शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सांगली जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात : जिल्हाधिकारी काळम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 5:31 PM

वारणा व कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाटबंधारे विभाग, महसूल, पोलीस हे सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या काळजीचे कारण नाही. जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात  आहे,  असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे केले.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात : जिल्हाधिकारी काळमपूर परिस्थितीचा घेतला आढावा

सांगली : वारणा व कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाटबंधारे विभाग, महसूल, पोलीस हे सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या काळजीचे कारण नाही. जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात  आहे,  असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे केले.

नदीपात्रातील सखल भागातील नागरिकांनी दक्ष राहावे. नदीकाठच्या भागातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुरक्षित स्थळी बांधावीत. वेळोवेळी होणाऱ्या नदीपात्रातील प्रवाहातील बदलांनुसार त्यांना माहिती देण्यात येईल, असे प्रतिपादन काळम यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित संभाव्य पूर परिस्थिती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) संजय गिड्डे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, पाटबंधारे कार्यकारी अभियंता नामदेव करे, सर्व उपविभागीय अधिकारी, महसूल, पाटबंधारे, महावितरण, कृषि, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन, बीएसएनएल, परिवहन, आरोग्य आदि यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.आपत्तीच्या काळात संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून परस्पर समन्वय ठेवावा. कोणत्याही स्थितीत जीवितहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, आपत्ती निवारणार्थ देण्यात आलेली सर्व साधनसामग्री अद्ययावत ठेवावी. ऐन वेळची धावपळ टाळावी, आपत्तीच्या काळात यंत्रणेतील त्रृटी सहन केल्या जाणार नाहीत, याची जाणीव ठेवून तात्काळ प्रतिसादासाठी तत्पर राहावे.

सर्व यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपत्तीच्या काळात आपली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडावीत. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी आपल्या बाजूच्या तालुक्यांमधीलही सद्यस्थितीची अद्ययावत माहिती ठेवावी. जिल्ह्यात घडणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या घटनेची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षाला द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी