शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

सांगली जिल्ह्यात वाहनांच्या विक्रीत ३० टक्के घट--दुष्काळ, वाढत्या किमतीचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:26 PM

जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाचे गडगडलेले भाव, उसाची थकलेली बिले, वाहनांच्या वाढलेल्या किमती यामुळे यंदा चारचाकी व दुचाकी वाहन खरेदीत ३० टक्क्यापर्यंत घट झाल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देवाहन उद्योगावर मंदीचे दाट सावट; तीन महिन्यातील चित्र

शीतल पाटील ।सांगली : जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाचे गडगडलेले भाव, उसाची थकलेली बिले, वाहनांच्या वाढलेल्या किमती यामुळे यंदा चारचाकी व दुचाकी वाहन खरेदीत ३० टक्क्यापर्यंत घट झाल्याचे दिसून येते. गतवर्षी जानेवारी ते एप्रिलपर्यंत उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या वाहनांपेक्षा यंदा तब्बल पावणेसहा हजारांनी वाहनांची संख्या घटली आहे. त्यामुळे वाहन उद्योगावर पुन्हा एकदा मंदीचे सावट आल्याचे विक्रेते सांगत आहेत.

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यांपैकी सहा तालुक्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दुष्काळी स्थितीमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यातील ग्राहकांनी यंदा वाहन खरेदीकडे पाठ फिरविली आहे. सधन तालुक्यातही फारशी चांगली स्थिती नाही. शेतीमालाचे भाव गडगडले आहेत. यंदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही एफआरपीनुसार बिले मिळालेली नाहीत. साखर कारखान्यांनी बिलांचे तुकडे केल्याने ऊस उत्पादकांचीही परवड झाली आहे. या साऱ्यांचा परिणाम यंदा वाहन उद्योगावर झाल्याचे दिसून येते. पूर्वी हौसेखातर वाहन खरेदी करणाºयांची असलेली संख्या वेगाने घटत चालली आहे. केवळ गरजवंतच वाहन खरेदीसाठी येत असल्याचे विक्रेते सांगतात.

शेतीसाठी उपयुक्त ट्रॅक्टर खरेदीचा आलेखही दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. यंदा तर ट्रॅक्टर विक्रीत ३० टक्क्यापर्यंत घट झाल्याचे विक्रेते शेखर बजाज यांनी सांगितले. त्यात शेतकºयांना ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. हे अनुदानही वेळेवर शेतकºयांच्या खात्यावर जमा होत नाही. ट्रॅक्टर खरेदी केलेल्या शेतकºयांची परवड पाहून, इतर शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करण्यापासून चारहात दूरच चालल्याचेही त्यांनी सांगितले.त्यात वाहनांच्या किमतीतही १० ते १५ हजाराची वाढ झाली आहे. शासनाने वाहनाचा विमा एक वर्षावरून पाच वर्षे केला आहे. विम्यापोटीच सात ते आठ हजार रुपये जादा मोजावे लागत आहेत. वाहनांच्या अ‍ॅण्टी ब्रेक सिस्टिममुळेही किमतीत मोठा फरक पडला आहे. हाय सिक्युरिटी नंबरप्लेटची अंमलबजावणी सुरू झाली आहे. एकूणच वाहनांच्या वाढत्या किमतीचाही परिणाम विक्रीवर जाणवू लागला आहे. यंदा गुढीपाडवा, अक्षय तृतीया यासारख्या सणालाही वाहन खरेदी करणाºयांची संख्या बरीच रोडावली आहे. वाहनांच्या शोरूममध्येही चौकशीसाठी ग्राहक येत नसल्याचे दिसून येते.

आरटीओ कार्यालयाकडे जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात गतवर्षी व यंदा नोंदणी झालेल्या वाहनांची संख्या पाहता, तब्बल ५७८१ वाहनांची विक्री कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे आरटीओ कार्यालयाच्या महसुलातही घट झाली आहे. केवळ एप्रिल महिन्याची आकडेवारी पाहिल्यास, वाहनांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे स्पष्ट होते. गेल्यावर्षी म्हणजे एप्रिल २०१८ मध्ये सर्व प्रकाराच्या ७८११ वाहनांची विक्री झाली होती, तर यंदा एप्रिल २०१९ मध्ये ४३०७ वाहनांची विक्री झाली आहे. यावर्षी पाऊस चांगला पडला तरच वाहन उद्योग टिकणार असल्याचे सांगण्यात आले.

बाजारात चलन ठप्प :खरेदीची हौस संपलीजिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात दुष्काळ पडल्यामुळे वाहन खरेदीला फटका बसला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के घट झाली आहे. बाजारपेठेत चलन फिरत नाही. त्यात केवळ गरज असलेला ग्राहकच वाहन खरेदीसाठी येत आहे. हौसेसाठी वाहन खरेदीची मानसिकता संपुष्टात आली आहे. ट्रॅक्टर खरेदीबाबत शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे दुसरा शेतकरी ट्रॅक्टर खरेदीसाठी कंपनीत येत नाही, असे बजाज अ‍ॅटो सांगलीचे शेखर बजाज म्हणाले.

 

गतवर्षीपेक्षा यंदा वाहन उद्योगावर मंदीचे सावट आहे. त्यात वाहनांच्या किमतीतही ११ ते १५ हजारापर्यंत वाढ झाली आहे. शासनाकडून विम्याची पाच वर्षाची रक्कम भरून घेतली जात आहे. कॉम्बी ब्रेक सिस्टिममुळेही वाहनांच्या किमतीत चार ते पाच हजाराची वाढ झाली आहे. वाहन जुने झाले, म्हणून नवीन खरेदी करण्याची ग्राहकांची मानसिकताच संपली आहे. वाहनांच्या शोरूमकडे चौकशी, बुकिंगसाठी येणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे.- बिपीन साळसकर, मिलेनियम होंडा, सांगली

 

टॅग्स :Sangliसांगलीbusinessव्यवसाय