शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

Sangli- ताकारी योजना: लाभक्षेत्रातील शेतीचे भविष्य पाणी वापर संस्थांच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 11:32 IST

'राजकारणाचा शिरकाव होण्याची भीती :पारदर्शक कारभाराची आशा'

प्रताप महाडिककडेगाव : ताकारी  योजनेच्या लाभक्षेत्रात प्रत्येकी सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रासाठी एक पाणी वापर संस्था स्थापन केली जात आहे. यामुळे योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतीचे भविष्य आता पाणी वापर संस्थांच्या हाती जात आहे. पाणी वितरण अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करणे हाच यामागचा उद्देश आहे. या पाणी वापर संस्थामध्ये राजकारणाचा शिरकाव होण्याची  भिती आहे. मात्र तरीही पाणी वापर संस्थेच्या संचालक मंडळ निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडले जात असल्याने येथे बळीराजाला मतदारराजा प्रमाणे महत्त्व राहणार आहे. पाणी वापर संस्थांना योजनेकडून धनमापन पद्धतीने मोजून दिले जाणार आहे.यामुळे समन्यायी  पाणी वितरण होणार आहे.सद्यस्थितीत योजनेची पाणीपट्टी एकरी ७ हजार ३०० रुपये आहे.मात्र पाणी वापर संस्था याहूनही कमी दराने पाणी देतील.

७३ पाणी वापर संस्थांची स्थापना  ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात  ७३ पाणी वापर संस्थांची स्थापना केली आहे. यामधील  ५३ संस्थांची निवडणूक प्रक्रिया झाली आहे.यापैकी ८ संस्थांकडे लाभक्षेत्र हस्तांतरण प्रक्रिया  झाली आहे. याशिवाय ३१ संस्थांची करारनामे प्रक्रिया  झाली आहे.

समृद्ध शेती हीच योजनेची यशोगाथा कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते आणि ताकारी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून हा कणा अधिक ताठ आणि सशक्त होत आहे. लाभक्षेत्रातील ७१ गावात   सिंचन सुविधेमुळे शेती समृद्ध झाली आहे. जीवनमान उंचावल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे.उद्योग व्यवसायांची भरभराट झाली आहे.शेतकऱ्यांची मुले शहरांमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत.तरुणाई नोकरीच्या मागे न लागता आधुनिक शेती व शेती पूरक व्यवसाय  करीत आहे.उस,आद्रक व हळद उत्पादनात अव्वल ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात  सुमारे १५ लाख मे.टन उसाचे  उत्पादन निघत आहे.यामुळेच साखर कारखाने उभा राहिले व  रोजगार निर्मिती झाली आहे.याशिवाय आले (आद्रक) व हळद  उत्पादन मोठ्या  प्रमाणावर घेतले जाते.मागील दोन वर्षात आद्रक (आले)  पिकाला उच्चांकी दर मिळाला.यामुळे कित्येक शेतकरी कोट्याधीश झाले आहेत.देशी विदेशी फळ भाजीपाला पिकांची रेलचेलताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात द्राक्षे, आंबा, केळी, डाळिंब, लिंबू, सिताफळ यासारख्या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर  झाली आहे.याशिवाय  ड्रॅगन फ्रूट, झुकिनी, रेड कॅबेज इ. विदेशी फळे व भाजीपाला पिकवत आहेत.

प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतरची दिशा ताकारी योजनेच्या प्रकल्पाची कामे पूर्णत्वाच्या अंतीम टप्यात आहेत.याशिवाय बंदीस्त नलिकांची व लाभक्षेत्र विकासाची कामे वर्षभरात पुर्ण होतील. सदरची कामे पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाचे  सिंचन व्यवस्थापन पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.पाणी वापर संस्थाना सिंचन व्यवस्थापन, पाणी आवर्तन नियोजन,पाणी वितरण, पाणी पट्टी आकारणी व वसूली  इ. बाबत सर्वाधिकार असणार आहेत.तात्पर्य,ताकारी योजना शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यासाठी राबवलेली यशस्वी योजना ठरणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी