शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे-बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तरी काही होणार नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण

By अशोक डोंबाळे | Updated: January 2, 2023 16:42 IST

राहुल गांधी हे पंतप्रधान होऊच शकत नाहीत, असाही दावा त्यांनी केला.

सांगली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या कितीही बैठका झाल्या, तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ठाकरे यांच्याकडे ना शिवसैनिक, ना आंबेडकर यांच्याकडे भीमसैनिक. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हसुद्धा एकनाथ शिंदे यांनाच मिळणार आहे, असा दावा आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केला.रामदास आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तर फार परिणाम होणार नाही; कारण भीमशक्ती माझ्याकडे आहे. तर शिवशक्ती एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे. शिंदे यांचं मोठं बंड आहे. सध्या त्यांच्याकडे ४० पेक्षा जास्त आमदार आणि १२ पेक्षा अधिक खासदार आहेत. शिंदे गटात शिवसेनेमधून आलेल्या आमदार, खासदार आणि पक्षातील कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेतल्यास शिवसेनेचे धनुष्यबाण हे शिंदे गटालाच मिळणार आहे.शिवाय उद्धव ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात जागावाटपामध्ये मतभेद होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आघाडीचा काही उपयोग होणार नाही. शिंदे गट, भाजप आणि आरपीआय युतीलाच २०२४ च्या निवडणुकीत मोठे यश मिळणार असून, राज्यात पुन्हा युतीचीच सत्ता येणार, असा दावाही त्यांनी केला.आठवले पुढे म्हणाले, आरपीआय पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा पक्ष असल्यामुळे अन्य पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन आरपीआयलाच पाठबळ दिले पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आरपीआयचे राज्यस्तरीय अधिवेशन ५ आणि ६ मे रोजी कोल्हापुरात घेणार आहोत. मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यातून पक्ष बांधणीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.राऊत, गांधींचा दावा चुकीचाखासदार संजय राऊत म्हणतात तसे राज्यात सत्तांतर होणार नाही, राज्य सरकार खंबीर आहे. शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार २०२४ पर्यंत कार्यकाळ पूर्ण करेल आणि २०२४ ला परत आमची सत्ता येणार आहे. तर राहुल गांधी यांची भारत जोडण्याची नाही, तोडण्याची यात्रा आहे. पहिला काँग्रेस जोडा आणि नंतर देश जोडा, असा टोलाही आठवले यांनी राहुल गांधी यांना लगावला. तसेच राहुल गांधी हे पंतप्रधान होऊच शकत नाहीत, असाही दावा त्यांनी केला.मंत्रिमंडळ विस्तार लवकर कराआगामी लोकसभा निवडणुकीत बीजेपीचे ३५० आणि एनडीएचे ४५० खासदार निवडून येणार आहेत. सध्या भाजपने देशातील पराभूत १४४ लोकसभेच्या जागांवर विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये आरपीआयला आम्ही महाराष्ट्रातील दोन जागा मागणार आहोत. तसेच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकर करून आरपीआयला मंत्रिपद आणि महामंडळे दिली पाहिजेत, अशी मागणीही आठवले यांनी केली.महाआघाडीमुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचितमराठा समाजाला ओबीसी, एससी, एसटी आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र आरक्षण दिले पाहिजे. यासाठी न्यायालयात महाविकास आघाडीच्या सरकारने व्यवस्थित भूमिका मांडली नाही. म्हणूनच मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे, असेही आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीRamdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRahul Gandhiराहुल गांधीMaratha Reservationमराठा आरक्षणShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे