शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे वन्यजीव उपचार केंद्रासाठी प्रयत्न, पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात केंद्रच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 13:15 IST

आमदार मानसिंगराव नाईक यांचा तारांकित प्रश्न 

विकास शहाशिराळा : पश्चिम महाराष्ट्रात पुण्याशिवाय अन्य कोणत्याही जिल्ह्यात वन्यप्राणी उपचार केंद्र नाही. त्यामुळे अनेक जखमी प्राण्यांना वेळेत उपचारांअभावी प्राण गमवावे लागत आहेत. चांदोली अभयारण्यामुळे शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी व पक्षी आहेत. त्यामुळे शिराळा येथे उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली आहे. यासंदर्भात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चांदोली अभयारण्य परिसरातील वारणा, मोरणा, कृष्णा नदीकाठ, तसेच जिल्हाभरात गेल्या काही वर्षांत वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यांच्या संचारासाठी वनक्षेत्र पुरत नसल्याने ते मानवी वस्तीत येत आहेत. रस्त्यावर वावरत आहेत. यातूनच अपघात ओढवत आहेत. अशावेळी जखमी प्राण्यावर ताबडतोब उपचार करून निसर्गात सोडणे आवश्यक असते. मात्र, यासाठी स्वतंत्र उपचार केंद्र जिल्ह्यात नाही.

कसबे डिग्रज केंद्र लालफितीतवनविभागाने काही महिन्यांपूर्वी एका बैठकीत प्रत्येक जिल्ह्यात एक वन्यप्राणी प्रथमोपचार केंद्र स्थापन करण्याचा सूचना केली होती. त्यानुसार सांगलीत वनविभागाच्या कार्यालयात केंद्र मंजूर झाले; पण त्याची उभारणी अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे ते शिराळा येथे सुरू करण्यासाठी नाईक यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथेही केंद्र उभारणीसाठी काही दिवसांपूर्वी प्रयत्न सुरू होते; मात्र ते लाल फितीत अडकले.

पश्चिम महाराष्ट्रात सध्या फक्त पुणे येथेच उपचार केंद्र आहे. जिल्ह्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प; तसेच चांदोली अभयारण्यामुळे वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. राष्ट्रीय महामार्ग वाढत असल्याने वन्यप्राण्यांचे अपघातही वाढत आहेत. त्यांच्यावर उपचारांसाठी शिराळा मध्यवर्ती केंद्र ठरणार आहे. - आमदार मानसिंगराव नाईक 

तासगाव, विटा आदी परिसराचा विचार करता कसबे डिग्रज, कवठेपिरान ही गावे मध्यवर्ती ठरतात. तेथे सुमारे पाच हेक्टरपेक्षा जास्त जागा मिळू शकते. तेथे उपचार केंद्र उभारणे शक्य आहे. ही जागा पूरपट्ट्यात येत नसल्याने सुरक्षितही आहे. - अजितकुमार पाटील, मानद वन्यजीव संरक्षक, सांगली

टॅग्स :Sangliसांगलीforestजंगल