शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

वाळवा-शिराळ्याला मंत्रीपद, महामंडळांची आस -: पुन्हा चर्चा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:50 PM

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्यामध्ये शंभर दिवसांसाठी का होईना, शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवाय इस्लामपूर मतदार संघातील काही नेत्यांची महामंडळांवर वर्णी लागल्याची

ठळक मुद्देआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राजकीय खेळीची शक्यता

अशोक पाटील ।इस्लामपूर : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्यामध्ये शंभर दिवसांसाठी का होईना, शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवाय इस्लामपूर मतदार संघातील काही नेत्यांची महामंडळांवर वर्णी लागल्याची अधिकृत घोषणा होणार आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही भाजपची खेळी असल्याचे बोलले जात आहे.

मागील निवडणूक आमदार नाईक यांनी भाजपचा झेंडा घेऊन निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, शिवाजीरावांना निवडून द्या, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊ, असा शब्द दिला होता. या घोषणेला पाच वर्षे होत आली. आता मंत्रिमंडळाच्या शेवटच्या तीन महिन्यांसाठी पुन्हा एकदा १४ जूनरोजी विस्तार केला जाणार आहे. यामध्ये आ. नाईक यांना मंत्रीपदाची संधी मिळेल, अशी शक्यता आहे.इस्लामपूर मतदार संघातील भाजपचे नेते विक्रम पाटील व राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या वैभव शिंदे यांना यापूर्वीच महामंडळावर घेण्यात आले आहे. परंतु तशी अधिकृत घोषणा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली होती. आता दोघांच्या अधिकृत निवडी जाहीर होणार आहेत. यासाठी या दोघांच्याही मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत.

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपची खेळी सुरू आहे. शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष डोके वर काढू लागला आहे. आ. नाईक यांनी उभ्या केलेल्या संस्था तोट्यात असल्याचा आरोप राष्टÑवादी आणि काँग्रेसने सुरू केला आहे. त्यांची प्रतिमा ढासळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावर उपाय म्हणून शंभर दिवसांसाठी का होईना, आ. नाईक यांना मंत्रीपद देऊन त्यांची प्रतिमा उजळवली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

आश्वासनांची पूर्तता होणार का?इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात भाजपला ऊर्जा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद, विक्रम पाटील, वैभव शिंदे यांना महामंडळ, तर महाडिक गटाचे राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांना उमेदवारीची संधी देण्याचे आश्वासन दिले आहे. याची पूर्तता झाली नाही, तर येथील राजकारण वेगळ्या वळणावर जाणार आहे.

 

१४ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यानंतर आठ दिवसांत महामंडळावर नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा होणार आहे.- विक्रम पाटील, भाजपचे नेते

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक