शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

अवकाळीच्या फटका; द्राक्षबागायतदाराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 11:37 IST

अवकाळी पावसाने बागेचे मोठे नुकसान झाल्याने कर्जफेडीच्या विवंचनेत हाेते. कर्ज देणाऱ्या काही खासगी सावकारांनीही कर्जवसुलीचा तगादा लावल्याची चर्चा.

मिरज : द्राक्षबागेला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने कर्जफेडीच्या विवंचनेतून मालगाव (ता. मिरज) येथील जयहिंद सोसायटीचे माजी अध्यक्ष चिदानंद सातलिंग घुळी (वय ५५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

मालगावातील शेतकरी चिदानंद घुळी यांच्या सात एकर शेतजमिनीपैकी अडीच एकरात द्राक्षबाग आहे. अवकाळी पाऊस व निसर्गाच्या अवकृपेचा द्राक्षबागेला फटका बसल्याने घुळी हवालदिल झाले होते. गतवर्षी त्यांनी द्राक्षबागेसाठी काढलेल्या सुमारे साठ लाख रुपयांच्या कर्जाची दोन एकर शेती विकून परतफेड केली हाेती. या वर्षीही त्यांनी द्राक्षबागेच्या उत्पन्नाच्या आशेवर सोसायटी व बँकेचे शेतीसाठी कर्ज काढले होते. मात्र या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने बागेचे मोठे नुकसान झाल्याने कर्जफेडीच्या विवंचनेत हाेते.

मंगळवारी दुपारी तीन वाजता घर व द्राक्षबागेच्या मध्यभागी असलेल्या आंब्याच्या झाडाला त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

खासगी सावकारांचाही तगादा

घुळी यांना कर्ज देणाऱ्या काही खासगी सावकारांनीही कर्जवसुलीचा तगादा लावल्याची चर्चा होती. ते जयहिंद विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष व गेली सात वर्षे संचालक होते. त्यांच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त होत होती.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीRainपाऊस