शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगी शिवाय दत्त इंडिया कारखाना सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:39 IST

सुनील फराटे : प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार

सांगली : दत्त इंडिया कंपनी सांगलीतील वसंतदादा शेतकरी साखर कारखाना चालवत आहेत. या कारखान्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची वैध संमत्तीची परवानगी घेतली नाही. या कारखान्यामधून सध्या गंभीर वायू व जलप्रदूषण होत आहे. या कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे.सुनील फराटे म्हणाले, दत्त इंडिया कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २३ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी परवाना दिला होता. दत्त इंडिया कंपनीकडून नोव्हेंबर २०२४ पासून बेकायदेशीरपणे कारखाना सुरू आहे. सदर उद्योगास महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण महामंडळाकडून संमत्तीचे नूतनीकरण करुन मिळालेले नाही.तसेच सद्या कारखान्याकडून मोठ्या प्रमाणात प्रक्रिया न केलेले धोकादायक सांडपाणी सोडत आहे. जवळच्या नैसर्गिक नाल्यात वाहून जात असून कृष्णा नदीत ते मिसळत आहेत. या बेकायदेशीर विसर्जनामुळे संपूर्ण नदीच्या पाण्याची गुणवत्ता प्रभावित झाली आहे. नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. तसेच कारखाना कोणत्याही प्रक्रियेशिवाय राख थेट हवेत सोडत आहे. त्यामुळे गंभीर वायुप्रदूषण होत आहे. याचा आसपासच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या, मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.शिवाय त्याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरातील शेती पिकांवर, वनस्पतींवर व झाडांवर होत आहे. सदर साखर उद्योगाचे ईटीपी आणि इतर प्रक्रिया प्रकल्प योग्यरीत्या कार्यरत नाहीत. त्यामुळे सदर उद्योग प्रक्रिया न केलेले धोकादायक सांडपाणी परिसरात सोडत आहेत. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले, विहीर, बोअरमध्ये दूषित पाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. कारखान्याने बसवलेल्या वायुप्रदूषण नियंत्रण सिस्टिम असमाधानकारक कामगिरीमुळे स्थानिक नागरिकांना गंभीर आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बाहेर पडणाऱ्या राखेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सदर कारखान्याने ओले स्क्रबर बसविलेले नाही. ते तातडीने बसवण्याची गरज आहे.

उपाययोजना करेपर्यंत कारखाना बंद ठेवासाखर उद्योग वारंवार पर्यावरण प्रदूषित करत आहे आणि संमतीच्या विविध अटी आणि शर्तींचे उल्लंघन करत आहे. पर्यावरणाच्या व नागरिकांच्या आरोग्यासाठी दत्त इंडिया यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच कारखान्याचे प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून परवाना नूतनीकरण करण्यात येऊ नये. योग्य उपाययोजना न केल्यास कारखाना बंद करण्याचे आदेश व्हावेत, अशी मागणीही सुनील फराटे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेpollutionप्रदूषण