साखर आयुक्तांकडे तक्रार : संदीप राजोबासाखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू झाल्यापासून १४ दिवसांत उसाची बिले शेतकऱ्यांना दिली पाहिजेत, असा कायदा आहे. हा कायदाच साखर कारखानदार पाळत नसतील तर त्यांच्याविरोधात साखर आयुक्तांकडे तक्रार करून न्याय मागणार आहे. शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम व्याजासह मिळाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली.

बिल वेळेवर न देणाऱ्या कारखान्यावर आंदोलन : सुनील फराटेसाखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. तरीही अनेक कारखान्यांनी उसाची बिले काढली नाहीत. यातून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. ज्या कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन महिना झाला आहे, त्या कारखान्यासमोर शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे, अशी प्रतिक्रिया स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी