शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे-बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तरी काही होणार नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण

By अशोक डोंबाळे | Updated: January 2, 2023 16:42 IST

राहुल गांधी हे पंतप्रधान होऊच शकत नाहीत, असाही दावा त्यांनी केला.

सांगली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या कितीही बैठका झाल्या, तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ठाकरे यांच्याकडे ना शिवसैनिक, ना आंबेडकर यांच्याकडे भीमसैनिक. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हसुद्धा एकनाथ शिंदे यांनाच मिळणार आहे, असा दावा आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केला.रामदास आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तर फार परिणाम होणार नाही; कारण भीमशक्ती माझ्याकडे आहे. तर शिवशक्ती एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे. शिंदे यांचं मोठं बंड आहे. सध्या त्यांच्याकडे ४० पेक्षा जास्त आमदार आणि १२ पेक्षा अधिक खासदार आहेत. शिंदे गटात शिवसेनेमधून आलेल्या आमदार, खासदार आणि पक्षातील कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेतल्यास शिवसेनेचे धनुष्यबाण हे शिंदे गटालाच मिळणार आहे.शिवाय उद्धव ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात जागावाटपामध्ये मतभेद होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आघाडीचा काही उपयोग होणार नाही. शिंदे गट, भाजप आणि आरपीआय युतीलाच २०२४ च्या निवडणुकीत मोठे यश मिळणार असून, राज्यात पुन्हा युतीचीच सत्ता येणार, असा दावाही त्यांनी केला.आठवले पुढे म्हणाले, आरपीआय पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा पक्ष असल्यामुळे अन्य पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन आरपीआयलाच पाठबळ दिले पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आरपीआयचे राज्यस्तरीय अधिवेशन ५ आणि ६ मे रोजी कोल्हापुरात घेणार आहोत. मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यातून पक्ष बांधणीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.राऊत, गांधींचा दावा चुकीचाखासदार संजय राऊत म्हणतात तसे राज्यात सत्तांतर होणार नाही, राज्य सरकार खंबीर आहे. शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार २०२४ पर्यंत कार्यकाळ पूर्ण करेल आणि २०२४ ला परत आमची सत्ता येणार आहे. तर राहुल गांधी यांची भारत जोडण्याची नाही, तोडण्याची यात्रा आहे. पहिला काँग्रेस जोडा आणि नंतर देश जोडा, असा टोलाही आठवले यांनी राहुल गांधी यांना लगावला. तसेच राहुल गांधी हे पंतप्रधान होऊच शकत नाहीत, असाही दावा त्यांनी केला.मंत्रिमंडळ विस्तार लवकर कराआगामी लोकसभा निवडणुकीत बीजेपीचे ३५० आणि एनडीएचे ४५० खासदार निवडून येणार आहेत. सध्या भाजपने देशातील पराभूत १४४ लोकसभेच्या जागांवर विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये आरपीआयला आम्ही महाराष्ट्रातील दोन जागा मागणार आहोत. तसेच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकर करून आरपीआयला मंत्रिपद आणि महामंडळे दिली पाहिजेत, अशी मागणीही आठवले यांनी केली.महाआघाडीमुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचितमराठा समाजाला ओबीसी, एससी, एसटी आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र आरक्षण दिले पाहिजे. यासाठी न्यायालयात महाविकास आघाडीच्या सरकारने व्यवस्थित भूमिका मांडली नाही. म्हणूनच मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे, असेही आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीRamdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRahul Gandhiराहुल गांधीMaratha Reservationमराठा आरक्षणShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे