शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

दुष्काळी भागाला स्वस्तात सफरचंद खाऊ घालणार!- - पंढरीनाथ नागणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:41 PM

आटपाडीत सफरचंदाचे सौदे सुरू झाल्याने आता नागरिकांना स्वस्त व दर्जेदार सफरचंद उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. - पंढरीनाथ नागणे

ठळक मुद्देआटपाडीत सौदे : ग्राहकांना दिलासा

अविनाश बाड ।दुष्काळी आटपाडीत थेट सफरचंदाचे सौदे सुरू झाले. कारण काही वर्षांपूर्वी आजारी पडले तरच घरात सफरचंद आणली जायची. आता मात्र उपवासालाच नव्हे, तर दररोज फळे खाणाऱ्यांची, किंवा एकवेळ जेवण आणि सायंकाळी फक्त फळे खाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे व्यावसायिक फायद्याबरोबरच भागात स्वस्त, दर्जेदार आणि ताजी सफरचंद मिळावीत यासाठी आटपाडीत सफरचंदाचे सौदे सुरू केले, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ नागणे यांनी दिली.

प्रश्न : आटपाडीसारख्या दुष्काळी भागात सफरचंदाचे सौदे करण्याची कल्पना कशी सुचली? त्यासाठी काय-काय करावे लागले?उत्तर : सफरचंद जेवढ्या उंच भागावरील असेल तितके चांगले. आटपाडी, पंढरपूर, मंगळवेढा, जत, खानापूर, दहीवडी, खटाव, अकलूज या परिसरात दरवर्षी सुमारे ३०० ट्रक सफरचंद खपतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र वर्षभर खपणारे एकमेव फळ आहे. त्यातून ही कल्पना सुचली. १९९६ पासून डाळिंब व्यवसायात आहे. देशभर डाळिंबामुळे व्यापाºयांशी संबंध आले. पाच वर्षे आपल्या भागात किती सफरचंद विकतात, त्याचे सर्वेक्षण केले. मग जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन तिथल्या शेतकºयांशी मैत्रीच केली. दुष्काळी भागाला स्वस्तात सफरचंद खाऊ घालण्याचे समाधान जास्त आहे.

प्रश्न : इतरांच्या तुलनेत ग्राहकांना ताजी आणि कमी दरात सफरचंद आटपाडीत कशी काय मिळतील?उत्तर : आता इंटरनेटचा जमाना आहे. सफरचंद तोडण्यापासून ट्रक भरेपर्यंतचे फोटो-व्हिडीओ तिथून पाठवतात. ट्रकला जीपीएस प्रणाली लावल्यामुळे माल कुठेपर्यंत आला, तेही कळते. पाचव्या दिवशी आटपाडीत सकाळी विक्री होते. विक्रीच्या दिवशी पहाटे येथे ट्रक यावा, असे नियोजन करतो. येथे व्यापारी दुसºया पेठेतून सफरचंद आणत होते. हे अंतर, त्याची वाहतूक याचे पैसे वाचतात. शिवाय दुसºया बाजारपेठेत गेल्यास तेथे मुक्काम करावा लागला, तर तोही खर्च वाचतोय्. शेतकरी ते छोटा व्यापारी यांचे कमिशन वाचते. त्यामुळे इतरांच्या तुलनेत येथे कमी दरात सफरचंद मिळतात.यापुढे काय आव्हाने आहेत?सर्वात आधी कोणी धाडस करत नाही. पण प्रतिसाद मिळाला की, अनेकजण कॉपी करतात. मग सगळा विचका होऊ शकतो. मी दहावीत हिंदी सोडून सगळ्या विषयात नापास झालो. शाळा सोडली, पण मला येत असलेल्या हिंदीच्या जोरावर देशातील सगळ्या बाजार समित्या पालथ्या घातल्या. या भागातून पहिल्यांदा डाळिंब विकायला दुबईला गेलो. अनेक देश फिरलो. निकोप स्पर्धा असली, तर चुरस निर्माण होते. ग्राहकांनाही त्याचा फायदा होतो. पण यापुढे या दुष्काळी भागात आंब्याचे सौदे करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी गेली तीन वर्षे कोकणात जाऊन पाहणी व अभ्यास करतो आहे.तीन प्रतीत सफरचंदांची विभागणी होते. अगदी हलक्या प्रतीच्या सफरचंदाला गिराण म्हणतात. दुसºया प्रतीची सफरचंद आठ-दहा दिवस टिकतात. ज्युससाठी किंवा अनेक ठिकाणी काळ्या, तांबूस डागासह विकली जातात. प्रथम दर्जाची सफरचंद शीतगृहाशिवाय एक महिना टिकतात. परिसरात त्यांचा सुगंध दरवळतो.

टॅग्स :Sangliसांगलीfruitsफळे