शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दंगली घडवून निवडणुकीसाठी वातावरण तयार करण्याचे प्रयत्न, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप

By संतोष भिसे | Updated: August 17, 2023 19:35 IST

सरकारला बहुमत असूनही आत्मविश्वास नाही

सांगली : राज्यात दंगली घडवून निवडणुकीचे वातावरण तयार करण्याचे काम सुरु आहे. सत्तेसाठी फोडा आणि झोडा कार्यक्रम राबवला जात आहे. आत्मविश्वास नसलेले स्थगिती सरकार सत्तेवर असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. सांगली बाजार समितीत एका कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आमदार डॉ. विश्वजीत कदम, सतेज पाटील, विक्रम सावंत, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, जितेश कदम, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, २०० आमदार असताना भाजपला फोडाफोडीची गरज काय? असा प्रश्न आहे. सरकारला बहुमत असूनही आत्मविश्वास नाही. आगामी निवडणुकीत अन्य पक्षांच्या सोबतीशिवाय जिंकता येणार नाही अशीच भाजपची भावना झाली आहे. राज्यात इतके मंत्री असतानाही स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाला मंत्री मिळाले नाहीत. अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनीच ध्वजवंदन केले. भाजपकडे गेलेल्यांना `आपण का इकडे आलो`? असे वाटत आहे.

चव्हाण म्हणाले, पावसाने शेज्च्या नुकसानीची भरपाई मिळत नाही. फक्त घोषणा होत आहेत. शिक्षकांच्या ७२ हजार जागा रिक्त आहेत. दोन लाख शासकीय कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत, पण भरतीचे नियोजन नाही. परिस्थिती गंभीर आहे.

मराठा आरक्षणासाठी कायदाच हवाचव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणासाठी दिल्लीत कायदामंत्र्यासोबत बैठका व्हायला हव्यात. ५० टक्के मर्यादा असेपर्यंत आरक्षण मिळणार नाही, हे अजित पवारांनाही माहिती आहे. पण दिशाभूल सुरु आहे. कायदा केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही.

आंबेडकरांनी महाविकास आघाडीत यावेवंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांची मानसिकता महाविकास आघाडीत येण्याची आहे. ते यावेत अशी माझीही व्यक्तिगत इच्छा आहे. त्यासंदर्भात त्यांच्याशी बोलणेही झाले आहे. निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. बीआरएस पक्षाचे नेते भाजपविरोधात बोलत नाहीत. भाजपला मदत करत आहेत. त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी. पैसा खर्च करताहेत, पण परिणाम होणार नाही. संजय शिरसाटांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते दररोज काहीही बोलत असतात.

पोंक्षे, भिडेंची लायकी नाहीचव्हाण म्हणाले, संभाजी भिडे, शरद पोंक्षे यांना महत्व नाही. त्यांची दखल घ्यावी इतकी त्यांची लायकीही नाही. व्यक्तिगत पातळीवरील खालील दर्जाची विधाने सहन करणार नाही. अशी विधाने होत असतील तर सरकारने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा