शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षांत २७ वेळा डॉक्टरांवर हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 10:28 IST

वटहुकूमातील तरतूद अशी... केंद्र सरकारने १७९७ च्या ‘साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यात’ बदलाचा वटहुकूम काढला असून, डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. गुन्हेगारास सहा महिने ते सात वर्षांपर्यंत कारावास, पाच लाखांचा दंड अशी तरतूद आहे. याचे वैद्यकीय क्षेत्रातून स्वागत होत आहे.

ठळक मुद्देवटहुकूमामुळे मिळणार संरक्षण : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना आधार; वादावादीच्या प्रकारांना आळा बसणार

सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षांत २७ वेळा डॉक्टरांवर हल्ले

सांगली : जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात सातवेळा डॉक्टरांवर हल्ल्याच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. डॉक्टरांना शिवीगाळ, रुग्णालय तोडफोडीच्या २७ घटना घडल्या असल्या तरी, इतर अनेक घटना आपसातच मिटविण्यात आल्या आहेत. सांगली, मिरज, विटा येथे अशा घटना घडल्या होत्या.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीव धोक्यात घालून उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. याची दखल घेत केंद्र सरकारने वटहुकूम जारी करत, डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद केली आहे.

मिरजेत रुग्णालयाचे नुकसान, डॉक्टरांवर हल्लेरूग्णावर वेळेत उपचार केला नाही, म्हणून आठ वर्षापूर्वी डॉक्टरला मारहाण झाली होती. गेल्यावर्षी शहरातील एका ज्येष्ठ डॉक्टरच्या रुग्णालयाचीही रूग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केली होती. अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ बनल्यानंतर नातेवाईकांनी हा प्रकार केला होता. आठ महिन्यांपूर्वी अपघातानंतर गंभीर जखमी असलेल्या रूग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली होती.

शासकीय रुग्णालयात डॉक्टर लक्ष्यआठ वर्षापूर्वी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर हल्ला केला होता. तसेच रूग्णालयातील साहित्याची तोडफोडही केली होती. अशा घटना मिरज शासकीय रूग्णालयातही घडल्या आहेत. अनेकदा नेत्यांकडून शासकीय रूग्णालयात डॉक्टरांवर दबाव आणला जातो. गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शासकीय रूग्णालयात तैनात असल्यानेही हल्ले, वादावादीचे प्रमाण कमी झाले आहे.

हल्ल्यांची कारणेच्रुग्णांवर चुकीचे उपचार केल्याच्या शक्यतेवरून हल्ले होतातच्रुग्णावर उपचारास विलंब केल्यावरूनही वादावादी होतेच्बिलाच्या रकमेवरूनही रूग्णाचे नातेवाईक व डॉक्टरांमध्ये वादाचा प्रकार होतो

कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सर्वांनाच समाजाने प्रोत्साहन द्यायला हवे. आपत्कालीन परिस्थितीत काम करणारे डॉक्टर, प्रशासनातील घटक, पोलिसांवर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही.- सुहैल शर्मा, पोलीस अधीक्षक

नव्या वटहुकूमामुळे डॉक्टरांना संरक्षण मिळेल. हल्लेखोरांवर जरब बसेल. या वटहुकूमाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी ‘आयएमए’ पाठपुरावा करेल.- डॉ. शशिकांत दोरकर,अध्यक्ष, आयएमए, मिरज.

या वटहुकूमाचा फायदा शासकीय सेवेतील डॉक्टरांना होणार आहे. न घाबरता त्यांना सेवा बजाविता येणार आहे. हा कायदा महत्त्वाचा ठरणार आहे.- डॉ. संतोष दळवी, उपवैद्यकीय अधीक्षक, शासकीय रूग्णालय.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी