शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

आलमट्टीवर ठपका नकाे; स्थानिक समस्याही अभ्यासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली-कोल्हापुरातील पुराबाबत आलमट्टीवर ठपका नकाे; स्थानिक समस्याही अभ्यासा, असा सूर पृथ्वीराज पाटील फाउंडेशनतर्फे शनिवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगली-कोल्हापुरातील पुराबाबत आलमट्टीवर ठपका नकाे; स्थानिक समस्याही अभ्यासा, असा सूर पृथ्वीराज पाटील फाउंडेशनतर्फे शनिवारी आयोजित पूरपरिषदेत उमटला. यावेळी तज्ज्ञांनी विविध उपाययोजना सुचविल्या. त्या शासनाला सादर करून अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे संयोजक पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.

परिषदेत वडनेरे समितीचे सदस्य राजेंद्र पवार, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, सेंटर फॉर सिटिझन्स सायन्सचे संचालक मयूरेश प्रभुणे, वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी पुराची कारणे व उपाययोजनांविषयी विवेचन केले. वडनेरे समितीचे अध्यक्ष नंदकुमार वडनेरे ऑनलाइन सहभागी झाले होते. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पश्चिम महाराष्ट्रासाठी नव्या आराखड्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे सांगितले. वडनेरे म्हणाले, पूरकाळात पाणी शहरात कसे पसरते, याचे नकाशे हवेत. कोकणात धरणे नसतानाही पूर आला. चांगले जलतंत्रज्ञ महाराष्ट्राकडे पुरेसे नाहीत. नवी गावे वसवणे अव्यवहार्य आहे. आलमट्टी ते सांगलीपर्यंत नदीवर २१२ बांधकामे आहेत, त्यावर नियंत्रण हवे. आमदार सुधीर गाडगीळ, विक्रम सावंत यांनीही भूमिका मांडल्या.

आलमट्टीमुळे पूर नाही : राजेंद्र पवार

सर्व धरणे सह्याद्रीच्या माथ्याजवळ आहेत. कर्नाटक सीमेपर्यंत कोणतेही धरण नाही, ही महत्त्वाची उणीव आहे. कृष्णेला ४० किलोमीटरमध्ये अनेक वळणे आहेत. आलमट्टीचा फुगवटा असता तर मागेही पुराचा दणका बसला असता. राजापूर बंधाऱ्यापर्यंत ६२०० मीटरमध्ये फक्त एक इंच उतार आहे. धरणात पुरासाठी वेगळी जागा परवडणारी नाही. आलमट्टीची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवली तरी सांगली, कोल्हापूरला धोका नसेल. फक्त राजापूर बंधारा पाण्याखाली जाईल. लोकांची दिशाभूल न करता समस्यांवर उपाय शोधावेत. कोल्हापुरात हायवेखालील वाॅटरगेटचे डिझाइन कमी पडले. २५ वर्षांत कृष्णेत गाळ वाढून तळपातळी २.२० मीटरने वर आली.

पश्चिम महाराष्ट्रासाठी नदी प्राधिकरण हवे : वसंत भोसले

३०-४० वर्षांतील विकासाचे मॉडेल मारक ठरत आहे. यंदाचा महापूर शासनाला १८ हजार ५०० कोटीला पडला. पश्चिम महाराष्ट्रात ५० हजार कोटींचे नुकसान झाले. हरिपूरचा पूल महापुराला कारणीभूत ठरतोय. पूरग्रस्तांसाठी जनतेच्या पैशांतून भरपाई कशासाठी द्यायची? आमदार, खासदार, अधिकाऱ्यांना नदीपात्रातील व काठावरची अतिक्रमणे दिसत नाहीत? कोल्हापुरात महामार्गामुळे पंचगंगेचे पाणी अडते, चार दिवसांचा पूर उतरायला २० दिवस लागतात. कृष्णा-भीमा स्थिरीकरणातून फक्त १५ टीएमसी पाणी जाईल, मग ही योजना कशासाठी विचारात आहे? माजी मुख्यमंत्र्यांनी यावर जबाबदारीने बोलावे. एकमेव उद्धव ठाकरे स्पष्ट बोलले. सांगली, सातारा, कोल्हापूरसाठी नदी प्राधिकरणाची गरज आहे. सांगलीत शंभर फुटीजवळचे पाणी जायला मार्गच नाही. पूरबाधित पट्ट्यात २२ लाख टन ऊस आहे. उसामुळे पुराला रस्ता मिळत नसल्याने तो कमी करायला हवा. शासनाने नदीतील वाळू संपवून नद्या मारल्या.

इतिहासात यंदाचा पाऊस सर्वाधिक : मयूरेश प्रभुणे

२२, २३ जुलैला इतिहासातील सर्वाधिक पाऊस झाला. दरडी कोसळल्या. आणखी १० वर्षे त्या कोसळत राहतील. नद्यांत गाळ साचेल. विकासाचे निर्णय घेताना याचा विचार व्हावा.

आठकलमी कार्यक्रम : प्रमोद चौगुले

सांगलीचा विस्तार एक चौरस किलोमीटरवरून ११८ वर गेलाय. आपत्ती व्यवस्थापनासाठी आठकलमी कार्यक्रम आवश्यक आहे. नद्यांची वहन क्षमता वाढविणे, नव्याने सर्वेक्षण, सर्व ओढे-नाले खुले करणे, विकास आराखड्यात सुधारणा हे काही उपाय आहेत. सांगली प्लास्टिकमुक्त व झीरो डिस्चार्ज हवी. जमिनीखालील पाझर बुजले असून रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे खुले होतील.