शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

काँग्रेसच्या काळात अंबानी आता अदानींना पोसण्याचे काम, विलासराव जगतापांचा भाजपला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 13:04 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. तरी शेतकरी हा शोषित आहे.

जत : कोणतेही सरकार असले तरी उद्योगपतींना पोसण्याचे काम करत असते. काँग्रेसच्या काळात अंबानींना पोसण्याचे काम झाले होते. या सरकारच्या काळात अदानींना पोसण्याचे काम सुरू असून, बळीराजा हा पोतराज बनला आहे, अशा शब्दांत माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे.जत येथे एका कार्यक्रमात विलासराव जगताप व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एका व्यासपीठावर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांच्या मारलेल्या राजकीय कोपरखळ्यांनी कार्यक्रमस्थळी हस्या पिकला.विलासराव जगताप म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. तरी शेतकरी हा शोषित आहे. कोणाचेही शोषण झाले नाही एवढे शेतकऱ्यांचे शोषण झाले आहे. उद्योगपती, अभिनेते, सरकारी कर्मचारी यांना कधी आत्महत्या करावी लागत नाही; पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. हे सर्व बदलले पाहिजे.जयंत पाटील म्हणाले, सरकार कोणाचे जरी असले तरी जत तालुक्यातील ६५ गावांना पाणी मिळणार आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाणार असून, जत तालुक्याला हक्काचे पाणी देणार आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, सुभाष पाटील, शुभांगी बन्नेनवर, नाना शिंदे, सिद्धाप्पणा शिरशाड, इरण्णा निडोणी, माणिक बिजर्गी, प्रकाश बिज्जरर्गी, उत्तम शेठचव्हाण, उमेश सावंत, बाळ सावंत, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

विलासराव, अधूनमधून भेटत जावा

माजी मंत्री जयंत पाटील यांनी तुफान टोलेबाजी करत अनेक दिवस झाले, विलासराव जगताप भेटलेच नाहीत. कधीतरी अधूनमधून भेटत जावा. पक्ष कुठलाही असला तरी सर्वजण कार्यक्रमाला एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे. पण विलासराव जगताप चिडतील असे काही कार्यक्रमात बोलायचे नाही, असे सांगताच उपस्थितांना हसू आवरता आले नाही.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसBJPभाजपा