शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

आमदारांची मोर्चेबांधणी अन् भूछत्रांचा वाढता जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:44 AM

वरिष्ठ नेत्यांना भेटून कामाचा पुळका आणायचा आणि आम्हीच कसे तुमचे तारणहार आहे, याचा आव आणण्याचाच सध्या प्रयत्न सुरू आहे.

ठळक मुद्देविधानसभेसाठी भाऊगर्दी : विद्यमानांची मतदार संघात जुळवाजुळव

दीपक शिंदे ।सातारा : विधानसभा निवडणूक जशी जवळ येईल तसे निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. पावसाळ्यात भूछत्र्या उगवण्याचे प्रमाण जास्त असतं, त्याप्रमाणे निवडणुका आल्या की ही राजकीय भूछत्रं उगवतात; पण जरा उन्हाची तिरीप लागली की भूछत्रांचा सुकून वाळा होतो. तशीच अवस्था या इच्छुकांचीही होणार आहे. वरिष्ठ नेत्यांना भेटून कामाचा पुळका आणायचा आणि आम्हीच कसे तुमचे तारणहार आहे, याचा आव आणण्याचाच सध्या प्रयत्न सुरू आहे.

जिल्ह्यात निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने इच्छुकांची भाऊगर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. कोणाला विरोध तर कोणाला सोबत घेऊन एकमेकांची खोड मोडण्याचे राजकारण सुरू आहे. काही ठिकाणी तर ज्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येता येत नाही, असे लोक स्वत:लाच विधानसभेचा उमेदवार घोषित करू लागले आहेत. तर काहीजण नेत्यांना मतदार संघातील समस्यांचे पत्र देऊन आश्वासन घेऊ लागले आहेत. गुप्त बैठका आणि नियोजन याच्यावर भर दिला जात असतानाच आपली ताकद आणि जनाधार याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे.

गेल्या पाच वर्षांत गावात काय काम आहे, कोणाची काय अडचण आहे? याच्याशी देणे-घेणे नसणाऱ्यांना एकदम गावाची आणि गावातील लोकांची, प्रलंबित कामांची काळजी वाटू लागल्याने गावकरीही आश्चर्य व्यक्त करत आहेत. काही मतदार संघात इच्छुकांची संख्या वाढलेली आहे; विद्यमान आमदाराचा पराभव करण्यासाठी सर्व इच्छुक आता एकत्र आलेत. प्रत्येकजण आपला स्वतंत्र अजेंडा घेऊन आणि तयारीसह मतदारांपर्यंत पोहोचत आहे. जवळपास सर्वच विधानसभा मतदार संघातही इच्छुकांची संख्या वाढत आहे. एकास एक लढत झाली तर काही गणिते मांडता येतात; पण बहुरंगी लढती झाल्या की कोणाच्या पदरात काय पडणार? याचा मागमूसच लागत नाही. चांगल्या उमेदवाराचीही गोची करण्याचे काम ही ऐनवेळची भूछत्रे करीत असतात.

सध्या विद्यमान आमदारांनी केलेल्या कामांची सरबत्तीच सुरू केली आहे. तर निवडणूक लढवू इच्छिणारे गेल्या अनेक वर्षांत न झालेल्या कामांची यादी तयार करू लागले आहेत. ही कामे आपल्याशिवाय कोणीच करू शकणार नाही, असा विश्वासही देऊ लागल्याने मतदारांनाही आश्चर्य वाटत आहे; पण केवळ निवडणुकीपुरता फायदा करून घेण्यासाठी अनेकजण रिंगणात उतरतात आणि पुन्हा गायब होतात. ते पाच वर्षे दिसतच नाहीत. त्यांना मतदारही ओळखतात, त्यामुळेच ही पावसाळ्यातील भूछत्रे फक्त पावसाळ्यातच उगवतात, असा टोला त्यांना मारला जाऊ लागल्याचे दिसत आहे.आठ मतदार संघांत इच्छुकांची चाचपणीजिल्ह्यातील आठ मतदार संघांत सध्या ४२ जण इच्छुक आहेत. यातील काही मातब्बर तर काही नव्याने प्रयत्नाच्या तयारीत आहेत. विद्यमान आमदारांना जेरीस आणण्याचा प्रयत्नही काहीजणांनी केला आहे. त्याची झलक लोकसभा निवडणुकीत दाखवूनही दिली आहे. त्यामुळे आता सावध पवित्रा घेऊनच विद्यमानही रिंगणात उतरणार आहेत. कोणतीही हयगय होऊ नये, यासाठी निवडणुकीपूर्वीच मतदारसंघ बांधून ठेवण्याची किमया केली जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण