शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

वाळवा-शिराळ्यात काँग्रेसचे मोसमी वारे

By admin | Updated: June 27, 2016 00:36 IST

निवडणुकीपुरतीच नेत्यांना येते जाग : स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्वाचा अभाव

अशोक पाटील --इस्लामपूर --वाळवा, शिराळ्यातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांची अवस्था मोसमी वाऱ्यासारखी झाली आहे. शिराळ्यात काँग्रेसचा गड अबाधित ठेवण्यात देशमुख पिता—पुत्र सक्रिय आहेत. याउलट वाळवा तालुक्यातील नेते फक्त निवडणुकीपुरते एकत्र येऊन निवडणुकीची हाक देतात. या हाकेला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी आमदार हाफिज धत्तुरे, आनंदराव माने यांच्यासह सत्यजित देशमुख यांनी साद दिली आहे. शिराळा तालुक्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसची ताकद टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. शिराळ्यातील स्थानिक राजकारणात त्यांची ताकद निर्णायक असली तरी ती पक्षाला पुरेसे यश मिळवून देऊ शकत नाही. यामुळे देशमुख यांनी राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांच्याशी मिळतेजुळते घेतले आहे. परंतु पक्षआदेशामुळे जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीत या दोघांना स्वतंत्ररित्या निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला. याचा फायदा अनेक पक्ष फिरलेल्या शिवाजीराव नाईक यांना झाला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख एकत्र येणार का? असा प्रश्न आहे. कारण माजी मंत्री जयंत पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याची भाषा सुरू केली आहे.शिराळ्यापेक्षा वाळव्यातील काँग्रेसची स्थिती अत्यंत बिकट आहे. सर्व नेत्यांचे चेहरे फक्त पावसाळ्यात बाहेर पडणाऱ्या बेडकांप्रमाणे निवडणुकीपुरतेच दिसतात. वाळवा तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि सत्यजित देशमुख यांना इस्लामपूर येथील सभेसाठी आमंत्रित केले होते. त्यांनीही आवर्जून आपली उपस्थिती दाखवून जयंत पाटील यांना टार्गेट करीत, झोपलेल्या काँग्रेस नेत्यांना कानमंत्र दिला आहे. आता यातून ते किती रिचार्ज होणार यावर पुढील गणित अवलंबून आहे. या नेत्यांच्या भाषणबाजीतून जयंत पाटील यांना मोठे आव्हान निर्माण करण्याचा सूर निघाला असला, तरी स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्याने हे कितपत शक्य होते, हे येणारा काळच ठरवणार आहे. नेते कार्यक्रमापुरतेच : पदाधिकारी नामधारीवाळवा तालुक्यात तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील, सी. बी. पाटील, जयराज पाटील, वैभव पवार, विजय पवार या नावांनंतर काँग्रेस थांबते. उर्वरित पदाधिकाऱ्यांची नावे सामान्यांना माहिती नाहीत. कालच्या मेळाव्यास उपस्थित असलेले अ‍ॅड. एच. के. पाटील, जयकर कदम, प्रवक्ते संतोष पाटील, जिल्हा सरचिटणीस सतीश पाटील, प्रा. हेमंत कुरळे, शिवाजीराव निळकंठ, आनंदराव पाटील, प्रतापराव मोरे, धनंजय कुलकर्णी, किरण चव्हाण हे काँग्रेसच्या पटावर कधीच दिसत नाहीत. गेल्या काही वर्षात त्यांच्याकडून पक्षासाठी उल्लेखनीय कार्य झाल्याचे निदर्शनास येत नाही. एखाद्या मेळाव्याला अथवा कार्यक्रमालाच त्यांची उपस्थिती दिसते.