शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
2
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
3
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
4
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
5
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
6
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
7
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
8
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
9
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
10
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
11
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
12
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
13
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
14
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
15
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
16
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
17
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
18
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
19
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
20
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

डॉपलर रडारचे ३५ कोटी रुपये गेले महापुरात वाहून, अत्याधुनिक यंत्रणा असतानाही महापुराचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 15:45 IST

अतिवृष्टीचा नेमका वेध घेण्यासाठी महाबळेश्वरमध्ये केंद्र शासनाने इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटीओरोलॉजीमार्फत तीन वर्षां पूर्वी डॉपलर रडार बसविले. सुमारे ...

अतिवृष्टीचा नेमका वेध घेण्यासाठी महाबळेश्वरमध्ये केंद्र शासनाने इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटीओरोलॉजीमार्फत तीन वर्षांपूर्वी डॉपलर रडार बसविले. सुमारे ३५ ते ४० कोटी रुपये खर्चाचे रडार तांत्रिकदृष्ट्या जागतिक गुणवत्तेचे आहे. वार्षिक खर्च तीन-चार कोटींच्या घरात आहे. इतक्या खर्चानंतरही पूरहानी रोखण्यासाठी ते कितपत यशस्वी ठरले हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचा लोकमतने घेतलेला आढावा...

संतोष भिसे

सांगली : गेल्या १७ वर्षांपासून दर पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा तडाखा बसतो. पण, महाबळेश्वरमध्ये संकटमोचक म्हणून बसविलेल्या डॉपलर रडारचा काहीही फायदा झाल्याचा अनुभव नाही. डॉपलरसाठी शासनाने खर्च केलेले तब्बल ३५ कोटी रुपये जणू महापुरातच वाहून गेले आहेत. यंत्रणा आहे पण, त्यासाठीचे प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने रडार पडून आहे.

राज्यात मुंबई, औरंगाबाद, नागपूर, सोलापूरमध्ये डॉपलर रडार यंत्रणा आहे. ही यंत्रणा महाबळेश्वरमध्ये सुमारे तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आली. सर्व ठिकाणच्या यंत्रणा अत्यंत उच्च तांत्रिक दर्जाच्या आहेत. हवामान विषयक इत्यंभूत माहिती तंतोतंत देण्याचे काम ही यंत्रणा करते. अतिवृष्टी आणि त्यामुळे येणाऱ्या पुराचे पूर्व अनुमान मिळावे, हा यंत्रणेमागील मुख्य हेतू आहे.

इतकी अत्याधुनिक यंत्रणा असतानाही २०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा तडाखा बसला. प्रचंड वित्तहानी झाली. २०२१ मधील चिपळुणातील महापूर व वित्त आणि जीवितहानी तर ‘न भुतो...’ अशीच होती. याचवर्षी सांगली, कोल्हापूरलाही कमी - अधिक प्रमाणात महापुराने वेढले.

शासकीय आणि सामाजिक संस्थांच्या महापूरविषयक चर्चेच्या गुऱ्हाळात पूरहानीचे दळण दळले जाते. पण, कोट्यवधी रुपये खर्चाची रडार यंत्रणा कधीच चर्चेच्या केंद्रस्थानी नसते. पावसाची तीव्रता काही तास अगोदर मिळावी आणि त्यातून महापुराचे अनुमान काढता यावे, असा रडार यंत्रणेचा मुख्य हेतू आहे. त्यातून वित्त आणि जीवितहानी टाळण्यासाठी बरीच फुरसत मिळते. प्रत्यक्षात मात्र तसे झालेले दिसत नाही. रडार यंत्रणा आणि प्रशासन यांच्यात पुरेशा समन्वयाअभावी रडारची अवस्था इलेक्ट्रॉनिक खेळण्यासारखी झाली आहे.

रडारचा परीघ ५०० किलोमीटर

एक रडार सुमारे ५०० किलोमीटर परिघावर ‘लक्ष’ ठेवते. महाबळेश्वर आणि सोलापुरातील रडार ५०० किलोमीटरपेक्षाही कमी अंतरात असल्याने या दोहोंचा फायदा सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर