शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

सांगलीत ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 19:21 IST

ऐन पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः धावाधाव करावी लागत आहे.

सांगली : शहरातील प्रभाग पंधरा मधील रमामातानगर, गारपीर चौक, पटेल गल्लीसह परिसरात गेल्या आठवडाभरापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. नगरसेवकांना स्वखर्चातून प्रभागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला आहे. सांगली शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे.गेल्या दीड-दोन वर्षात शहरात अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होतो. याबाबत अनेक वेळा आयुक्तांपासून अधिकाऱ्यांच्या पर्यंत सखोल बैठका झाल्या मात्र पाणी प्रश्न जैसे थे आहे. आता ऐन पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः धावाधाव करावी लागत आहे.शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील रमामातानगर, पटेल गल्लीसह बहुतांशी भागात गेल्या सात दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. या परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम समाज राहतो. बकरी ईदच्या दिवशीही या परिसरात नागरिकांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान स्थानिक नगरसेवक फिरोज पठाण यांनी स्वखर्चातून प्रभागात पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे काही अंशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गढूळ पाण्याचा पुरवठा

शहरात अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे. त्यात आता गढूळ, गाळ मिश्रित पाणीपुरवठा होत आहे. शुद्ध पाणीपुरवठ्याचा विसरच महापालिकेला पडला असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी