शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

कारखानदार जोमात, ऊस उत्पादक कोमात; थकीत बिलाने शेतकऱ्यांची कोंडी

By अशोक डोंबाळे | Updated: December 20, 2024 17:58 IST

अशोक डोंबाळे सांगली : जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांपैकी १६ कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले असून आतापर्यंत २२ लाख टन ...

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांपैकी १६ कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले असून आतापर्यंत २२ लाख टन उसाचे गाळप करून २१ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना उसाचे बिलच दिले नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सध्याचे चित्र पाहून कारखानदार जोमात, ऊसउत्पादक कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील १९ पैकी १६ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केले आहेत. यापैकी राजारामबापू साखर कारखान्याच्या तीन शाखांचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील उर्वरित कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास महिन्याचा कालावधी झाला आहे. तरीही संबंधित कारखान्यांनी उसाचे पहिले बिल शेतकऱ्यांना दिले नाहीत. साखर कारखान्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून, बँकांचे हप्तेही थांबले आहेत. यामुळे कारखानदारांनी त्वरित उसाची बिले द्यावीत, अशी मागणीही शेतकरी संघटनांसह शेतकऱ्यांमधून होत आहे.

कायद्याचाही धाक राहिला नाही की काय?२००८-०९ च्या एफआरपी (रास्त व उचित दर) कायद्यानुसार तुटलेल्या उसाचे चौदा दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देण्याची हमी आहे. जर साखर कारखानदारांनी वेळेत उसाचे बिल न दिल्यास १५ टक्के व्याज देण्याची तरतूदही आहे. या कायद्याचाही आता साखर कारखानदारांना धाक राहिला नाही की काय, असा प्रश्नही ऊसउत्पादकांनी उपस्थित केला आहे.

बिल न दिल्याबद्दल साखर आयुक्तांकडे तक्रार : संदीप राजोबासाखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू झाल्यापासून १४ दिवसांत उसाची बिले शेतकऱ्यांना दिली पाहिजेत, असा कायदा आहे. हा कायदाच साखर कारखानदार पाळत नसतील तर त्यांच्याविरोधात साखर आयुक्तांकडे तक्रार करून न्याय मागणार आहे. शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम व्याजासह मिळाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली.

बिल वेळेवर न देणाऱ्या कारखान्यावर आंदोलन : सुनील फराटेसाखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. तरीही अनेक कारखान्यांनी उसाची बिले काढली नाहीत. यातून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. ज्या कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन महिना झाला आहे, त्या कारखान्यासमोर शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे, अशी प्रतिक्रिया स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी